शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
2
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
3
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
4
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
5
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
6
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
7
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
8
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
9
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
10
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
11
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
12
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
13
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
14
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
15
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
16
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
17
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
18
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
19
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
20
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...

कळंबच्या शेतकऱ्याचे वीज कनेक्शनच गेले चोरीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:44 IST

गजानन अक्कलवार कळंब : येथील एका शेतकऱ्यावर शेतातील वीज जोडणीच चोरीला गेली म्हणण्याची वेळ आली आहे. कारण जोडणी नसतानाही ...

गजानन अक्कलवार

कळंब : येथील एका शेतकऱ्यावर शेतातील वीज जोडणीच चोरीला गेली म्हणण्याची वेळ आली आहे. कारण जोडणी नसतानाही बिल देण्याचा प्रताप येथील वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.

कळंब येथे खंड -१ मधील सर्व्हे नंबर २९७ हे नंदकिशोर महादेव दलाल यांच्या मालकीचे शेत आहे. २०१७ मध्ये त्यांनी शेतातील विहिरीवर मोटार पंपाकरिता वीज जोडणीची मागणी केली. त्यासाठी रीतसर अर्ज दिला. वारंवार कार्यालयात चकरा मारल्या. त्यानंतर आपल्या नावाने वीज कनेक्शन आल्याची माहिती त्यांना देण्यात आली; परंतु अद्याप त्यांना वीज जोडणी मिळाली नाही. त्यामुळे ते वैतागून गेले. मात्र, २०१९ पासून त्यांना विजेचे बिल नियमित दिले जात आहे. वीज जोडणी नसताना बिल कसे, असा प्रश्न त्यांना पडला आहे.

तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना वर्षानुवर्षांपासून वीज जोडणीची आस आहे. काही दिवसांपूर्वी परसोडी (बु.) येथील शेतकऱ्याने वीज जोडणी करण्यास टाळाटाळ होत असल्याने आत्महत्येचा इशारा दिला होता. एवढेच नाही तर जोडणी करताना तोंड पाहून ती केली जाते, असा आरोपही करण्यात आला होता. येथील भोंगळ कारभाराचा फटका शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज आहे.

बॉक्स

असा झाला भंडाफोड

शेतकरी नंदकिशोर दलाल यांना त्यांच्या ओळखीतल्या एका कर्मचाऱ्याने वीज बिल बाकी असल्याची माहिती दिली. मात्र, जोडणीच नसताना बिल कसे, असा त्यांना प्रश्न पडला. याची खातरजमा करण्यासाठी त्यांनी ऑनलाइन तपासणी केली. त्यात आपल्या नावाचे बिल पाहून त्यांना धक्का बसला. आता तरी त्वरित जोडणी करून द्यावी. एवढेच नाही तर या प्रकरणात हयगय करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी नंदकिशोर दलाल यांनी केली आहे. शाखा अभियंता अभिजीत भोयर यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी या प्रकरणाची माहिती घेणार असल्याचे सांगितले.