शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
2
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
3
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
4
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
5
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
6
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
7
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
8
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
9
"मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो, कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
10
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
11
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
12
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
13
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
14
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
15
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
16
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
17
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
18
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
19
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
20
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात

कळंब कृषी कार्यालयात कपाशीची बोंडे फेकली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 21:59 IST

तालुक्यात कपाशीवर मोठ्या प्रमाणात गुलाबी बोंडअळीने आक्रमण केले. त्याच्या सर्वेक्षणासाठी शेतकऱ्यांनी तालुका कृषी कार्यालयाकडे अर्ज केले.

ठळक मुद्देअधिकाऱ्याच्या खुर्चीला हार : शेतकऱ्यांच्या घोषणा-घेराव

आॅनलाईन लोकमतकळंब : तालुक्यात कपाशीवर मोठ्या प्रमाणात गुलाबी बोंडअळीने आक्रमण केले. त्याच्या सर्वेक्षणासाठी शेतकऱ्यांनी तालुका कृषी कार्यालयाकडे अर्ज केले. मात्र अद्याप सर्वेक्षण करून अहवाल सादर न झाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी मंगळवारी तालुका कृषी कार्यालयाला घेराव घातला. यावेळी निषेधाच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.आत्तापर्यंत ७०० च्यावर शेतकऱ्यांनी स्वतंत्रपणे अर्ज करून बोंडअळीचे सर्वेक्षण करण्याची मागणी केली. मात्र केवळ ४० शेतकऱ्यांच्या शेताचेच सर्वेक्षण पूर्ण झाले. त्याचाही अहवाल तयार नाही. याचा जाब विचारण्यासाठी मंगळवारी शेकडो शेतकरी येथील कृषी कार्यालयावर धडकले. मात्र तालुका कृषी अधिकारी संजय पाठक व अधिनिस्त कृषी अधिकारी हजर नव्हते.त्यांच्याशी फोनवर संपर्क करण्यात आला. मात्र प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकºयांनी शेतातून जमा करुन आणलेली कपाशीची बोंडे कृषी अधिकाºयांच्या कक्षात भीरकावले. त्यांच्या टेबलवर बोंडे ठेवून निषेध म्हणून खुर्चीला हार घातला.यावेळी बियाणे कंपनी व कृषी विभागाच्या कारभाराचा निषेध नोंदविण्यात आला. त्यानंतर चक्क कृषी विभागाच्या कार्यालयातच शेतकऱ्यांनी सभा घेऊन आपल्या भावना व्यक्त करुन शेतकऱ्यांना कसे नागविले जाते, याचा पाढा वाचला. न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरु ठेवण्याचा निर्धार केला. बियाणे कंपनीविरूद्ध न्यायालयात दाद मागण्याचा निर्णयही घेण्यात आला.