शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

जूनमध्ये ७१ टँकरने ८१ गावांना पाणीपुरवठा

By admin | Updated: June 18, 2016 02:00 IST

गतवर्षीच्या अपुऱ्या पावसाने कधी नव्हे ते जिल्ह्याला उन्हाळाभर भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागला.

जलस्रोतात घसरण : घाटंजी तालुक्यात परिस्थिती हाताबाहेर, शेतकऱ्यांसोबत प्रशासनालाही पावसाची प्रतीक्षा यवतमाळ : गतवर्षीच्या अपुऱ्या पावसाने कधी नव्हे ते जिल्ह्याला उन्हाळाभर भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागला. जून महिन्यात पाणीटंचाईचे शुक्लकाष्ट संपेल अशी प्रशासनासोबतच सर्व सामान्यांना आशा होती. मात्र जून महिना अर्धा संपला तरी पावसाचा पत्ता नाही. परिणामी ८१ गावातील नागरिकांची तहान भागविण्यासाठी ७१ टँकरने पाणी पुरवठा करावा लागत आहे. यवतमाळ जिल्ह्यात यावर्षी फेब्रुवारी महिन्यापासून भीषण पाणीटंचाई निर्माण झाली होती. परंतु जून महिना आला की संपेल, अशी अपेक्षा सर्वांनाच होती. मात्र राज्यात मान्सूनचे आगमन लांबले. याचा फटका जिल्ह्यालाही बसला. जिल्ह्याच्या भूजल पातळीत अर्धा मीटरने घसरण नोंदविली गेली. पेयजलाची स्थिती अधिकच बिकट झाली. यावर मात करण्यासाठी टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. काही गावात बैलगाडीच्या मदतीने पाणीपुरवठा होत आहे. काही गावात विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या.जिल्ह्यात सर्वाधिक भीषण परिस्थिती जून महिन्यात घाटंजी तालुक्यात निर्माण झाली आहे. सर्वाधिक १७ टँकरच्या मदतीने पाणी पुरवठा केला जात आहे. आर्णी तालुका ११, नेर चार, महागाव दोन, वणी एक, पुसद १५, दारव्हा दोन, उमरखेड दोन, राळेगाव दोन, पांढरकवडा एक असा टँकरने पाणी पुरवठा होत आहे. ८५ गाववाड्या, वस्त्या आणि पोडावर टँकर अथवा बैलगाडीने पाणी पुरवठा केला जात आहे. यामध्ये १२ खासगी आणि ५९ शासकीय टँकरचा समावेश आहे. जून महिन्यात कधी नव्हे ती भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. गावागावातील जलपातळी आणखी खालवत आहे. मध्यंतरी झालेल्या अकाली पावसाने दिलासा मिळाला होता. मात्र गत १५ दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे शेतीची कामे खोळंबली असून व पाणीटंचाईचा प्रश्नही तीव्र झाला आहे. यवतमाळ, पुसद शहराला आठ दिवसाआड पाणी पुरवठा करण्याची वेळ आली आहे. प्रशासनावरही पाणी पुरवठ्याचा ताण वाढत असून कधी एकदा पाऊस बरसतो आणि पाणीटंचाई संपुष्टात येते याकडे प्रशासनाचे लक्ष लागले आहे. (शहर वार्ताहर)