शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
2
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
3
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
4
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
5
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली
6
जिम सोडा अन् ब्रॉन्को टेस्टवर फोकस करा! टीम इंडियातील खेळाडूंना जपावा लागणार फिटनेसचा नवा 'मंत्र'
7
आरोग्य विमा आणि गंभीर आजार विम्यात काय आहे फरक? अनेकजण इन्शुरन्स घेताना करतात चूक!
8
रोज मृत्यूची भीती, तरीही खचली नाही सौंदर्यवती! कोण आहे Nadeen Ayoub? तिच्या नावाची चर्चा का?
9
श्वेताची विवाहित प्रियकरानेच केली हत्या; फिरायला घेऊन गेला आणि कार घातली तलावात, दोघांमध्ये काय बिनसलं होतं?
10
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून प्रसिद्ध खलनायकाचं कमबॅक, लूक पाहून खूश झाले चाहते
11
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
12
जीएसटी कपातीनंतरही कारवर जादा कर लागू शकतो...; सीएने केले विश्लेषण...
13
१० हजार रुपयांत भारतीय जपानमध्ये काय काय करू शकतात? रुपयाची जपानी किंमत किती?
14
दोन वर्षाच्या मुलीसह अख्ख कुटुंब मृतावस्थेत आढळल्याने खळबळ; ५ जणांसोबत नेमकं काय घडलं? 
15
अभिनेत्रीला अश्लील मेसेज करणारा तो युवा नेता कोण? समोर आली धक्कादायक माहिती, राष्ट्रीय पक्षाशी संबंध 
16
4 वर्षांत तीन वेळा प्रेग्नंट, तुरुंगवासाची शिक्षा टाळण्यासाठी महिलेने भलताच मार्ग अवलंबला...! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
17
Mumbai Crime: 'तुझ्या अंगात भूत आहे', पुजेला बोलावलं आणि ३२ वर्षीय महिलेवर मांत्रिकाने केला बलात्कार
18
श्रावण अमावस्येला पिठोरी अमावस्या का म्हणतात? त्याच दिवशी असतो पोळा आणि मातृदिन
19
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
20
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर

मस्तीखोर बालकांचा फेरफटका ठरला चक्क अपहरणाचा गुन्हा

By admin | Updated: December 25, 2016 02:31 IST

बालपणातली मैत्री ही उघड्या माळरानावर हुंदडणाऱ्या वाऱ्यासारखी असते. मित्रासाठी वाट्टेल ते करण्याची तयारी राहते.

सुरेंद्र राऊत  यवतमाळ बालपणातली मैत्री ही उघड्या माळरानावर हुंदडणाऱ्या वाऱ्यासारखी असते. मित्रासाठी वाट्टेल ते करण्याची तयारी राहते. सतत आपल्या मित्रांचाच विचार घेऊन मनसुबे आखले जातात. अगदी १० ते १४ वयोगटातील अशाच दोस्तांनी रेल्वेने फेरफटका मारण्याचे ठरविले. त्यात अनुभवी ठरला तो मातापिता नसलेला मुलगा हरिष. परिस्थितीने जगण्याची धडपड करण्याचे बळ हरिषला दिले होते. त्यानेच पुढाकार घेवून आपल्या तीन मित्रांसोबत वर्धा येथून शेगाव गाठले. मौजमस्ती करून हे टोळके वर्धेत परत आले. मात्र त्यांचे हे कृत्य कायद्याच्या भाषेत आणि भांबावलेल्या आई-वडिलांमुळे अपहरणाचा गुन्हा ठरले. चित्रपटाचं कथानक ठरेल अशी वास्तवादी घटना कळंब येथे घडली. अनाथ बालकांच्या संघर्षकथा असलेले चित्रपट प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले. यामध्ये ‘स्लम डॉग मिलेनिअर’, ‘ट्राफ्रीक सिग्नल’ आणि दाक्षिणात्य हिंदी डब सिनेमा ‘हम पाँच’ यांच्या कथानकांशी मिळतीजुळती घटना कळंब येथे घडली. आई-वडिलांचे छत्र हरवल्यानंतर अगदी बालपणातच जगण्यासाठीचा संघर्ष करण्याची वेळ या वास्तवातील हरिष (काल्पनिक नाव) याच्यावर आली. वडिलांच्या निधनानंतर आईने दुसरा विवाह केला. यानंतर काही दिवसातच आईचाही मृत्यू झाला. त्यामुळे सावत्र पित्याने दुसरा विवाह केला. आपसुकच हरिषला घराबाहेर काढले. कळंबच्या हलबीपुरा भागात राहणाऱ्या हरिषची ही कहाणी आहे. सावत्र वडिलाच्या घरासमोर असलेल्या टपरीवजा किराणा दुकानात त्याने आश्रय घेतला. त्याची ही परिस्थिती पाहून काही सद्हृदयी माणसांनी त्याला कोटंबा येथील तथागत विद्यालयात दाखल केले. मात्र इयत्ता आठवीतच त्याची शाळा सुटली. त्यानंतर हरिषचा जगाशी संघर्ष सुरू झाला. मिळेल तिथे काम करायचे आणि आलेला दिवस ढकलायचा, इतकीच त्याची दीनचर्या होती. या दु:खाच्या स्थितीतही वस्तीतील त्याचे सवंगडी मात्र कायम त्याच्यासोबत सावलीसारखे राहात होते. कामातून उसंत मिळाली की हरिष हलबीपुरा भागातील सवंगड्यांसोबत खेळात रमायचा. एक दिवस या बच्चेकंपनीने रेल्वेतून प्रवास करण्याचा बेत आखला. मग जायचे कुठे? तर शेगाव येथील आनंदसागरला जाऊन मौजमजा करायची, असे ठरले. १०, १२ आणि १३ या वयोगटातील दोस्तांमध्ये १४ वर्षांचा हरिषच थोडा मोठा होता. त्यामुळे या बेताची जबाबदारी त्याने स्वीकारली. ठरल्याप्रमाणे ही मंडळी ४ डिसेंबरला घरून निघून गेले. त्यांनी कुणालाही कुठे जाणार आहोत, याची माहिती दिली नाही. त्यांनी वर्धा येथून शेगाव गाठले. त्यांनी विनातिकीट रेल्वे प्रवासचा मनसोक्त आनंद लुटला. संपूर्ण दिवस शेगावात घालवल्यानंतर सायंकाळी ते वर्धेत परत आले. येथे आल्यानंतर कळंबच्या एका युवकाला या चौघांचा कंपू दिसला. त्याने ही माहिती त्यांच्या आई-वडिलांना दिली. दोन दिवसांपासून मुलं बेपत्ता असल्याने इकडे तिघांच्याही आई-वडिलांचा जीव टांगणीला लागला होता. त्यामुळे ही माहिती मिळताच सर्वांनी तत्काळ वर्धा रेल्वे स्टेशन गाठले. दरम्यान, आता आपल्यालाच सर्वजण दोषी ठरवून बेदम मारतील, या भीतीने हरिष तेथून पसार झाला. इथेच त्याच्या माथ्यावर अपहरणाचा गुन्हा नोंदविला गेला. हरिष हा मुलांना मुंबईला विकण्यासाठी नेत होता, असाही आरोप त्याच्यावर लावण्यात आला. या प्रकरणात त्या तीन मुलांच्या मात्यापित्यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी हरिषविरोधात अपहरणासारखा गंभीर गुन्हा नोंदविला गेला. त्यानंतर या गुन्ह्याचा अधिकृत तपास पोलीस उपनिरीक्षक चंद्रशेखर ठाकरे, अशोक गायकी यांच्याकडे सोपविण्यात आला. या घटनेनंतर हरिष लगेच कळंब येथे परत आला. त्यानंतरच त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. महिला व बालकल्याण समितीपुढे हरिषचा जवाब नोंदविला गेला. यातूनच या अपहरणाच्या गुन्ह्याचे वास्तव पुढे आले. गावगाड्यात जगण्यासाठी संघर्ष करणाऱ्या हरिषचा कुणी वाली नसल्याने त्याच्यावर याहीपूर्वी छोट्या-मोठ्या घटनेत आरोप झाले आहेत. मात्र, पोलिसांनी याची कुठे अधिकृत नोंद घेतली नव्हती. ही घटना मात्र भावनिक असल्याने शेवटी हरिषची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली. वस्तीतील सवंगड्यांसोबत त्यांच्या कट्ट्यावर बसून ठरलेला बेत थेट हरिषला सुधारगृहात घेवून गेला. या वास्तवादी घटनेतून एखाद्या दर्जेदार चित्रपटाची निर्मिती होईल, इतके पैलू आहेत.