शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

कोविडयोद्धांना नुसताच ‘मान’ मानधन थकले ! अडचणी वाढल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 05:00 IST

कोरोना काळात डाॅक्टर, इसीजी तंत्रज्ञ, बीएएमएस डाॅक्टर, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, डाटा एंट्री ऑपरेटर, औषधी निर्माता अधिपरिचारिका या पदांवर ३५० कर्मचाऱ्यांना नियुक्ती देण्यात आली होती. कंत्राटी स्वरूपाच्या या पदभरतीत अनेकांना कमी करण्यात आले. आता अलीकडे यातील २५० कर्मचाऱ्यांना कोविडच्या कामासाठी नियुक्ती मिळाली आहे. या ठिकाणी काम करणारे कोरोना योद्धे कामावरून कमी करताना मानधन न मिळाल्याच्या प्रकाराने संतप्त झाले. 

ठळक मुद्दे२५० कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर बोलावले : काहींना तात्पुरती नियुक्ती

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोरोनावर मात करण्यासाठी आरोग्य विभागाची यंत्रणा तोकडी पडल्याने आरोग्य विभागाने कंत्राटी पदभरती करून साथ थोपविण्याचा पूर्णत: प्रयत्न केला. त्यात त्यांना यशही आले. आता कोरोना संपल्यानंतर यातील कर्मचाऱ्यांना कमी करण्यात आले आहे, तर काही दिवसांनंतर काही कर्मचाऱ्यांना नव्याने नियुक्ती मिळाली आहे. मात्र, अनेक कर्मचाऱ्यांचे वेतन रखडले आहे. कोरोना काळात डाॅक्टर, इसीजी तंत्रज्ञ, बीएएमएस डाॅक्टर, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, डाटा एंट्री ऑपरेटर, औषधी निर्माता अधिपरिचारिका या पदांवर ३५० कर्मचाऱ्यांना नियुक्ती देण्यात आली होती. कंत्राटी स्वरूपाच्या या पदभरतीत अनेकांना कमी करण्यात आले. आता अलीकडे यातील २५० कर्मचाऱ्यांना कोविडच्या कामासाठी नियुक्ती मिळाली आहे. या ठिकाणी काम करणारे कोरोना योद्धे कामावरून कमी करताना मानधन न मिळाल्याच्या प्रकाराने संतप्त झाले. अडचणीच्या काळात काम करणाऱ्या या कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामाचा मोबदला मिळाला नाही. यामुळे ते आर्थिक अडचणीत आहे. याशिवाय यातील काही कर्मचाऱ्यांना अजूनही रोजगाराची नवी संधी उपलब्ध झाली नाही. यामुळे या कर्मचाऱ्यांचे संपूर्ण कुटुंब अडचणीत आले आहे. त्यांनी मानधनाची आणि नियुक्ती मागणी केली आहे.

आर्थिक तरतुदीअभावी मानधन अडखळलेकोविडमध्ये लागलेल्या कर्मचाऱ्यांना मानधन वितरित करताना दर महिन्यास विलंब लागला आहे. एका महिन्याचे मानधन दुसरा महिना अर्धा संपल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या हातात पडले आहे.सर्वात अखेरच्या महिन्यात ज्या कर्मचाऱ्यांचे मानधन रखडले त्याला आर्थिक तरतुदीचा अडथळा आहे.राहिलेल्या कर्मचाऱ्यांना लवकरच मानधन उपलब्ध होणार आहे. यामुळे कर्मचाऱ्यांना कामाचा मोबदला मिळेल.

मान दिल्याने पोट नाही भरतआम्हाला नोकरीवरून कमी केले. तडकाफडकी निर्णय घेण्यात आला. काढताना काम केलेल्या दिवसाचे वेतनही मिळाले नाही. आता बेरोजगारी आणि कामाचा शोध सुरू आहे. आम्हाला मानधन मिळाले असते तर अडचणी दूर झाल्या असत्या. सर्वांनाच कामावर घ्यावे.- फैजान दानिश, कर्मचारी

आरोग्य विभागाला तिसरी लाट येणार असल्याची माहिती आहे. यानंतरही आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना कमी करण्यात आले. आरोग्य विभागाने अनुभवी कर्मचाऱ्यांना कायम ठेवायला पाहिजे होते. याशिवाय राहिलेले मानधनही द्यायला हवे.  - डाॅ. शारीवाह अन्नदाते

जूनचे मानधन अद्याप मिळाले नाही. आम्हाला नियुक्ती देतानाच काम नसल्यास काढण्यात येईल, अशा सूचना दिल्या होत्या. कामावरून कमी झाल्यानंतर तत्काळ जाॅब मिळत नाही. तरी अनेकजण खासगी नोकरी करीत आहे, तर काही शोधात आहे. - डाॅ. किंजल पटेल

सध्या काम नाही, काम उपलब्ध होताच आवश्यकतेनुसार भरती होईलआरोग्य विभागाने काम नसलेल्या कर्मचाऱ्यांना कमी केले. तिसऱ्या लाटेमध्ये आवश्यकता भासल्यास कर्मचाऱ्यांना नियुक्ती दिली जाणार आहे. त्यांना नियुक्ती देतानाच आवश्यकतेनुसार कामावर ठेवले जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. तसा बाँड त्यांच्याकडून लिहून घेण्यात आला होता. जिल्ह्यात सध्या सोळा ठिकाणी केंद्र सुरू आहे.

कर्मचाऱ्यांचे मानधन नेमके कशामुळे थांबले याची मला कल्पना नाही. मात्र, ग्रॅन्डअभावी मानधन थांबले असावे. ज्या कर्मचाऱ्यांनी आपल्या कार्यकाळात कामकाज पूर्ण केले. त्यांना त्यांच्या कामाचा मोबदला लवकरच मिळेल. आरोग्य विभागाकडे याबाबत विचारणा करण्यात येईल. माझ्याकडे सध्या तरी या प्रकरणात काही तक्रारी आलेल्या नाही. कोविड काळातील कर्मचाऱ्यांना मानधन मिळेल. - अमोल येडगे, जिल्हाधिकारी

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या