शहरं
Join us  
Trending Stories
1
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
2
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
3
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
4
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
5
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
6
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
7
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
8
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
9
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
10
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
11
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
12
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
13
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
14
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
15
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
16
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
17
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
18
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
19
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
20
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...

तीन वर्षांत सात लाख वृक्षांवर चालली कुऱ्हाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 22:03 IST

बुधवारी जगात जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जात असताना जिल्ह्यात गेल्या तीन वर्षात सात लाख वृक्षांवर कुऱ्हाड चालल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. पर्यावरण प्रेमींसाठी ही अत्यंत धक्कादायक बाब ठरली आहे. किमान आता तरी पर्यावरण रक्षणासाठी सर्वांनी सामूहिक प्रयत्न करण्याची गरज निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देपुन्हा झाडे न लावल्यास दंड : वनविभागाचा आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : बुधवारी जगात जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जात असताना जिल्ह्यात गेल्या तीन वर्षात सात लाख वृक्षांवर कुऱ्हाड चालल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. पर्यावरण प्रेमींसाठी ही अत्यंत धक्कादायक बाब ठरली आहे. किमान आता तरी पर्यावरण रक्षणासाठी सर्वांनी सामूहिक प्रयत्न करण्याची गरज निर्माण झाली आहे.तीन वर्षांत खासगी मालकांनी जिल्ह्यातील सात लाख वृक्षांची तोड केली आहे. याच्या अधिकृत नोंदी वनविभागाने घेतल्या आहे. ज्या भागात वृक्षतोड करण्याची परवानगी दिली होती, तो भाग आता ओसाड झाला आहे. अशा ठिकाणी पुन्हा वृक्षारोपण करण्याचे आदेश वनविभागाने दिले. या ठिकाणी खासगी मालकांना वृक्षारोपण करण्याच्या सूचना आहे. वृक्षारोपण न केल्यास दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. २०१५ ते २०१८ या काळात जिल्ह्यात सहा लाख ८३ हजार ८९५ वृक्षांची तोड झाली. हा संपूर्ण भाग आता ओस पडला आहे. या ठिकाणी पुन्हा वृक्षारोपण करण्याच्या सूचना वनविभागाने दिल्या. तुटलेल्या वृक्षांच्या ठिकाणी नव्याने सात लाख ८१ हजार ६६७ वृक्ष लावले जाणार आहे. ही वृक्ष लागवड बंधनकारक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, ज्या भागात वृक्षतोड झाली, तेथे नव्याने वृक्ष लावण्यासाठी वनविभाग वृक्ष पुरविणार आहे. खासगी मालकांना ते वृक्ष लावायचे आहे. त्याचे संगोपनही करायचे आहे.४५ अंश तापमानात वृक्षारोपण, लाखोंचा खर्च व्यर्थशहराच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी रस्ता दुभाजकांमध्ये वृक्षारोपण केले जात आहे. पाऊस येण्यापूर्वीच हे वृक्षारोपण सुरू झाले. मात्र ४५ अंशाच्या तापमानाने हे वृक्ष करपले आहे. यामुळे वृक्षारोपणावरचा लाखोंचा खर्च वाया जात आहे.यवतमाळच्या धामणगाव मार्गावर वृक्षारोपण करण्यात आले. यात विविध वृक्षांचा समावेश आहे. यातील काही झाडे मोठी, तर काही छोटी आहेत. यातील छोटे वृक्ष उन्ह सहन न झाल्याने करपण्यास सुरूवात झाली आहे. यामुळे पावसाळ्यापूर्वीच हे वृक्ष प्राण सोडणार काय, अशी स्थिती आहे. वृक्ष लागवड हा चांगला उपक्रम आहे. मात्र त्याच्या अवेळी लागवडीने फलित साध्य होणार नाही. यातून चांगल्या उद्देशावरच पाणी फेरले जाणार आहे. विशेष म्हणजे, या संपूर्ण कामावर कोणाचेही लक्ष नाही. यामुळे आश्चर्य आहे.पुन्हा कंत्राट मिळविण्यासाठी...अवेळी वृक्षारोपण करायचे. मग हे झाडे वाळले म्हणून नव्याने त्याच ठिकाणी वृक्षारोपण करायचे. त्यासाठी नवीन कंत्राट मिळवायचे, यासाठीच अवेळी झाडे लावल्या गेली नाही ना, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. इतर ठिकाणचे वृक्षारोपण थांबवून पाऊस आल्यानंतरच वृक्ष लावण्याची परवानगी द्यावी, असे मत वृक्षप्रेमी व्यक्त करीत आहेत.खासगी मालकांनी वृक्ष लागवड न केल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई होईल. वृक्ष लागवड बंधनकारक आहे. तसे नियोजनही तयार झाले आहे.- भाऊराव राठोड, विभागीय वन अधिकारी