शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
2
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
3
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
4
MS धोनीला कायदेशीर चॅलेंज! Captain Cool Trademark अर्जावर आक्षेप, कारण...
5
म्हणे, यांना इंग्रजी येत नाही, त्यांच्या देशात परत पाठवा; ब्रिटिश महिलेची भारतीय कर्मचाऱ्यांवर आगपाखड
6
ट्रम्प टॅरिफचा बाजारावर परिणाम नाही? कोटक महिंद्रात सर्वाधिक वाढ, तर घसरणाऱ्यांमध्ये टाटाचा शेअर
7
ट्रम्प यांनी १४ देशांवर लावलं टॅरिफ, द.कोरिया-जपानलाही सोडलं नाही; पण भारत-चीनला हातही लावला नाही, कारण काय?
8
Air India विमान अपघाताचे कारण लवकरच समोर येणार; तपास पथकाने सादर केला प्राथमिक अहवाल
9
आता मागणीनुसार बदलणार ओला-उबरचे भाडे! सरकारचे नवीन नियम, आता 'या' गोष्टी बदलणार!
10
तुम्हाला माहिती नसेल... सर्वाधिक पगार कोणत्या देशातील लोकांना मिळतो, तो किती आहे?
11
“विधानसभा निवडणुकीतील दस्तावेज नष्ट करण्याचे निवडणूक आयोगाचे परिपत्रक मतचोरी केल्याचाच पुरावा”
12
लय भारी! एकही पैसा खर्च न करता इन्स्टाग्रामवर कसे वाढवायचे फॉलोअर्स? 'ही' आहे सोपी पद्धत
13
रेखा झुनझुनवालांना ₹१००० कोटींचं नुकसान; Tata Group चा हा शेअर जोरदार आपटला, कारण काय?
14
चोरांवर मोर! दरोडेखोरांनाच घातला गंडा, ७५ लाखांच्या दागिन्यांचे १ लाखच दिले, त्यानंतर घडलं असं काही...
15
एक्सपायर झाल्यानंतर 'ही' १७ औषथे कचऱ्यात टाकण्याऐवजी टॉयलेटमध्ये फ्लश करा, कारण काय?
16
"मी गौरीसोबत लग्न केलंय...", आमिर खानचा मोठा खुलासा, चाहत्यांना आश्चर्याचा धक्का
17
"माझे हात थरथरत होते, ऐश्वर्या रायच्या ब्लाउजचं हूक..."; अभिनेत्रीने सांगितला 'तो' किस्सा
18
गुरुवारी गुरुपौर्णिमा: गुरु स्वामींचे दैवी शिष्यगण, आजही करतात मार्गदर्शन; सार्थक होते जीवन
19
Realme: आवाज ऐकताच फोटो एडीट करून देईल रिअलमीचा 'हा' फोन, लवकरच बाजारात करतोय एन्ट्री!
20
Gold Silver Price 8 July: सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; किंमत लाखांच्या पार, खरेदीपूर्वी पाहा नवे दर

कोची प्रकल्पाचे काम रखडले

By admin | Updated: April 10, 2015 00:12 IST

घाटंजी तालुक्यातील कोची तलाव प्रकल्पाचे काम गेल्या पाच वर्षांपासून रखडले आहे. या प्रकल्पातील प्रस्तावित सिंचन सुविधेमुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.

सुदाम दारव्हणकर रूंझाघाटंजी तालुक्यातील कोची तलाव प्रकल्पाचे काम गेल्या पाच वर्षांपासून रखडले आहे. या प्रकल्पातील प्रस्तावित सिंचन सुविधेमुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. कोची तलावाच्या कामांना २००८ मध्ये सुरूवात करण्यात आली. हा प्रकल्प २०११ मध्ये पूर्ण करणे आवश्यक होते. मात्र २०१० मध्ये या तलावाचे काम बंद पडले. त्यानंतर हा प्रकल्प अजूनही रखडलेला आहे. दोन वर्षाच्या कालावधीत फक्त धरणाच्या बांधाची मातीकाम आणि पुच्छ कालवा तयार झाला आहे. धरणाची तोंडी, वेस्टवेअर, कालवा हे काम होणे बाकी आहे. या प्रकल्पासाठी शेतकऱ्यांकडून १६५ हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना ७० हजार रुपये एकराप्रमाणे मोबदला देण्यात आला. या प्रकल्पाचे पाणी कोची, शिवणी, जरंग, जरूड, वृंदावन टाकळी या गावातील ९१५ हेक्टरमध्ये पोहोचणार आहे. प्रकल्पाचे कंत्राट पुणे येथे जगदाणी कंपनीने घेतले. या प्रकल्पावर १७ कोटी रुपये खर्च झाला आहे. त्याबदल्यात एक थेंब पाणीसुद्धा शेतकऱ्यांना मिळाले नाही. निसर्गाच्या लहरीपणामुळे शाश्वत शेती करण्यासाठी सिंचनाशिवाय दुसरा कोणताच पर्याय नाही. मात्र कोची प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रातील शेतकरी शासनाच्या उदासिन धोरणामुळे दुर्दैवी ठरत आहे. सिंचन प्रकल्पाचे काम कधीच वेळेत पूर्ण केले जात नाही. लाभक्षेत्रासोबतच बुडीत क्षेत्रातीलही शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्याची मालिकाच सिंचन प्रकल्पाच्या माध्यमातून सुरू आहे. लहान-मोठ्या सर्वच प्रकल्पांबाबत अतिशय दुर्लक्षीत धोरण राबविले जात असल्याने यात अधिकारी, कंत्राटदार गब्बर होत आहे.