शहरं
Join us  
Trending Stories
1
Chandra Grahan: कोल्हापूरच्या खगोलप्रेमींनी अनुभवली ब्लड मूनची अद्भुत दृश्यं, एकदा पहाच...
2
टोयोटाकडून मोठी घोषणा! फॉर्च्युनरची ३.४९ लाखांनी किंमत तुटली, क्रिस्टा तर मार्केट खाणार...
3
अख्खी आंदेकर फॅमिली मोस्ट वाँटेड; आयुष कोमकर खून प्रकरणात बंडू आंदेकरसह १३ जणांवर गुन्हे 
4
एकनाथ शिंदेंनी पाडले अजित पवारांच्या राष्ट्रवादीला खिंडार; महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षच फोडला, उद्या प्रवेश
5
Lalbaugcha Raja Visarjan Video: चंद्रग्रहणाला काही मिनिटे शिल्लक असताना...; रात्री ९ वाजता लालबागच्या राजाचे विसर्जन
6
नूतनीकरण ऑक्टोबरमध्ये...! इन्शुरन्स कंपन्या आतापासूनच १८ टक्के जीएसटीवाला हेल्थ प्रिमिअम पाठवू लागल्या
7
'पीएम मोदी देशाचे शत्रू ', ट्रम्प टॅरिफचा उल्लेख करत मल्लिकार्जुन खरगेंचे टीकास्त्र
8
ठाणे : जिल्हा न्यायाधीशांच्या शासकीय घरातील स्लॅब कोसळला; न्यायाधीशांची पीडब्ल्यूडीविरोधात पोलिसांत तक्रार
9
गुंडगिरीचा कळस! माजी सरपंचावर जीवघेणा हल्ला; लाेखंडी राॅड, स्टंपने २२ मिनिटे मारहाण
10
इस्रायलने अचानक एअरस्पेस बंद केली; नेमके काय घडतेय... गाझा पट्टी की आणखी काही...
11
लव्ह स्टोरीचे बिंग फुटण्याची भीती; पोलिस भरती अकॅडमीच्या संचालकांनेच केले विद्यार्थ्याचे अपहरण
12
लहान मुलांना सनरुफ उघडून देताय? महिंद्रा ३XO चा व्हिडीओ पहाल कर, थरकाप उडेल...
13
ऐन पौर्णिमेलाच चंद्र झाकोळला; चंद्रग्रहणाला सुरुवात, रात्री ११ वाजता लाल रंगात दिसणार...
14
ओबीसी आणि मराठा आरक्षणावर राज्य सरकार ठाम; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची स्पष्टोक्ती
15
“मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचे नुकसान करतायत, स्वतःचे महत्त्व वाढावे...”; कुणी केली टीका?
16
धुळे हळहळले! रील स्टार शुभम सिंघवी याच्या दुचाकीला अपघात, जागेवरच मृत्यू
17
अवघ्या १५०० रुपयांत बनावट आधारकार्ड, दोन हजार लोकांना 'त्यानं' बनवलं मूर्ख! पोलिसांनी कसं पकडलं?
18
नऊवारी, फेटे अन् ढोल ताशे! जर्मनीच्या ड्युसलडॉर्फमध्ये उत्साहात साजरा झाला गणेशोत्सव!
19
भंडाऱ्याची उधळण अन पुष्पवृष्टी, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला दिमाखदार मिरवणुकीने निरोप!
20
दहशतवाद्यांना पाकिस्तानची साथ; भारताने पाडलेल्या लष्कर-ए-तैयबाच्या मुख्यालयाचे बांधकाम पुन्हा सुरू

जलयुक्तच्या कामांना जूनचा अल्टिमेटम

By admin | Updated: May 9, 2016 02:30 IST

जलयुक्त शिवारची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण होण्यासाठी शासकीय पातळीवरून प्रयत्न गरजेचे आहे.

विलंब झाल्यास कारवाई : लोकसहभाग घेण्याचे आवाहनयवतमाळ : जलयुक्त शिवारची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण होण्यासाठी शासकीय पातळीवरून प्रयत्न गरजेचे आहे. ही कामे दर्जेदार, कमी पैशात आणि वेळेत पूर्ण होणे गरजेचे आहे. कामांमध्ये विलंब झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी सांगितले.जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवनात जलयुक्त शिवारच्या या वर्षातील कामांचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुळकर्णी, मुख्य वनसंरक्षक वसंत गुरमे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रेय गायकवाड, उपवनसंरक्षक प्रमोदचंद लाकरा आदी उपस्थित होते.जिल्हाधिकारी म्हणाले, जलयुक्तची कामे १५ जून किंवा पाऊस पडण्याआधी आणि पावसानंतर केवळ वनांमधील कामे करता येतील. त्यामुळे हाती घेतलेली कामे तातडीने पूर्ण करणे आवश्यक आहे. यावर्षी सर्वेक्षण करण्यात आलेल्या कामांपैकी ज्या गावात अद्यापही कामे सुरू झालेली नाही, अशा संबंधित अधिकाऱ्यांना नोटीस द्यावी, ही कामे पूर्ण करण्यासाठी गावातील नागरिक आणि ज्यांना या बंधाऱ्याचा फायदा होणार आहे, अशांचे मत परिवर्तन करण्यात यावे, अशा सूचनाही यावेळी दिल्या.नाला खोलीकरण आणि तलावातील गाळ काढण्यासाठी बळीराजा चेतना अभियानातून मदत केली जात आहे. या कामांमध्ये लोकसहभाग अधिक प्रमाणात घ्यावा, असेही यावेळी सुचविले. जलयुक्तची कामे दर्जेदार आणि टिकाऊ होण्यासाठी मशिनचा वापर करावा, कोणत्याही परिस्थितीत जून अखेरपर्यंत ही कामे होण्यासाठी प्रयत्न करावे, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.यावेळी जलयुक्त शिवार अभियानाशी संबंधित विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. त्यांनी अभियानाविषयीची प्रगती यावेळी मांडली. (वार्ताहर)