शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

किशनचंद तनवाणी यांचा भाजपासोबत घरोबा

By admin | Updated: September 27, 2014 01:05 IST

औरंगाबाद : किशनचंद तनवाणी हे भाजपाकडून औरंगाबाद मध्य मतदारसंघातून निवडणूक लढविणार आहेत.

औरंगाबाद : शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख माजी आमदार किशनचंद तनवाणी हे शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करुन भाजपाकडून औरंगाबाद मध्य मतदारसंघातून निवडणूक लढविणार आहेत. उद्या २७ रोजी ते उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यांनी भाजपाचा झेंडा हाती घेतल्यामुळे मध्य विधानसभा मतदारसंघात निवडणूक आणखी रंगतदार होणार आहे. विधानपरिषदेच्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर ते राजकारणातून बाजूला फेकले गेले होते. राजकारणात टिकून राहण्यासाठी त्यांनी औरंगाबाद मध्य मधून निवडणूक लढविण्याची तयारी सुरु केली होती. पक्षाकडे तिकिटही मागितले होते. उमेदवारी मिळेल या आशेनेच त्यांनी पराभव समोर दिसत असतानाही आॅगस्ट २०१३ मध्ये झालेली विधान परिषद निवडणूक शिवसेनेकडून लढविली. मात्र, आ. प्रदीप जैस्वाल यांना आॅगस्ट २०१२ मध्ये पक्षाने उमेदवारीचा शब्द दिला होता. त्यामुळे तनवाणी यांचा पत्ता कट झाला. निवडणूक लढविण्याच्या हेतूनेच तनवाणी यांनी भाजपासोबत घरोबा करून अनेक वर्षांची शिवसेनेची साथ सोडली.सेनेकडून आ.जैस्वाल यांनी २५ रोजी ‘मध्य’मधून अर्ज भरताच तनवाणी यांची अस्वस्थता वाढली. काल पूर्ण दिवस ते ‘नॉट रिचेबल’ होते. महायुती तुटल्याचे समजताच काल सायंकाळी तनवाणी यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष आ.देवेंद्र फडणवीस, विधान परिषद विरोधी पक्षनेते आ. विनोद तावडे यांची भेट घेऊन मध्य मतदारसंघातून उमेदवारी मिळविण्यासाठी प्रयत्न केले. त्यांना उमेदवारी देण्याबाबत शुक्रवारी निश्चित झाले. त्यांच्या भाजपा प्रवेशाचे होर्डिंग्जही गुलमंडीवर झळकले. शिवसेनेचे काही नगरसेवक, पदाधिकारी सोबत असल्यामुळे त्यांनी भाजपाचा झेंडा हाती घेतल्याने सेनेत अस्वस्थता वाढली आहे. १९८८ पासून सेनेचे काम करीत असलेले तनवाणी यांना पक्षाने शहराध्यक्ष, नगरसेवक, सभागृह नेता, महापौर, आमदार ही पदे दिली. एवढी पदे मिळूनही सेनेशी फारकत घेतली. भाजपात प्रवेश का केला, याचे उत्तर देताना तनवाणी म्हणाले, हिंदुत्ववादी पक्ष आहे, त्यामुळेच प्रवेश केला आहे. निवडणूक लढविणे हादेखील उद्देश त्यामागे आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर आपली काहीही नाराजी नाही. सेनेत असताना तनवाणी यांनी राज ठाकरे यांच्याशी संपर्क वाढवला होता. पक्षाकडून काही प्रतिसाद मिळत नसल्याचे पाहून शेवटी सेनेला सोडचिठ्ठी दिली.