शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

एक दिवस पुरेल इतकाच बारदाना

By admin | Updated: April 26, 2017 00:11 IST

नव्याने तूर खरेदी करण्यासाठी जिल्ह्याजवळ दोन दिवस पुरेल इतकाच बारदाना शिल्लक आहे

३१ कोटींचे चुकारे रखडले : ३५ हजार क्विंटल तुरीचे ट्रान्सपोर्ट थांबले यवतमाळ : नव्याने तूर खरेदी करण्यासाठी जिल्ह्याजवळ दोन दिवस पुरेल इतकाच बारदाना शिल्लक आहे. यामुुळे तूर खरेदी केंद्र सुरू झाल्यानंतर तत्काळ बारदाना न पोहोचल्यास स्थिती स्फोटक होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील १३ केंद्रावर ६३ हजार ५०० क्विंटल तूर पडून आहे. ही तूर खरेदी करण्यासाठी एक लाख २७ हजार पोती लागणार आहे. प्रत्यक्षात या केंद्राजवळ २४ हजार पोतेच शिल्लक आहे. यामध्ये १२ हजार क्विंटल तूर मोजता येणार आहे. एका दिवसातच हा बारदाना संपणार आहे. यामुळे इतर तुरीची खरेदी करण्यासाठी केंद्राजवळ पोतेच नाही. २२ एप्रिलनंतर एक दानाही तूर खरेदी करायची नाही. असाच केंद्र शासनाचा प्रयत्न होता. यामुुळे अनेक अडचणी निर्माण करून बारदाना रोखण्यात आला. अजूनही या केंद्रावर बारदाना नाही. ६३ हजार ५०० क्विंटल तूर खरेदी करण्यासाठी १३ केंद्रांना एक लाख २७ हजार पोते बारदाना लागणार आहे. हा बारदाना मिळविण्याच्या प्रतीक्षेत पुन्हा शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्ह्यात शेवटच्या तीन दिवसांत मोठ्या प्रमाणात तूर खरेदी झाली. यामुळे १५ केंद्रांतील तूर खरेदीचा शासकीय आकडा एक लाख ९५ हजार क्विंटलच्या घरात पोहोचला आहे. या तुरीचे किंमत ९५ कोटी ७८ लाख रूपयांच्या घरात आहे. खरेदी झालेल्या तुरीपैकी ६४ कोटींच्या तुरीचे चुकारे झाले आहे. ३१ कोटी ५३ लाख रूपयांचे चुकारे महिन्यापासून बाकी आहेत. शेवटच्या चार दिवसात खरेदी झालेली ३५ हजार ३०२ क्विंटल तूर केंद्रावर पडून आहे. २२ एप्रिलला तूर खरेदी केंद्र बंदची घोषणा झाली. यामुळे खरेदी झालेली तूर केंद्रावरच पडून आहे. या तुरीचे ट्रान्सपोर्ट बाकी आहे. सीडब्ल्यूसी आणि वखार महामंडळात तूर ठेवण्यासाठी जागा नाही. जोपर्यंत ही तूर गोदामात पोहोचणार नाही तोपर्यंत शेतकऱ्यांना मिळणारे चुकारे थांबणार आहे. (शहर वार्ताहर) नऊ हजार शेतकऱ्यांचा मुक्काम मुख्यमंत्र्यांनी तूर खरेदीचा अहवाल मागविल्यानंतर तहसीलदारांनी प्रत्येक शासकीय केंद्रावर जाऊन रजिस्टरच्या नोंदी घेतल्या. हे रजिस्टर अंतिम शेतकऱ्याच्या नावावर स्वाक्षरी करून सिल करण्यात आले.