शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
4
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
5
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
6
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
7
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
8
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
9
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
10
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
11
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
12
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
13
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
14
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
15
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
16
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
17
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
18
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
19
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
20
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
Daily Top 2Weekly Top 5

मित्रच ठरला शेतकऱ्यांसाठी कर्दनकाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2020 05:00 IST

पूर्वी शेतशिवारात सर्पदंशाच्या घटना क्वचित घडत होत्या. आता सर्पदंशाचे प्रमाण वाढले आहे. याला पीक पद्धती कारणीभूत ठरली आहे. कपाशीला पर्यायी पीक म्हणून शेतकऱ्यांनी सोयाबीनची निवड केली. पेरणीनंतर शेतशिवार हिरव्या पिकाने झाकून जाते. त्यात अधिक पाऊस झाला तर संपूर्ण पीक दाटते. यामुळे जमिनीवर बेसावधपणे पाय पडला तर सर्पदंशाचा दाट धोका असतो.

ठळक मुद्देजिल्ह्यात ३३९ शेतकऱ्यांना सर्पदंश : गतवर्षी ५०१ शेतकºयांना चावला साप

रूपेश उत्तरवार।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : पावसाळ्यात शेतशिवार हिरवेकंच होते. यामुळे पायाखालची जमीनही दृष्टीस पडत नाही. अशा परिस्थितीत श्वापदांचा वावर वाढतो. पिकांमध्ये बिनधास्त फिरताना सर्पदंशाचा धोकाही वाढतो. दरवर्षी अशा शेकडो घटना घडतात. अलीकडे या घटना वाढत आहेत. जुलै ते सप्टेंबरमध्ये सर्पदंशाची अनेक प्रकरणे पुढे येतात. जिल्ह्यात सात महिन्यात ३३९ जणांना सर्पदंश झाल्याची नोंद वैैैैैद्यकीय महाविद्यालयाने केली आहे.यामध्ये जुलै ते ऑगस्ट महिन्यात सर्वाधिक सर्पदंशाच्या नोंदी करण्यात आल्या आहेत. यामुळे शेतकºयांच्या पिकांचे संरक्षण करणारा साप शेतकºयांसाठीच कर्दनकाळ ठरला.यवतमाळ जिल्हा हा डोंगरांनी वेढला आहे. सह्याद्री पर्वतरांगेचे हे सर्वात शेवटचे टोक आहे. सापांना पोषक वातावरण या भागात आहे. यामुळे सापांच्या विविध दुर्मिळ प्रजाती या भागात पहायला मिळतात. सापांना शेतकऱ्यांचा मित्र म्हणतात. कारण तो शेतशिवारात उंदीर आणि इतर किड्यांना खातो. मात्र त्यावर पाय पडला तर तो शेतकऱ्यांसाठी जीवघेणा ठरतो.पूर्वी शेतशिवारात सर्पदंशाच्या घटना क्वचित घडत होत्या. आता सर्पदंशाचे प्रमाण वाढले आहे. याला पीक पद्धती कारणीभूत ठरली आहे. कपाशीला पर्यायी पीक म्हणून शेतकऱ्यांनी सोयाबीनची निवड केली. पेरणीनंतर शेतशिवार हिरव्या पिकाने झाकून जाते. त्यात अधिक पाऊस झाला तर संपूर्ण पीक दाटते. यामुळे जमिनीवर बेसावधपणे पाय पडला तर सर्पदंशाचा दाट धोका असतो.जुलै, ऑगस्ट, आणि सप्टेंबर महिन्यात अशा घटना मोठ्या प्रमाणात घडतात. या महिन्यात पीक जोमदार अवस्थेत असतात. पोषक वातावरणाने पीक जोमाने वाढतात. यामुळे जमीन दिसत नाही. फवारणी अथवा निंदण करण्यासाठी गेले तर अशा ठिकाणी दडून असलेला साप बाहेर पडतो. आपला पाय पडल्याने साप स्वत:चा जीव वाचविण्यासाठी प्रतीहल्ला चढवितो. यात शेतकरी, शेतमजूर जखमी होतात.अनेकवेळा साप चावल्यानंतर त्यांच्यावर रूग्णालयात उपचार करण्यापूर्वी मांत्रिकाकडे नेले जाते. काही जागृक शेतकरी सर्पदंश झालेल्या शेतकऱ्यांना दवाखान्याकडे नेतात. त्या ठिकाणी सर्पदंशावर उपचार केला जातो. यातून ९९ टक्के शेतकरी बरे होतात.शेतकऱ्यांना रखवालीसाठी अनेकवेळा रात्रीला जावे लागते. रात्री रखवाली करताना सर्पदंशाच्या घटना घडतात. तर वीज भारनियमनामुळे रात्रीच्या शेड्यूललाच पाणी येते. अशा परिस्थितीत शेतकरी रात्री शेतशिवारात असतात. या ठिकाणी सर्पदंशाच्या घटनेचा सामना करावा लागतो. यामुळे सर्पदंशाच्या संख्येत वारंवार भर पडत आहे.दवाखान्यापर्यंत येणारे रुग्ण वाचतातसाप चावल्यानंतर त्याला वैदूकडे न नेता दवाखान्यात आणले तर त्याचा प्राण वाचतो. याकरिता प्रथमोपचारही तत्काळ करता येतात. मात्र डॉक्टरांपर्यंत सर्पदंश झालेल्या व्यक्तीला पोहोचविले पाहिजे.

टॅग्स :snakeसापFarmerशेतकरी