शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
5
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
6
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
7
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
8
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
9
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
10
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
11
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
12
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
14
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
15
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
16
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
17
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
18
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
19
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
20
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश

आमदारांच्या घरावर किसान क्रांती मोर्चा

By admin | Updated: June 9, 2017 01:49 IST

शेतकऱ्यांकडील कर्ज सरसकट माफ करावे व स्वामीनाथन आयोग लागू करावा, यासाठी राज्यभर १ जुनपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : शेतकऱ्यांकडील कर्ज सरसकट माफ करावे व स्वामीनाथन आयोग लागू करावा, यासाठी राज्यभर १ जुनपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. बुधवारी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या घरावर मोर्चा काढून या आंदोलनाचा शेवट करण्यात आला.राज्य सरकारने केवळ अल्पभूधारकाकडील कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय विदर्भातील शेतकऱ्यांना मान्य नसल्याने आंदोलन सुरू ठेवण्यात आले. बुधवारी विविध पक्षाच्या वतीने टिळक चौकातून किसन क्रांती मोर्चा काढण्यात आला. यामध्ये शेतकरी संघटना, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, संभाजी ब्रिगेड, बहुजन महासंघ या पक्षाने सहभाग घेतला होता. आमदार बोदकुरवार यांच्या घरी मोर्चा पोहोचताच आमदार बोदकुरवार निवेदन स्विकारण्यासाठी घराबाहेर आले. आंदोलनकर्त्यांशी त्यांनी चर्चा केली. शेतकऱ्यांच्या भावना मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचविण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलकांना आमदारांच्या कार्यालयाला लावलेल्या कुलूपावर मागण्यांचे पत्रक चिपकविले व आंदोलनाची सांगता केली. आंदोलनाचे नेतृत्व कॉ.दिलीप परचाके, देवराव धांडे, दिलीप भोयर, दशरथ बोबडे यांनी केले. यावेळी बौद्ध महासभेचे मिलींद पाटील, भारिप बमसंचे मंगल तेलंग, संभाजी ब्रिगेडचे अजय धोबे, बालाजी काकडे, दत्ता डोहे यांची उपस्थिती होती. कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी ठाणेदार मुकुंद कुळकर्णी यांनी आमदारांच्या निवासस्थानासमोर तगडा पोलीस बंदोबस्त ठेवला होता. बुधवारी झालेल्या मोर्चात मात्र शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांचा एकही कार्यकर्ता समाविष्ठ नसल्याने याची चर्चा नागरिकांमध्ये होत होती.