शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
2
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
3
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
4
एअर इंडिया विमान अपघात: प्रेमानंद महाराजांची मोठी शिकवण; तुम्हालाही ‘ती’ गोष्ट माहिती हवीच!
5
वर्ल्ड कप आधी स्मृती मानधनाची मुसंडी! ५ वर्षांनी पुन्हा झाली वनडेची 'क्वीन'
6
Sonam Raghuvanshi : "लग्नानंतर राजा त्याच्या मित्रांसह..."; सोनम रघुवंशीने रिसेप्शनला नवऱ्याला दिलेलं 'हे' वचन
7
स्वामी विवेकानंदांना महाकालीकडे मागायचे होते एक, पण मागितले भलतेच आणि ते मिळालेसुद्धा!
8
'आमच्या देशाकडे पाहिलं तरी डोळे काढून...’, पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची इस्राइलला धमकी
9
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
10
मारुतीची पहिली e Vitara लाँच झाली! व्हेरिअंटनुसार ३५ लाख ते ४२ लाख किंमत, फिचर्स, रेंज आणि कोण घेणार पहा...
11
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्तानची लुडबुड; शाहबाज शरीफ यांना कशाची वाटतेय भीती?
12
विरार- अलिबाग कॉरिडोरच्या भूसंपादनाला मिळणार गती!
13
उलटेच झाले! सामुहिक बलात्काराची केस दाखल केली, तिलाच सात वर्षांची शिक्षा झाली
14
PF साठी एजंट्सची मदत घेताय? सावधान! EPFO ने दिली धोक्याची घंटा, पैसे आणि डेटा दोन्ही जाईल!
15
स्वामी विवेकानंदांनी सांगितलेली 'ही' तीन ध्येय साध्य केली तर आपला पराभव होऊच शकणार नाही!
16
'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे'चा सीक्वेल येणार? काजोल म्हणाली, "सिनेमाचा जो शेवट झाला..."
17
डोनाल्ड ट्रम्प यांनी आणला स्वत:च्याच ब्रँडचा स्मार्टफोन; अमेरिकेत भूकंप, कमी किंमतीत एवढे फिचर्स देणार की...
18
Crude Oil Reserves India : भारताला अंदमानात २ लाख कोटी लिटर कच्च्या तेलाचं भांडार मिळालं, GDP २० ट्रिलियन डॉलर्सवर जाणार?
19
इस्रायल-इराण यांचे एकमेकांवर बॉम्ब; सरकारी न्यूज चॅनेलच्या इमारतीवर हल्ले

तीन वर्षांत सात लाख वृक्षांवर चालली कुऱ्हाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 22:03 IST

बुधवारी जगात जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जात असताना जिल्ह्यात गेल्या तीन वर्षात सात लाख वृक्षांवर कुऱ्हाड चालल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. पर्यावरण प्रेमींसाठी ही अत्यंत धक्कादायक बाब ठरली आहे. किमान आता तरी पर्यावरण रक्षणासाठी सर्वांनी सामूहिक प्रयत्न करण्याची गरज निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देपुन्हा झाडे न लावल्यास दंड : वनविभागाचा आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : बुधवारी जगात जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जात असताना जिल्ह्यात गेल्या तीन वर्षात सात लाख वृक्षांवर कुऱ्हाड चालल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. पर्यावरण प्रेमींसाठी ही अत्यंत धक्कादायक बाब ठरली आहे. किमान आता तरी पर्यावरण रक्षणासाठी सर्वांनी सामूहिक प्रयत्न करण्याची गरज निर्माण झाली आहे.तीन वर्षांत खासगी मालकांनी जिल्ह्यातील सात लाख वृक्षांची तोड केली आहे. याच्या अधिकृत नोंदी वनविभागाने घेतल्या आहे. ज्या भागात वृक्षतोड करण्याची परवानगी दिली होती, तो भाग आता ओसाड झाला आहे. अशा ठिकाणी पुन्हा वृक्षारोपण करण्याचे आदेश वनविभागाने दिले. या ठिकाणी खासगी मालकांना वृक्षारोपण करण्याच्या सूचना आहे. वृक्षारोपण न केल्यास दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. २०१५ ते २०१८ या काळात जिल्ह्यात सहा लाख ८३ हजार ८९५ वृक्षांची तोड झाली. हा संपूर्ण भाग आता ओस पडला आहे. या ठिकाणी पुन्हा वृक्षारोपण करण्याच्या सूचना वनविभागाने दिल्या. तुटलेल्या वृक्षांच्या ठिकाणी नव्याने सात लाख ८१ हजार ६६७ वृक्ष लावले जाणार आहे. ही वृक्ष लागवड बंधनकारक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, ज्या भागात वृक्षतोड झाली, तेथे नव्याने वृक्ष लावण्यासाठी वनविभाग वृक्ष पुरविणार आहे. खासगी मालकांना ते वृक्ष लावायचे आहे. त्याचे संगोपनही करायचे आहे.४५ अंश तापमानात वृक्षारोपण, लाखोंचा खर्च व्यर्थशहराच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी रस्ता दुभाजकांमध्ये वृक्षारोपण केले जात आहे. पाऊस येण्यापूर्वीच हे वृक्षारोपण सुरू झाले. मात्र ४५ अंशाच्या तापमानाने हे वृक्ष करपले आहे. यामुळे वृक्षारोपणावरचा लाखोंचा खर्च वाया जात आहे.यवतमाळच्या धामणगाव मार्गावर वृक्षारोपण करण्यात आले. यात विविध वृक्षांचा समावेश आहे. यातील काही झाडे मोठी, तर काही छोटी आहेत. यातील छोटे वृक्ष उन्ह सहन न झाल्याने करपण्यास सुरूवात झाली आहे. यामुळे पावसाळ्यापूर्वीच हे वृक्ष प्राण सोडणार काय, अशी स्थिती आहे. वृक्ष लागवड हा चांगला उपक्रम आहे. मात्र त्याच्या अवेळी लागवडीने फलित साध्य होणार नाही. यातून चांगल्या उद्देशावरच पाणी फेरले जाणार आहे. विशेष म्हणजे, या संपूर्ण कामावर कोणाचेही लक्ष नाही. यामुळे आश्चर्य आहे.पुन्हा कंत्राट मिळविण्यासाठी...अवेळी वृक्षारोपण करायचे. मग हे झाडे वाळले म्हणून नव्याने त्याच ठिकाणी वृक्षारोपण करायचे. त्यासाठी नवीन कंत्राट मिळवायचे, यासाठीच अवेळी झाडे लावल्या गेली नाही ना, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. इतर ठिकाणचे वृक्षारोपण थांबवून पाऊस आल्यानंतरच वृक्ष लावण्याची परवानगी द्यावी, असे मत वृक्षप्रेमी व्यक्त करीत आहेत.खासगी मालकांनी वृक्ष लागवड न केल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई होईल. वृक्ष लागवड बंधनकारक आहे. तसे नियोजनही तयार झाले आहे.- भाऊराव राठोड, विभागीय वन अधिकारी