शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

एक दिवस पुरेल इतकाच बारदाना

By admin | Updated: April 26, 2017 00:11 IST

नव्याने तूर खरेदी करण्यासाठी जिल्ह्याजवळ दोन दिवस पुरेल इतकाच बारदाना शिल्लक आहे

३१ कोटींचे चुकारे रखडले : ३५ हजार क्विंटल तुरीचे ट्रान्सपोर्ट थांबले यवतमाळ : नव्याने तूर खरेदी करण्यासाठी जिल्ह्याजवळ दोन दिवस पुरेल इतकाच बारदाना शिल्लक आहे. यामुुळे तूर खरेदी केंद्र सुरू झाल्यानंतर तत्काळ बारदाना न पोहोचल्यास स्थिती स्फोटक होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील १३ केंद्रावर ६३ हजार ५०० क्विंटल तूर पडून आहे. ही तूर खरेदी करण्यासाठी एक लाख २७ हजार पोती लागणार आहे. प्रत्यक्षात या केंद्राजवळ २४ हजार पोतेच शिल्लक आहे. यामध्ये १२ हजार क्विंटल तूर मोजता येणार आहे. एका दिवसातच हा बारदाना संपणार आहे. यामुळे इतर तुरीची खरेदी करण्यासाठी केंद्राजवळ पोतेच नाही. २२ एप्रिलनंतर एक दानाही तूर खरेदी करायची नाही. असाच केंद्र शासनाचा प्रयत्न होता. यामुुळे अनेक अडचणी निर्माण करून बारदाना रोखण्यात आला. अजूनही या केंद्रावर बारदाना नाही. ६३ हजार ५०० क्विंटल तूर खरेदी करण्यासाठी १३ केंद्रांना एक लाख २७ हजार पोते बारदाना लागणार आहे. हा बारदाना मिळविण्याच्या प्रतीक्षेत पुन्हा शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्ह्यात शेवटच्या तीन दिवसांत मोठ्या प्रमाणात तूर खरेदी झाली. यामुळे १५ केंद्रांतील तूर खरेदीचा शासकीय आकडा एक लाख ९५ हजार क्विंटलच्या घरात पोहोचला आहे. या तुरीचे किंमत ९५ कोटी ७८ लाख रूपयांच्या घरात आहे. खरेदी झालेल्या तुरीपैकी ६४ कोटींच्या तुरीचे चुकारे झाले आहे. ३१ कोटी ५३ लाख रूपयांचे चुकारे महिन्यापासून बाकी आहेत. शेवटच्या चार दिवसात खरेदी झालेली ३५ हजार ३०२ क्विंटल तूर केंद्रावर पडून आहे. २२ एप्रिलला तूर खरेदी केंद्र बंदची घोषणा झाली. यामुळे खरेदी झालेली तूर केंद्रावरच पडून आहे. या तुरीचे ट्रान्सपोर्ट बाकी आहे. सीडब्ल्यूसी आणि वखार महामंडळात तूर ठेवण्यासाठी जागा नाही. जोपर्यंत ही तूर गोदामात पोहोचणार नाही तोपर्यंत शेतकऱ्यांना मिळणारे चुकारे थांबणार आहे. (शहर वार्ताहर) नऊ हजार शेतकऱ्यांचा मुक्काम मुख्यमंत्र्यांनी तूर खरेदीचा अहवाल मागविल्यानंतर तहसीलदारांनी प्रत्येक शासकीय केंद्रावर जाऊन रजिस्टरच्या नोंदी घेतल्या. हे रजिस्टर अंतिम शेतकऱ्याच्या नावावर स्वाक्षरी करून सिल करण्यात आले.