शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

धगधगता निखारा जांबुवंतराव

By admin | Updated: February 19, 2017 00:49 IST

लांब सोगा असलेले स्वच्छ धोतर. जाळीचे बनियान आणि तितकाच पांढरा स्वच्छ कुर्ता. हातात कडे,

स्वतंत्र विदर्भ राज्याचा खंदा समर्थक हरविला यवतमाळ : लांब सोगा असलेले स्वच्छ धोतर. जाळीचे बनियान आणि तितकाच पांढरा स्वच्छ कुर्ता. हातात कडे, केसांची जटा, दाढी आणि चेहऱ्यावर धगधगत्या निखाऱ्यापेक्षा प्रखर अन्यायाची चीड घेऊन भाऊ जांबुवंतराव धोटे भाषणासाठी उभे राहायचे. लाखोंच्या जनसमुदायाला ते पेटवून उठवायचे. त्यांच्या एका शब्दावर अवघ्या २४ तासात लाखो माणसे मोर्चात यायची. अख्खा महाराष्ट्र आपल्या दोन्ही हातांनी खदखदा हलवून सोडायचे. शेकडो आंदोलनांचे नेतृत्व करणारे भाऊ जांबुवंतराव धोटे म्हणजे एकेकाळी तरुणांच्या गळ्यातील ताईत होते. भाऊ जांबुवंतराव धोटे यांचा मोर्चा असला की, लाखो लोक धावून यायचे. प्रत्येक मोर्चात ते मोर्चेकऱ्यांसोबत शेवटपर्यंत चालायचे. हातावरच भाकरी खायचे आणि भाषणासाठी उभे राहिले की अन्यायाविरुद्ध अंगार ओतायचे. त्यांच्या भाषणाने त्याकाळी तरुण पेटून उठायचे. जांबुवंतराव म्हणजे एक विलक्षण रसायन होते. कृषी विद्यापीठासाठी त्यांनी केलेले आंदोलन आजही अनेकांच्या स्मरणात आहे. केंद्र सरकारने प्रत्येक राज्याला एक कृषी विद्यापीठ देण्याची घोषणा केली. कृषी विद्यापीठ विदर्भात व्हावे, अशी मागणी धोटे यांनी केली होती. परंतु त्याला तत्कालीन राज्य सरकारने विरोध केला. त्याच वेळी जांबुवंतरावांनी जोपर्यंत विदर्भाला कृषी विद्यापीठ मिळणार नाही तोपर्यंत सभागृहात पाय ठेवणार नाही, अशी प्रतिज्ञा केली. त्यानंतर तडक अकोला गाठून त्यांनी उपोषण सुरू केले. ठिकठिकाणी आंदोलन पेटले. अमरावतीच्या राजकमल चौकात आंदोलनकर्त्यांवर गोळीबार झाला. त्यात पाच जण ठार झाले. शेवटी अकोला येथे डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या नावाने कृषी विद्यापीठाची स्थापना झाली. केवळ कृषी विद्यापीठासाठी पाच जणांचे बळी द्यावे लागले, त्यापेक्षा आपल्या विदर्भाचे स्वतंत्र राज्यच का नको असे म्हणत त्यांनी स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी चळवळ उभारली. स्वतंत्र विदर्भ राज्याच्या आंदोलनाच्या इतिहासात जांबुवंतराव धोटे यांनी अनेक कीर्तीमान स्थापित केले. लाखो लोकांच्या सभा घेतल्या. अनेकांच्या सभा उधळून लावल्या. स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी घेऊन ते अखेरच्या श्वासापर्यंत लढत राहिले. प्रत्येक वेळी राज्यकर्त्यांनी स्वतंत्र विदर्भाचे गाजर दाखविले. परंतु भाऊ जांबुवंतराव धोटे यांच्या हयातीत विदर्भ राज्य होऊ शकले नाही. गेल्याच आठवड्यात भाऊ जांबुवंतराव धोटे यांनी पत्रपरिषद घेऊन जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत विदर्भ राज्य द्रोह्यांना मतदान करू नका, असे आवाहन केले होते.