शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
3
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
4
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
5
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
6
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
7
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
8
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
9
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
10
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
11
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
12
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
13
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
14
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
15
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
16
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
17
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
18
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
19
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
20
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
Daily Top 2Weekly Top 5

न्यायालयीन गुन्हे निकालाचे प्रमाण केवळ सहा टक्के

By admin | Updated: June 24, 2016 02:46 IST

नागरिकांचे सहकार्य मिळत नसल्याने न्यायालयीन गुन्हे निकालाचे प्रमाण केवळ सहा ते सात टक्के आहे.

संजीवकुमार सिंघल : नागरिकांचे सहकार्य मिळत नसल्याचा ठपकापुसद : नागरिकांचे सहकार्य मिळत नसल्याने न्यायालयीन गुन्हे निकालाचे प्रमाण केवळ सहा ते सात टक्के आहे. पोलीस आणि जनता यांच्यात मैत्री भावना निर्माण करण्याची गरज असून शांततेतच सर्वांचे हित असल्याचे प्रतिपादन अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजीवकुमार सिंघल यांनी येथे केले.पुसद शहर पोलीस ठाण्याच्या आवारात गुरुवारी आयोजित शांतता समितीच्या सभेत ते मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंग, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.अश्विनी पाटील, शहरचे ठाणेदार गजानन शेळके, वसंतनगरचे ठाणेदार सदानंद मानकर उपस्थित होते. शहराची शांतता व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी जनतेच्या सहकार्याशिवाय पोलीस प्रशासन सक्षमपणे भूमिका वठवू शकत नाही. तसेच पोलिसांनीसुद्धा नागरिकांच्या समस्येचा, भावनेचा विचार करावा, असे आवाहन संजीवकुमार सिंघल यांनी केले.यावेळी सिंघल यांनी नागरिकांच्या विविध समस्या ऐकून घेतल्या. शहरातील वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी एक वाहतूक नियंत्रण समिती स्थापन करून त्यामध्ये पोलीस, नगरपरिषद पदाधिकारी व इतर नागरिकांचा समावेश असावा, अशी सूचना त्यांनी केली. पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंग यांनी शहरातील मुख्य चौकात सीसीटीव्ही कॅमेरे आणि सिग्नल आदीबाबत तातडीने सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. यावेळी नगरपरिषद उपाध्यक्ष डॉ.मोहमद नदीम, जयवंतराव पाटील, शरद पाटील, ताहेरखान पठाण, सुधीर देशमुख, बिपीन चिद्दरवार, रेश्मा लोखंडे, बंडोपंत राऊत, इस्तियाकभाई, श्रीरंग सरनाईक, उत्तम डुकरे, शेख कय्यूम, अभिजित चिद्दरवार, विनायक गुजर, मुख्याध्यापक संजय रोडे, बिपीन चिद्दरवार, सुधीर देशमुख, भवरसिंह सिसोदिया, लक्ष्मण वाघमोडे, अ‍ॅड.सलिम मेमन, संघमनाथ सोमावार, शरद पाटील, उमरखेडे ठाणेदार अनिल पाटील, दिग्रसचे शिवाजी बचाटे, वाहतूक शाखेचे भगवान वडतकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक धीरज चव्हाण, गजेंद्र क्षीरसागर आदी उपस्थित होते. (लोकमत चमू)