शहरं
Join us  
Trending Stories
1
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
2
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
3
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
4
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
5
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
6
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
7
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
8
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
9
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!
10
Team India, IND vs ENG: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत 'या' तिघांचा Playing XI मधून होणार पत्ता कट, कॅप्टन गिल मोठा निर्णय घेणार
11
जयदीप अहलावतने दोन आठवड्यामध्ये अंधेरीत खरेदी केलं आणखी एक घर, किंमत आहे कोटींच्या घरात
12
Maharashtra Cabinet: आणीबाणीतील बंदीवानांचे मानधन दुप्पट
13
"हवे ते निर्बंध लादून दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या देशांना बक्षीस देता, दुटप्पीपणा चालणार नाही"; PM मोदींचा इशारा
14
Air India Plane Crash: 'टेकऑफसाठी जास्त वेळ अन् ओव्हरलोडिंग', माजी वैमानिकाने दोन मुद्द्यांवर ठेवलं बोट
15
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
16
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
17
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
18
सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार 'धडाम'; Sensex २६९ अंकांच्या घसरणीसह उघडला, 'या' वृत्तानं दिलं टेन्शन
19
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
20
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!

जलयुक्तच्या कामांना जूनचा अल्टिमेटम

By admin | Updated: May 9, 2016 02:30 IST

जलयुक्त शिवारची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण होण्यासाठी शासकीय पातळीवरून प्रयत्न गरजेचे आहे.

विलंब झाल्यास कारवाई : लोकसहभाग घेण्याचे आवाहनयवतमाळ : जलयुक्त शिवारची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण होण्यासाठी शासकीय पातळीवरून प्रयत्न गरजेचे आहे. ही कामे दर्जेदार, कमी पैशात आणि वेळेत पूर्ण होणे गरजेचे आहे. कामांमध्ये विलंब झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी सांगितले.जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवनात जलयुक्त शिवारच्या या वर्षातील कामांचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुळकर्णी, मुख्य वनसंरक्षक वसंत गुरमे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रेय गायकवाड, उपवनसंरक्षक प्रमोदचंद लाकरा आदी उपस्थित होते.जिल्हाधिकारी म्हणाले, जलयुक्तची कामे १५ जून किंवा पाऊस पडण्याआधी आणि पावसानंतर केवळ वनांमधील कामे करता येतील. त्यामुळे हाती घेतलेली कामे तातडीने पूर्ण करणे आवश्यक आहे. यावर्षी सर्वेक्षण करण्यात आलेल्या कामांपैकी ज्या गावात अद्यापही कामे सुरू झालेली नाही, अशा संबंधित अधिकाऱ्यांना नोटीस द्यावी, ही कामे पूर्ण करण्यासाठी गावातील नागरिक आणि ज्यांना या बंधाऱ्याचा फायदा होणार आहे, अशांचे मत परिवर्तन करण्यात यावे, अशा सूचनाही यावेळी दिल्या.नाला खोलीकरण आणि तलावातील गाळ काढण्यासाठी बळीराजा चेतना अभियानातून मदत केली जात आहे. या कामांमध्ये लोकसहभाग अधिक प्रमाणात घ्यावा, असेही यावेळी सुचविले. जलयुक्तची कामे दर्जेदार आणि टिकाऊ होण्यासाठी मशिनचा वापर करावा, कोणत्याही परिस्थितीत जून अखेरपर्यंत ही कामे होण्यासाठी प्रयत्न करावे, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.यावेळी जलयुक्त शिवार अभियानाशी संबंधित विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. त्यांनी अभियानाविषयीची प्रगती यावेळी मांडली. (वार्ताहर)