शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?
2
Operation Sindoor: 'पहलगाममध्ये दहशतवाद्यांच्या पापाचा घडा भरला अन् त्यानंतर...', भारताचे डीजीएमओ घई काय बोलले?
3
Operation Sindoor : "चीनचं मिसाईल अयशस्वी, तुर्कीचे ड्रोन पाडले"; एअर मार्शल एके भारती यांनी पुरावेच दाखवले
4
गुंतवणूकदारांची एकाच दिवसात ४ वर्षातील सर्वात मोठी कमाई! 'या' शेअरमध्ये प्रचंड वाढ
5
व्हेज बिर्याणीच्या गाडीवर लिहिलं होतं 'जय श्री श्याम', भाजप आमदार बालमुकुंद आचार्य संतापले अन्...
6
शाहरुख खानसोबत ३० वर्षांनी दिसणार 'हा' एव्हरग्रीन अभिनेता, 'किंग' सिनेमात झाली एन्ट्री
7
घराबाहेर पडताना आई तुम्हाला आवर्जून दही-साखर देते का? फायदे समजल्यावर रोजच मागाल
8
काय होता ५००० कोटींचा 'पॅनकार्ड' इनव्हेस्टमेंट फ्रॉड? ५१ लाख गुंतवणूकदारांना घातला गंडा
9
पाकिस्तानचा शेअर बाजार अचानक १ तास करावा लागला बंद! युद्धविरामनंतर नेमकं काय घडलं?
10
'याचना नहीं, अब रण होगा...' कवितेने सुरुवात; आर्मीने दाखवला 'ऑपरेशन सिंदूर'चा नवा व्हिडिओ
11
Operation Sindoor : "हौसले बुलंद हो, तो..." क्रिकेटचा किस्सा ऐकवत DGMO नी दिला स्पष्ट मेसेज, पाकचा 'खेळ खल्लास' कसा केला ते सांगितलं!
12
भारत-पाकिस्तान डीजीएमओंची हॉटलाईन कनेक्ट होऊ शकली नाही; थोड्या वेळाने पुन्हा प्रयत्न करणार
13
जग कधीच विसरू शकणार नाही विराट कोहलीचे हे 10 कसोटी विक्रम; कुण्याही भारतीयाला जमला नाही असा पराक्रम
14
"मी विराटचे अश्रू पाहिलेत..."; 'किंग कोहली'च्या कसोटी निवृत्तीनंतर अनुष्का शर्माची भावनिक पोस्ट
15
स्मिता पाटील यांच्या मृत्यूनंतर प्रतीकला दत्तक घेणार होती बॉलिवूडची 'ही' प्रसिद्ध जोडी! अभिनेत्याचा मोठा खुलासा 
16
Kangana Ranaut : "जितके संयमी, तितकेच धाडसी"; ऑपरेशन सिंदूरच्या यशाने कंगना राणौत खूश, मोदींचं केलं कौतुक
17
'युद्ध रोमँटिक चित्रपट नाही, गंभीर मुद्दा आहे', माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांचे सूचक विधान
18
संरक्षण दलांसोबत अधिक समन्वयाने काम करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे सुतोवाच
19
सेव्हिंग अकाऊंटमध्ये पैसे ठेवूनही मिळेल FD इतकं व्याज; फक्त करावं लागेल 'हे' महत्त्वाचं काम
20
विराट कोहलीच्या कसोटी निवृत्तीवर 'हेड कोच' गौतम गंभीरचे ट्विट, सिंहाशी तुलना करत म्हणाला...

कोलाम व पारधी बांधवांना घरकुलाच्या लाभाची प्रतीक्षा

By admin | Updated: April 6, 2016 02:41 IST

आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतरही कोलाम आणि पारधी समाजबांधव घरकुलापासून वंचित आहेत.

‘शबरी’ योजना : ग्रामपंचायतीचे प्रस्ताव प्रकल्प कार्यालयात पडूनघारफळ : आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतरही कोलाम आणि पारधी समाजबांधव घरकुलापासून वंचित आहेत. परिसरातील अनेक लाभार्थ्यांना यासाठी संबंधित कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत आहे. ग्रामपंचायतींनी पाठविलेले प्रस्ताव आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय पांढरकवडाकडे पडून आहेत. शासनामार्फत वंचितांसाठी ‘शबरी’ आदिवासी घरकूल योजना राबविली जात आहे. यासाठी लाभार्थ्यांची निवड आवश्यक ती कार्यवाही पूर्ण करून केली जाते. प्रामुख्याने कोलाम आणि पारधी समाज बांधवांसाठी ही योजना आहे. परिसरातील पात्र लाभार्थ्यांचे प्रस्ताव संबंधित ग्रामपंचायतींनी पांढरकवडा आदिवासी प्रकल्प विभागाकडे पाठविले. प्रस्तावासाठी संपूर्ण कागदपत्र ग्रामपंचायतींनी पात्र लाभार्थ्यांकडून उपलब्ध करून घेतले. मात्र अजून तरी या नागरिकांना घरकुलाचा लाभ मिळालेला नाही. घरकुलासाठी पात्र ठरलेले लाभार्थी ‘घर कधी मिळणार’ अशी विचारणा ग्रामपंचायतींकडे करतात. आदिवासी प्रकल्प कार्यालयाकडे ग्रामपंचायतींनी प्रस्ताव पाठविले आहे. त्यावर अजूनतरी कुठलीही कार्यवाही झालेली नाही. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी कोलाम समाजाच्या लाभार्थ्यांची घरकुलासाठी निवड करण्याची सूचना ग्रामपंचायतींना दिली होती. विशेष ग्रामसभेत ही निवड करायची होती. यानुसार घारफळ परिसरातील ग्रामपंचायतींनी हे सोपस्कार पूर्ण करून याद्या तयार केल्या. आता मात्र त्या प्रक्रियेत अडकल्या आहेत. दुसरीकडे मात्र कोलाम आणि पारधी बांधवांना प्रतीक्षेत राहावे लागत आहे.घरकुलाच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांनी परिसराशी संबंधित लोकप्रतिनिधींशीही संपर्क केला. परंतु त्यांना कुणाकडूनही प्रतिसाद मिळाला नाही. काही कुटुंबांनी प्रकल्प कार्यालयाशीही संपर्क करून प्रस्तावावर झालेल्या कारवाईविषयी विचारणा केली. कुणाकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे आता हा प्रश्न नेमका कुणाकडून सोडवून घ्यायचा ही समस्या त्यांच्यापुढे निर्माण झाली आहे. जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे, अशी त्यांची मागणी आहे. (वार्ताहर)े