शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

कळंबमध्ये पहिल्यांदाच काकड आरती

By admin | Updated: November 7, 2016 01:12 IST

आजच्या विज्ञान युगातही धार्मिक परंपरेचे महत्व टिकून आहे. त्यामुळेच गावखेड्यातील काकडा आरतीची परंपरा निरंतर सुरू आहे.

टाळ मृदंगाचा स्वर : वृध्दांसह युवकांचा पुढाकार, चिंतामणी देवस्थान भक्त मंडळकळंब : आजच्या विज्ञान युगातही धार्मिक परंपरेचे महत्व टिकून आहे. त्यामुळेच गावखेड्यातील काकडा आरतीची परंपरा निरंतर सुरू आहे. यावर्षी तर प्रथमच कळंब शहरात चिंतामणी विश्वस्तांच्या पुढाकारातून काकडा आरतीला प्रारंभ झाला. टाळ मृदंग, चिपळ्या, शंख, तानपुरा, घंटानांद आणि झांजच्या स्वरांनी चिंतामणी नगरीतील नागरिकांची पहाटारंभ उल्हासित वातावरणात होत आहे. कळंबच्या इतिहासात प्रथमच चिंतामणी देवस्थान, अनुसया देवस्थान, मोरया भक्तमंडळ व सत्यसाई भक्त मंडळाच्या पुढाकारातून नवीन काकडा आरतीला सुुरुवात झाली. टाळ, मृदंग, हरिनामाचा गजर करीत वृध्द महिला-पुरुष, युवक-युवती यात सहभागी असतात. पहाटे पाच वाजता श्री चिंतामणी मंदिरात सर्वजण एकत्र येतात. त्यानंतर घंटानांद करुन काकडे पेटऊन धार्मिक गीतांची सुरुवात होते. ‘जय जय राम कृृष्ण हरी...’ या भजनाने भक्तिमय वातावरणात नगरभ्रमणाला सुरुवात केली जाते. कडाक्याच्या थंडीतही पहाटे उठून अनवाणी पायांनी चालत मोठ्या भक्तीभावाने हरिनामाचा गरज केला जातो. यात परिसर भक्तीमय होऊन जातो. गावातील रोज एका मंदिरात काकडा पोहचतो. तेथे एका तालासुरात आणि मंजुळ आवाजात भजन कीर्तन आणि आरती म्हटली जाते. तेथून काकडा थेट श्री चिंतामणी मंदिरात पोहोचतो. तेथेही पुष्पांजली, प्रसादगीत व काकडा आरती व इतर धार्मिक विधी पार पाडल्यानंतर सर्वांना फराळ, चहापाणी देऊन आरतीचा समारोप होतो. कोजागिरी पोर्णिमेपासून काकडा आरतीला प्रारंभ झाला. आरतीची समाप्ती कार्तिक पौर्णिमेला काल्याच्या कीर्तनानंतर प्रसाद वाटप करुन करण्यात येणार आहे. एक महिना चालणारा हा उत्सव निद्रिस्त देवांना जागविण्यासाठी केला जातो, असे म्हटले जाते. चिंतामणी देवस्थानात पांढऱ्या सूतापासून तयार केला जाणारा काकडा आरतीसाठी पेटविला जातो. तो सर्व भक्तांना दिला जातो. त्यानंतर टाळमृदंगाच्या तालावर आरतीला प्रारंभ होतो. काकडा आरतीच्या मार्गावर पहाटेपासूनच अंगणात सडासारवण करुन रांगोळ्या टाकल्या जातात. विशेष म्हणजे युवकांचा आरतीत मोठा सहभाग असतो. काकड आरतीसाठी संपूर्ण गावकऱ्यांचे सहकार्य लाभत आहे. (तालुका प्रतिनिधी)