शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय सैन्यानं केली पाकची फजिती; पत्रकार परिषदेत फोटो दाखवत खोट्या दाव्याची पोलखोल
2
Operation Sindoor Live Updates: भारताच्या २६ ठिकाणांवर पाकिस्तानचा हल्ल्याचा प्रयत्न
3
भारताच्या हल्ल्यानंतर झालेलं नुकसान लपवण्यासाठी पाकिस्तानची धडपड, काय काय करतंय वाचाच 
4
भारताच्या हल्ल्याने पाकिस्तान बिथरला! पंतप्रधान शाहबाज यांचं आणखी एक नापाक पाऊल; अण्वस्त्रांशी थेट संबंध
5
कॅश, एटीएम, युपीआय... पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान सीतारामन यांचे बँकांना अलर्ट राहण्याचे निर्देश
6
राष्ट्रीय पुरस्कार विजेते मेकअप आर्टिस्ट विक्रम गायकवाड यांचं निधन
7
India vs Pakistan : जीडीपी, जॉब आणि डेव्हलपमेंटमध्ये पाकिस्तानची दूरपर्यंत भारताशी तुलना नाही; पाहा 'ही' आकडेवारी
8
India Pakistan Tension : पाकिस्तानच्या मिसाईलचे तुकडे हरियाणाच्या शेतात! सेनेने घेतले ताब्यात; दिल्लीवर होता निशाणा 
9
शिवाजी साटम यांच्या कमबॅकनंतर पार्थ समथानची CID 2 मधून एक्झिट; म्हणाला, "हे आधीच..."
10
India Pakistan: आणखी एक घाव! भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या चौक्या आणि दहशतवादी लॉन्चिंग पॅड्स उडवले, व्हिडीओ बघा
11
India Pakistan Tension : खेळ महत्त्वाचा; पण आधी देश! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा खास संदेश
12
भारताविरोधात पाकिस्तानचं ऑपरेशन 'बुनयान उल मरसूस'; काय आहे या शब्दाचा अर्थ?
13
पाकिस्तानकडून भारताच्या नागरी वस्त्यांवर भ्याड हल्ले; घरांचे नुकसान, काही जखमी
14
Tarot Card: एकावेळी एका गोष्टीवर लक्ष द्या, नाहीतर तारांबळ उडेल; आगामी आठवडा संयम पाहणारा!
15
"मसूद अजहर-हाफिज सईद बिनधास्त फिरत आहेत...", 'गोपी बहू'नं पाकिस्तानला दाखवला आरसा, म्हणाली - युद्ध व्हायलाच पाहिजे...
16
Virat Kohli Test Retirement: रोहित शर्मानंतर विराट कोहलीचाही कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय? BCCI ला दिली माहिती
17
इंटरनॅशनल मॉनेटरी फंड की 'टेररिस्ट फंड'? पाकिस्तानला IMF च्या फंडिंगवर भडकल्या प्रियंका चतुर्वेदी
18
India Pakistan Tension : उडवून टाकलं! भारत-पाक हल्ल्यादरम्यान अमृतसरमध्ये पाडले ड्रोन
19
India Pakistan: पाकिस्तानच्या हल्ल्यात जम्मूमध्ये आयुक्तांचा मृत्यू, अब्दुल्ला म्हणाले, हादरवून टाकणारी बातमी

मित्रच ठरला शेतकऱ्यांसाठी कर्दनकाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2020 05:00 IST

पूर्वी शेतशिवारात सर्पदंशाच्या घटना क्वचित घडत होत्या. आता सर्पदंशाचे प्रमाण वाढले आहे. याला पीक पद्धती कारणीभूत ठरली आहे. कपाशीला पर्यायी पीक म्हणून शेतकऱ्यांनी सोयाबीनची निवड केली. पेरणीनंतर शेतशिवार हिरव्या पिकाने झाकून जाते. त्यात अधिक पाऊस झाला तर संपूर्ण पीक दाटते. यामुळे जमिनीवर बेसावधपणे पाय पडला तर सर्पदंशाचा दाट धोका असतो.

ठळक मुद्देजिल्ह्यात ३३९ शेतकऱ्यांना सर्पदंश : गतवर्षी ५०१ शेतकºयांना चावला साप

रूपेश उत्तरवार।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : पावसाळ्यात शेतशिवार हिरवेकंच होते. यामुळे पायाखालची जमीनही दृष्टीस पडत नाही. अशा परिस्थितीत श्वापदांचा वावर वाढतो. पिकांमध्ये बिनधास्त फिरताना सर्पदंशाचा धोकाही वाढतो. दरवर्षी अशा शेकडो घटना घडतात. अलीकडे या घटना वाढत आहेत. जुलै ते सप्टेंबरमध्ये सर्पदंशाची अनेक प्रकरणे पुढे येतात. जिल्ह्यात सात महिन्यात ३३९ जणांना सर्पदंश झाल्याची नोंद वैैैैैद्यकीय महाविद्यालयाने केली आहे.यामध्ये जुलै ते ऑगस्ट महिन्यात सर्वाधिक सर्पदंशाच्या नोंदी करण्यात आल्या आहेत. यामुळे शेतकºयांच्या पिकांचे संरक्षण करणारा साप शेतकºयांसाठीच कर्दनकाळ ठरला.यवतमाळ जिल्हा हा डोंगरांनी वेढला आहे. सह्याद्री पर्वतरांगेचे हे सर्वात शेवटचे टोक आहे. सापांना पोषक वातावरण या भागात आहे. यामुळे सापांच्या विविध दुर्मिळ प्रजाती या भागात पहायला मिळतात. सापांना शेतकऱ्यांचा मित्र म्हणतात. कारण तो शेतशिवारात उंदीर आणि इतर किड्यांना खातो. मात्र त्यावर पाय पडला तर तो शेतकऱ्यांसाठी जीवघेणा ठरतो.पूर्वी शेतशिवारात सर्पदंशाच्या घटना क्वचित घडत होत्या. आता सर्पदंशाचे प्रमाण वाढले आहे. याला पीक पद्धती कारणीभूत ठरली आहे. कपाशीला पर्यायी पीक म्हणून शेतकऱ्यांनी सोयाबीनची निवड केली. पेरणीनंतर शेतशिवार हिरव्या पिकाने झाकून जाते. त्यात अधिक पाऊस झाला तर संपूर्ण पीक दाटते. यामुळे जमिनीवर बेसावधपणे पाय पडला तर सर्पदंशाचा दाट धोका असतो.जुलै, ऑगस्ट, आणि सप्टेंबर महिन्यात अशा घटना मोठ्या प्रमाणात घडतात. या महिन्यात पीक जोमदार अवस्थेत असतात. पोषक वातावरणाने पीक जोमाने वाढतात. यामुळे जमीन दिसत नाही. फवारणी अथवा निंदण करण्यासाठी गेले तर अशा ठिकाणी दडून असलेला साप बाहेर पडतो. आपला पाय पडल्याने साप स्वत:चा जीव वाचविण्यासाठी प्रतीहल्ला चढवितो. यात शेतकरी, शेतमजूर जखमी होतात.अनेकवेळा साप चावल्यानंतर त्यांच्यावर रूग्णालयात उपचार करण्यापूर्वी मांत्रिकाकडे नेले जाते. काही जागृक शेतकरी सर्पदंश झालेल्या शेतकऱ्यांना दवाखान्याकडे नेतात. त्या ठिकाणी सर्पदंशावर उपचार केला जातो. यातून ९९ टक्के शेतकरी बरे होतात.शेतकऱ्यांना रखवालीसाठी अनेकवेळा रात्रीला जावे लागते. रात्री रखवाली करताना सर्पदंशाच्या घटना घडतात. तर वीज भारनियमनामुळे रात्रीच्या शेड्यूललाच पाणी येते. अशा परिस्थितीत शेतकरी रात्री शेतशिवारात असतात. या ठिकाणी सर्पदंशाच्या घटनेचा सामना करावा लागतो. यामुळे सर्पदंशाच्या संख्येत वारंवार भर पडत आहे.दवाखान्यापर्यंत येणारे रुग्ण वाचतातसाप चावल्यानंतर त्याला वैदूकडे न नेता दवाखान्यात आणले तर त्याचा प्राण वाचतो. याकरिता प्रथमोपचारही तत्काळ करता येतात. मात्र डॉक्टरांपर्यंत सर्पदंश झालेल्या व्यक्तीला पोहोचविले पाहिजे.

टॅग्स :snakeसापFarmerशेतकरी