शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
4
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
5
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
6
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
7
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
8
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
9
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
10
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
11
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
12
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
13
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
14
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
15
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
16
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
17
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
18
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
19
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
20
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...

जंगल, वन्यजीव, अनुसूचित जमाती परस्पर पूरक घटक

By admin | Updated: August 25, 2016 01:45 IST

जंगल, वन्यजीव आणि अनुसूचित जमाती, हे तीन घटक मिळून संपूर्ण जंगल निर्माण होते.

अनिल दवे : जंगल सत्याग्रहाच्या स्मृतींना उजाळा, वनांच्या संरक्षणासाठी प्रयत्नयवतमाळ : जंगल, वन्यजीव आणि अनुसूचित जमाती, हे तीन घटक मिळून संपूर्ण जंगल निर्माण होते. हे तिनही घटक परस्पर पूरक असून वनांच्या जतनासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन केंद्रीय वन व पर्यावरण विभागाचे स्वतंत्र राज्यमंत्री अनिल दवे यांनी केले. येथील विश्रामगृहात बुधवारी पत्रकारांशी संवाद साधताना अनिल दवे पुढे म्हणाले, पूर्वीपासून वनउपजावर वनवासींचा अधिकार होता. मात्र ब्रिटीशांनी वनवासींचा अधिकार नाकारून जंगले आरक्षित केली. त्यांनी वनवासींचा वनउपजाचा अधिकार नाकारला. या अन्यायाविरूद्ध राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक केशव बळीराम हेगडे यांनी जंगल सत्याग्रह पुकारला. सन १९३0 मध्ये ते नागपूर, वर्धामार्गे यवतमाळ जिल्ह्यातील करळगाव जंगलात धडकले. तेथे त्यांनी गवत कापून जंगल सत्याग्रह केला. या घटनेला आता ९६ वर्षे लोटली. अशा विविध स्मृतींना उजाळा देण्यासाठी भाजपाने तिरंगा सन्मान रॅली अंतर्गत विविध उपक्रम सुरू केले. त्यानुसार जंगल सत्याग्रहाच्या ठिकाणी जुन्या स्मृती जागविण्यासाठी आपण यवतमाळात आल्याचे दवे यांनी सांगितले. जंगल सत्याग्रह केल्यामुळे हडगेवार यांना ब्रिटीशांनी कारावास ठोठावला होता, असेही त्यांनी नमूद केले. जंगल, वन्यजीव आणि अनुसूचित जमाती, हे तिनही घटक परस्पर पूरक असून त्याच्या संवर्धनासाठी शासन प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर, राज्याचे ऊर्जा राज्यमंत्री मदन येरावार, आमदार राजू तोडसाम, भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजू डांगे, भाजयुमोेचे जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे, दिनकर पावडे आदी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)केवळ स्मारक नको, जनजागृती व्हावीयवतमाळ जिल्ह्यात करळगाव आणि पुसद तालुक्यातील धुंदी येथे जंगल सत्याग्रह झाला होता. या दोन्ही ठिकाणी स्मारके आहेत. मात्र ती दुर्लक्षित आहे. या दोन्ही ठिकाणची स्मारके जनजागृती केंद्रे व्हावी, यासाठी प्रयत्न करण्याची गरज अनिल दवे यांनी प्रतिपादीत केली. जमीन हा राज्य शासनाचा विषय असून राज्य शासनाने त्यादृष्टीने प्रयत्न करावेत, असेही ते म्हणाले. या ठिकाणी मुलांना बागडण्यासाठी बगिचा, त्यांना जंगलाबद्दल माहिती देण्याची सुविधा असावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.