शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
3
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
4
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
5
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
6
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
7
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
8
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
9
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
10
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
11
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
12
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
13
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
14
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
15
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
16
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
17
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
18
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
19
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
20
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल

कपाडी तलाव मंजूर करावा

By admin | Updated: December 18, 2014 02:28 IST

२५ वर्षांपासून तालुक्यातील सुकळी (जा) या गावालगत कपाडी तलाव निर्माण करून या भागातील पिण्याचा व सिंचनाचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी संघर्ष समितीचा संघर्ष सुरू आहे.

उमरखेड (कुपटी) : २५ वर्षांपासून तालुक्यातील सुकळी (जा) या गावालगत कपाडी तलाव निर्माण करून या भागातील पिण्याचा व सिंचनाचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी संघर्ष समितीचा संघर्ष सुरू आहे. त्याला तत्काळ मान्यता देण्यात यावी, अन्यथा सात गावचे नागरिक नागपूर येथे विधान भवनासमोर १९ डिसेंबरला आत्मदहन करतील, असा इशारा संबंधित नागरिकांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून दिला आहे.या इशाऱ्यामुळे प्रशासनात एकच खळबळ माजली आहे. सुकळी गावापासून काही अंतरावर कपाडी तलाव निर्माण करावा, अशी मागणी आहे. सुकळीसोबतच बोथा, चिल्ली, दहागाव, नागेशवाडी, आमनपूर, वरुड बिबी या सात गावातील नागरिकांनी एकत्र येवून कपाडी तलाव संघर्ष समितीची स्थापना केली. तेव्हापासून आजपर्यंत या मागणीसाठी रास्ता रोको, उपोषण, मोर्चे, निवेदने अशी अनेक आंदोलने केली. परंतु प्रशासनाने या गंभीर प्रश्नाकडे कधीही लक्ष दिले नाही. दिवसेंदिवस या सातही गावातील पाण्याची पातळी कमी होत आहे. या भागातील हजारो हेक्टर शेती सिंचनापासून वंचित आहे. तसेच गावात पाणीटंचाईदेखील तीव्र प्रमाणात आहे. गेल्या २५ वर्षांपासून उमरखेड युवक काँग्रेसचे अध्यक्ष डॉ.दशरथ वानखडे यांच्या नेतृत्वात तलाव संघर्ष समितीने सतत संबंधित आमदार, खासदार, जलसंपदा मंत्री व मुख्यमंत्र्यांकडे जावून या प्रश्नाचा पाठपुरावा केला. परंतु त्याची दखल घेण्यात आली नाही. हा संषर्घ सुरू असतानाच डॉ.वानखडे यांचे अपघाती निधन झाले. परंतु त्यानंतरही गावकऱ्यांनी त्यांच्या पत्नी संगीता वानखडे यांना तलाव संघर्ष समितीच्या अध्यक्षपदी नियुक्त करून हा लढा अधिक तीव्र केला. काही दिवसांपूर्वीच उमरखेडचे आमदार राजेंद्र नजरधने यांनी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांची नागपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची भेट घालून दिली. त्यावेळी हा प्रश्न निकाली न निघाल्यास १९ डिसेंबरला या सातही गावातील नागरिक आत्मदहन करणार असल्याचा इशारा नागरिकांनी दिला. तसेच अकोला पाटबंधारे विभाग, जिल्हाधिकारी यवतमाळ, लघु सिंचन व जलसंधारण आदी संबंधित विभागांना या बाबतचे निवेदन देण्यात आले आहे. त्यामुळे शासनाने हा प्रश्न त्वरित निकाली न काढल्यास नागपूर येथे आत्मदहन करणारच, असे संघर्ष समितीचे अध्यक्ष संगीता वानखडे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. (वार्ताहर)