शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
3
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
4
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
5
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
6
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
7
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
8
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
9
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
10
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
11
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
12
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
13
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
14
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
15
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
16
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
17
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
18
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
19
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
20
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'

धगधगता निखारा जांबुवंतराव

By admin | Updated: February 19, 2017 00:49 IST

लांब सोगा असलेले स्वच्छ धोतर. जाळीचे बनियान आणि तितकाच पांढरा स्वच्छ कुर्ता. हातात कडे,

स्वतंत्र विदर्भ राज्याचा खंदा समर्थक हरविला यवतमाळ : लांब सोगा असलेले स्वच्छ धोतर. जाळीचे बनियान आणि तितकाच पांढरा स्वच्छ कुर्ता. हातात कडे, केसांची जटा, दाढी आणि चेहऱ्यावर धगधगत्या निखाऱ्यापेक्षा प्रखर अन्यायाची चीड घेऊन भाऊ जांबुवंतराव धोटे भाषणासाठी उभे राहायचे. लाखोंच्या जनसमुदायाला ते पेटवून उठवायचे. त्यांच्या एका शब्दावर अवघ्या २४ तासात लाखो माणसे मोर्चात यायची. अख्खा महाराष्ट्र आपल्या दोन्ही हातांनी खदखदा हलवून सोडायचे. शेकडो आंदोलनांचे नेतृत्व करणारे भाऊ जांबुवंतराव धोटे म्हणजे एकेकाळी तरुणांच्या गळ्यातील ताईत होते. भाऊ जांबुवंतराव धोटे यांचा मोर्चा असला की, लाखो लोक धावून यायचे. प्रत्येक मोर्चात ते मोर्चेकऱ्यांसोबत शेवटपर्यंत चालायचे. हातावरच भाकरी खायचे आणि भाषणासाठी उभे राहिले की अन्यायाविरुद्ध अंगार ओतायचे. त्यांच्या भाषणाने त्याकाळी तरुण पेटून उठायचे. जांबुवंतराव म्हणजे एक विलक्षण रसायन होते. कृषी विद्यापीठासाठी त्यांनी केलेले आंदोलन आजही अनेकांच्या स्मरणात आहे. केंद्र सरकारने प्रत्येक राज्याला एक कृषी विद्यापीठ देण्याची घोषणा केली. कृषी विद्यापीठ विदर्भात व्हावे, अशी मागणी धोटे यांनी केली होती. परंतु त्याला तत्कालीन राज्य सरकारने विरोध केला. त्याच वेळी जांबुवंतरावांनी जोपर्यंत विदर्भाला कृषी विद्यापीठ मिळणार नाही तोपर्यंत सभागृहात पाय ठेवणार नाही, अशी प्रतिज्ञा केली. त्यानंतर तडक अकोला गाठून त्यांनी उपोषण सुरू केले. ठिकठिकाणी आंदोलन पेटले. अमरावतीच्या राजकमल चौकात आंदोलनकर्त्यांवर गोळीबार झाला. त्यात पाच जण ठार झाले. शेवटी अकोला येथे डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या नावाने कृषी विद्यापीठाची स्थापना झाली. केवळ कृषी विद्यापीठासाठी पाच जणांचे बळी द्यावे लागले, त्यापेक्षा आपल्या विदर्भाचे स्वतंत्र राज्यच का नको असे म्हणत त्यांनी स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी चळवळ उभारली. स्वतंत्र विदर्भ राज्याच्या आंदोलनाच्या इतिहासात जांबुवंतराव धोटे यांनी अनेक कीर्तीमान स्थापित केले. लाखो लोकांच्या सभा घेतल्या. अनेकांच्या सभा उधळून लावल्या. स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी घेऊन ते अखेरच्या श्वासापर्यंत लढत राहिले. प्रत्येक वेळी राज्यकर्त्यांनी स्वतंत्र विदर्भाचे गाजर दाखविले. परंतु भाऊ जांबुवंतराव धोटे यांच्या हयातीत विदर्भ राज्य होऊ शकले नाही. गेल्याच आठवड्यात भाऊ जांबुवंतराव धोटे यांनी पत्रपरिषद घेऊन जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत विदर्भ राज्य द्रोह्यांना मतदान करू नका, असे आवाहन केले होते.