शहरं
Join us  
Trending Stories
1
केजरीवालांचा शीषमहल, तर रेखा गुप्तांचा 'मायामहल'; ९ लाखांचे टीव्ही, रिनोवेशनसाठी ६० लाखांचे टेंडर
2
विराट-रोहितच्या संदर्भात आली मोठी अपडेट; टीम इंडियाच्या चाहत्यांचा पुन्हा होणार 'मूड ऑफ'
3
होम लोन घेण्याचा विचार करताय? ३ सरकारी बँकांनी कमी केले व्याजदर; पाहा कोणत्या बँकेत मिळतंय स्वस्त कर्ज
4
हृदयद्रावक! खेळताना प्लास्टिकचा बॉल गिळला; दीड वर्षांच्या लेकीचा पालकांसमोर तडफडून मृत्यू
5
"माझा मुलगा मानव ठणठणीत आहे...", मुलाच्या आत्महत्येची खोटी बातमी पसरवणाऱ्यांवर संतापली रेशम टिपणीस
6
मुंबईतील तरुणीवर अलिबागमध्ये बलात्कार, पार्टीनंतर ऑफिसमधील सहकाऱ्यानेच केला घात; पीडितेसोबत काय घडलं?
7
इराणसोबत गेम झाला ...! इस्रायलवरील हल्ले रोखण्यासाठी लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर पाठविलेली...
8
पालकांनो लक्ष द्या! मुलांच्या शिक्षणासाठी आणि लग्नासाठी 'ही' SIP ठरेल गेम चेंजर!
9
मेळाव्यात कोण कुठे बसणार? कुणाची भाषणं होणार? सगळं ठरलं; दोन्ही ठाकरेंचं १५ मुद्द्यांवर एकमत...
10
SEBI ची मोठी कारवाई, शेअर बाजारात या कंपनीला बंदी; ₹४८४३ कोटींचा नफाही होणार जप्त
11
Viral Video: इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्याचा व्हिडीओ पाहून अंगाचा थरकाप उडेल!
12
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांच्या नातेवाईकांचे एअर इंडियावर गंभीर आरोप, कंपनीनं दिलं असं स्पष्टीकरण
13
Sonam Raghuwanshi : "मला सतत वकिलांचे फोन येताहेत, पण माझी एक अट..."; सोनमच्या भावाने स्पष्टच सांगितलं
14
AI म्हणालं, चूप, तुझं अफेअर उघड करीन! एआय माॅडेलच्या या धमकीनं साऱ्यांनाच धडकी भरली
15
महागाई भत्त्यात ४ टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता; मोदी सरकार कर्मचाऱ्यांना देऊ शकतं मोठं गिफ्ट
16
टाटांच्या या कंपनीला मोठा धक्का! एका घोषणेने शेअर ९% घसरला, गुंतवणूकदारांचे लाखो कोटी बुडाले!
17
छत्रपती संभाजीनगर हादरलं; काळा गणपती मंदिरासमोर कारने ६ जणांना उडवलं, एकाचा मृत्यू
18
तरुण दिसण्यासाठी भारतीय लाखो रुपये उधळतायेत? ग्लुटाथिओनची किंमत पाहून धक्का बसेल!
19
IND vs ENG: भारताने इंग्लंडच्या 'बॅझबॉल'ची काढली हवा, नवा रेकॉर्ड बनवला; पाकिस्तानला टाकले मागे
20
पंतप्रधान कमलांसह 38 मंत्री, 4 खासदार; PM मोदींच्या स्वागतासाठी पूर्ण मंत्रिमंडळ विमानतळावर दाखल

कपाडी तलाव मंजूर करावा

By admin | Updated: December 18, 2014 02:28 IST

२५ वर्षांपासून तालुक्यातील सुकळी (जा) या गावालगत कपाडी तलाव निर्माण करून या भागातील पिण्याचा व सिंचनाचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी संघर्ष समितीचा संघर्ष सुरू आहे.

उमरखेड (कुपटी) : २५ वर्षांपासून तालुक्यातील सुकळी (जा) या गावालगत कपाडी तलाव निर्माण करून या भागातील पिण्याचा व सिंचनाचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी संघर्ष समितीचा संघर्ष सुरू आहे. त्याला तत्काळ मान्यता देण्यात यावी, अन्यथा सात गावचे नागरिक नागपूर येथे विधान भवनासमोर १९ डिसेंबरला आत्मदहन करतील, असा इशारा संबंधित नागरिकांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून दिला आहे.या इशाऱ्यामुळे प्रशासनात एकच खळबळ माजली आहे. सुकळी गावापासून काही अंतरावर कपाडी तलाव निर्माण करावा, अशी मागणी आहे. सुकळीसोबतच बोथा, चिल्ली, दहागाव, नागेशवाडी, आमनपूर, वरुड बिबी या सात गावातील नागरिकांनी एकत्र येवून कपाडी तलाव संघर्ष समितीची स्थापना केली. तेव्हापासून आजपर्यंत या मागणीसाठी रास्ता रोको, उपोषण, मोर्चे, निवेदने अशी अनेक आंदोलने केली. परंतु प्रशासनाने या गंभीर प्रश्नाकडे कधीही लक्ष दिले नाही. दिवसेंदिवस या सातही गावातील पाण्याची पातळी कमी होत आहे. या भागातील हजारो हेक्टर शेती सिंचनापासून वंचित आहे. तसेच गावात पाणीटंचाईदेखील तीव्र प्रमाणात आहे. गेल्या २५ वर्षांपासून उमरखेड युवक काँग्रेसचे अध्यक्ष डॉ.दशरथ वानखडे यांच्या नेतृत्वात तलाव संघर्ष समितीने सतत संबंधित आमदार, खासदार, जलसंपदा मंत्री व मुख्यमंत्र्यांकडे जावून या प्रश्नाचा पाठपुरावा केला. परंतु त्याची दखल घेण्यात आली नाही. हा संषर्घ सुरू असतानाच डॉ.वानखडे यांचे अपघाती निधन झाले. परंतु त्यानंतरही गावकऱ्यांनी त्यांच्या पत्नी संगीता वानखडे यांना तलाव संघर्ष समितीच्या अध्यक्षपदी नियुक्त करून हा लढा अधिक तीव्र केला. काही दिवसांपूर्वीच उमरखेडचे आमदार राजेंद्र नजरधने यांनी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांची नागपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची भेट घालून दिली. त्यावेळी हा प्रश्न निकाली न निघाल्यास १९ डिसेंबरला या सातही गावातील नागरिक आत्मदहन करणार असल्याचा इशारा नागरिकांनी दिला. तसेच अकोला पाटबंधारे विभाग, जिल्हाधिकारी यवतमाळ, लघु सिंचन व जलसंधारण आदी संबंधित विभागांना या बाबतचे निवेदन देण्यात आले आहे. त्यामुळे शासनाने हा प्रश्न त्वरित निकाली न काढल्यास नागपूर येथे आत्मदहन करणारच, असे संघर्ष समितीचे अध्यक्ष संगीता वानखडे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. (वार्ताहर)