शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
4
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
5
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
6
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
7
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
8
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
9
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
10
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
11
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
12
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
13
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
14
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
15
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
16
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
17
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
18
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
19
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
20
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश

कोल्हापुरी बंधारे झाले कुचकामी

By admin | Updated: October 25, 2014 22:50 IST

सुमारे १० ते १२ वर्षांपूर्वी तालुक्यातून वाहणाऱ्या काही नदी-नाल्यांवर चार कोल्हापुरी बंधारे बांधण्यात आले होते. आता त्यातील एकाही बंधाऱ्यात पाणी अडविले जात नसल्याने हे कोल्हापुरी बंधारे

वणी : सुमारे १० ते १२ वर्षांपूर्वी तालुक्यातून वाहणाऱ्या काही नदी-नाल्यांवर चार कोल्हापुरी बंधारे बांधण्यात आले होते. आता त्यातील एकाही बंधाऱ्यात पाणी अडविले जात नसल्याने हे कोल्हापुरी बंधारे बिनकामाचे ठरले आहेत. या बंधाऱ्यांच्या बांधकामावर झालेला कोट्यवधींचा खर्च पाण्यात गेला आहे.राज्यात विदर्भ आणि मराठवाडा हे दोन विभाग कायम टंचाईग्रस्त असतात. मराठवाड्यात तर पाणी प्रश्न अत्यंत गंभीर आहे. सुदैवाने विदर्भातून काही मोठ्या नद्या वाहतात. त्यामुळे येथे पाण्याची थोडी मुबलकता आहे. मात्र पाणी अडविण्याची प्रभावी उपाययोजना नसल्याने सर्व पाणी वाहून जात आहे. या वाहून जाणाऱ्या पाण्याचे योग्य व्यवस्थापन करण्याची खरी गरज निर्माण झाली आहे. मात्र त्याकडे कुणीच आणि कधीच गांभीर्याने लक्ष देण्यास तयार नसल्याचे चित्र दिसून येत आहे.पश्चिम महाराष्ट्रात अनेक नदी, नाल्यांवर बंधारे बांधण्यात आले आहेत. हे बंधारे त्या परिसरातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरले आहे़ १0 ते १२ वर्षांपूर्वी त्याच अनुषंगाने कोल्हापूर जिल्ह्यात बंधारे बांधण्यास सुरूवात करण्यात आली होती. तेथे या बंधाऱ्यांची उपयुक्तता सर्वांच्या नजरेस आली होती. या बंधाऱ्यांची सुरूवात कोल्हापूर जिल्ह्यातून झाल्याने त्यांना ‘कोल्हापुरी बंधारे’ असे नाव देण्यात आले होते. दगडी बांधकाम करून दरवाजावर लोखंडी बरगे बसवून आवश्यक तेव्हा नदी, नाल्यांच्या प्रवाहाचे पाणी या बंधाऱ्यांत अडविले जात होते. या बंधाऱ्यांची उपयुक्तता लक्षात घेऊन राज्य शासनाने कोल्हापुरी बंधाऱ्यांचे हे ‘मॉडेल’ विदर्भात आणले. या बंधाऱ्यांच्या माध्यमातून सिंचन सुविधा निर्माण करण्याचे लक्ष ठेवण्यात आले होते. वणी तालुका सिंचनात आधीच मागासलेला आहे. आहे़ मात्र तालुक्यात पाण्याची मुबलकता आहे़ वर्धा आणि पैनगंगा या दोन मोठ्या नद्यांसह निगुर्डा व विदर्भा या दोन लहान नद्या व बारमाही वाहणारे काही नाले, तालुक्यात अस्तित्वात आहेत. त्यामुळे पाण्याचा सुकाळ आहे़ तथापि या पाण्याचा अद्याप व्यवस्थित वापर होत नसल्याने हे पाणी वाहून जात आहे़ पूर्वी वणी तालुक्यातून वाहणाऱ्या नद्या, नाले, ओढे बारमाही वाहत होते. आता उन्हाळ्यात या नद्या, नाले कोरडे पडतात. पावसाच्या लहरीपणामुळे पाणीटंचाई निर्माण होते. शेतीलाही पाणी मिळत नाही.तशी तालुक्यातील शेती सुपिक आहे़ मात्र तब्बल ८५ टक्के शेती कोरडवाहू आहे. ही शेती पावसावर अवलंबून अहे. मात्र पावसाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांना कधी कोरडा, कधी ओल्या दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे. मागीलवर्षी ओला, तर यावर्षी कोरड्या दुष्काळाच्या छायेत शेतकरी सापडले आहेत.सिंचनाची सुविधा नसल्याने आणि पावसाच्या लहरीपणामुळे या तालुक्यातील शेतकरी सतत कर्जाच्या ओझ्याखाली दबलेला असतो़ परिणामी शेतकरी आत्महत्या वाढत आहे. दुसरीकडे नवीन पिढीतील युवक शेती व्यवसायाकडे दुर्लक्ष करीत आहे़ ते एखाद्या दुकानात नोकरी करतात, मात्र शेती करण्यास धजावत नाही. या परिस्थितीमुळे शेतकरी पुत्राला कुणी मुलगी द्यायलाही धजावत नाही़ त्यातच पिकांचा उतारा कमी येत असल्याने अनेक युवक शेतीकडे वळण्यास कचरतात. लावलेला खर्चही शेतीत निघत नसल्याने शेतकरी प्रचंड निराशेच्या सावटाखाली वावरत आहेत.तालुक्यात शेती सिंचनाचा अभाव असल्याने शेतात दोन हंगामात पिके घेण्याची संधी शेतकऱ्यांना मिळत नाही. ज्यांच्याकडे ओलिताची सुविधा आहे, त्यांना सिंचन करता येत नाही. भारनियमनाच्या अतिरेकाने पाणी असूनही त्यांना ओलीत करणे कठीण झाले आहे. त्यामुळेच १0 ते १२ वर्षांपूर्वी ही परिस्थीत लक्षात घेऊन राज्य शासनाने प्रयोग म्हणून विदर्भा नदीवर पुरड व कुंड्रा गावाजवळ, निगुर्डा नदीवर वागदराजवळ आणि वारगाव येथील नाल्यावर कोल्हापुरी बंधारे बांधले होते. या बंधाऱ्यांमुळे संबंधित परिसरातील शेतकऱ्यांना हायसे वाटले होते. आता शेतीत जादा उत्पन्न घेता येईल, असा आशावाद त्यांच्यात निर्माण झाला होता. त्यांच्या डोळ्यात हिरवे स्वप्न दिसू लागले होते. जेथे कोल्हापुरी बंधारे निर्माण करण्यात आले, त्या गावांमध्ये लगेच पाणी वाटप संस्थांची स्थापनाही करण्यात आली होती. या कोल्हापुरी बंधाऱ्याला लोखंडी बरगे बसवून पाणी अडविण्यास सुरूवातही करण्यात आली होती. मात्र गणित कुठे चुकले कुणास माहीत, या चारही बंधाऱ्यांमध्ये पाणी अडलेच नाही़ ते नुसतेच उबे झाले. आता तर या बंधाऱ्यांची स्थिती अत्यंत भयावह झाली आहे. त्यांच्याकडे कुणाचेच लक्ष नसल्याने लोखंडी बरगे चोरट्यांनी लंपास केले आहेत. त्यांचा अद्याप कुणालाही शोध लागलेला नाही. (कार्यालय प्रतिनिधी)