शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातात किती लोकांचा मृत्यू झाला? सरकारने जाहीर केली अधिकृत आकडेवारी
2
“मला शक्य तितक्या लवकर सर्वकाही शांत झालेले पाहायचे आहे”; ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
4
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
5
Viral Video : एक बाईक अन् १० लोक! दुचाकीस्वाराचा जुगाड बघून डोकं चक्रावेल
6
ENG vs IND : प्रसिद्ध कृष्णानं बॅक टू बॅक ओव्हरमध्ये २ विकेट्स मिळवत टीम इंडियाला दिला मोठा दिलासा
7
इस्रायलने सीझफायर तोडले, ट्रम्प प्रचंड नाराज; म्हणाले, तातडीने पायलटना माघारी बोलवा...
8
EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...
9
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
10
यशस्वी जैस्वाल पुन्हा चुकला! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला
11
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
12
आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक
13
तुर्कीला धडा शिकवण्याची तयारी सुरू?; सर्वात मोठ्या शत्रूच्या देशात पोहचले भारतीय हवाई दल प्रमुख
14
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
15
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
16
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
17
डॅशिंग 'शिवा' खऱ्या आयुष्यात आहे खूपच बोल्ड; पूर्वा कौशिकचं नवं फोटोशूट पाहिलंत का?
18
Panchayat 4 Review : 'वो अफ़्साना जिसे अंजाम तक लाना न हो मुमकिन..'; दुर्दैवाने 'पंचायत ४'विषयी हेच म्हणावं लागेल
19
Nuclear Weapon : कोणता देश अणुबॉम्ब बनवतोय अन् कोणता नाही? कसं आणि कोण ठेवतं लक्ष? जाणून घ्या...
20
“भास्कर जाधवांनी शिंदेंचे नेतृत्व स्वीकारले तर आनंद, मातोश्रीवरचा राग...”; कुणी दिला सल्ला?

पाणीटंचाईसाठी संयुक्त बैठक

By admin | Updated: November 1, 2014 01:17 IST

यावर्षी जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पर्जन्यमान झाले आहे. विशेषत: पुसद, उमरखेड, दिग्रस या तालुक्यांमध्ये पाणीटंचाई भेडसावण्याची शक्यता आहे.

यवतमाळ : यावर्षी जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पर्जन्यमान झाले आहे. विशेषत: पुसद, उमरखेड, दिग्रस या तालुक्यांमध्ये पाणीटंचाई भेडसावण्याची शक्यता आहे. या संभाव्य पाणीटंचाईसाठी यंत्रणेकडून आताच अहवाल मागविला जात आहे. त्यासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. आरती फुफाटे, उपाध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर यांनी पाच विभागांची संयुक्त बैठक घेऊन अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. जलव्यवस्थापन समितीच्या नियोजित बैठकीपूर्वीच अध्यक्ष डॉ. आरती फुफाटे यांनी अचूक असा पाणीटंचाई आराखडा तयार करण्यासाठी यंत्रणेला विशेष सूचना दिल्या. पाणीपुरवठा विभाग, सिंचन विभाग, भूजल वैज्ञानिक, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, महात्मा गांधी रोजगार हमी योजना या विभागातील अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेण्यात आली. टंचाई आराखडा तयार करण्यासाठी प्रत्येकांनी समन्वयाने काम करावे, यासाठी त्यांना एक महिन्याचा अवधी देण्यात आला आहे. बऱ्याच गावांमध्ये सातत्याने पाणीटंचाई राहते. तेथील टंचाई कायमस्वरूपी मिटविण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्या, याचा अहवाल मागविण्यात आला आहे. अनेक ठिकाणी जुजबी उपाययोजना केल्यानंतर तेथील समस्या कायमस्वरूपी निकाली काढणे शक्य असते. काही गावात तर मुबलक पाणीसाठा उपलब्ध असूनही किरकोळ कारणाने पाणीपुरवठा योजना बंद असतात. अशा गावांमधील त्रुटी दूर करून तेथील कायमस्वरूपी पाण्याची व्यवस्था करण्यावर भर दिला जाणार आहे. हा आराखडा तयार करताना यात सर्वच बाबींचा समावेश करावा लागणार आहे. भूजल पातळी वाढविण्यासाठी कुठल्या उपाययोजना कराव्या याचे नियोजन सिंचन विभागाने करावे. त्या भागातील जमिनीचा स्तर कसा आहे. पाण्याची पातळी कितपत आहे याची माहिती भूजल वैज्ञानिकांकडून किरकोळ कामे करायची असल्यास रोजगार हमी योजनेतून आर्थिक तरतूद करता येते काय यावरही भर दिला जाणार आहे. या शिवाय महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभाग यांच्याकडूनही त्या बाबत सूचना मागविण्यात आल्या. अशा प्रकारे परिपूर्ण आराखडा तयार करण्यावर भर दिला जात आहे. त्यामुळे उन्हाळा लागण्यापूर्वी उपाययोजना करण्यासाठी पूर्व नियोजन जिल्हा परिषदेकडून केले जात आहे. यासाठी पाचही विभागाची संयुक्त बैठक अध्यक्ष आरती फुफाटे यांनी घेतली. यावेळी प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी शरद कुळकर्णी उपस्थित होते. (कार्यालय प्रतिनिधी)