शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
3
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
4
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
5
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
6
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
7
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
8
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
9
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
10
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
11
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
12
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
13
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
14
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
15
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
16
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
17
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
18
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
19
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
20
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
Daily Top 2Weekly Top 5

जलयुक्त शिवार अभियानाला गालबोट

By admin | Updated: June 24, 2016 02:40 IST

पाणीटंचाईवर कायमस्वरुपी मात करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सुरु असलेल्या सिमेंट नाला ...

निकृष्ठ बंधाऱ्यांची निर्मीती : तालुक्यातील सिमेंट बंधारे कामात गैरप्रकारकळंब : पाणीटंचाईवर कायमस्वरुपी मात करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सुरु असलेल्या सिमेंट नाला बंधाऱ्याचे काम निकृष्ठ केल्या दर्जाचे होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे कळंब तालुक्यात जलयुक्त शिवार अभियानाला गालबोट लागले आहे. तरोडा येथे उभारण्यात येत असलेल्या सिमेंट बंधाऱ्याची तपासणी उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार यांनी नुकतीच केली. त्यांच्या पाहणीतही बंधाऱ्याची उपयोगिता व गुणवत्तेच्या प्रश्नावर बोट ठेवण्यात आले होते. कळंब तालुक्यात पाणीटंचाईवर कायमस्वरुपी मात करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सुरु असलेल्या सिमेंट नाल्यांच्या कामात प्रचंड गैरप्रकार होत आहे. बंधाऱ्याचे काम निकृष्ठ दर्जाचे केल्या गेले. आता तर कामही थांबविण्यात आले आहे. त्यामुळे या बंधाऱ्याची उपयोगिता व गुणवत्ता तपासण्याची मागणी करण्यात आली आहे. तरोडा येथील तीन सिमेंट बंधाऱ्यांची निर्मिती बेंबळा कॅनॉल विभागाच्यावतीने करण्यात आली. परंतु बंधारे बांधण्यात कुठलेही तांत्रिक कौशल्य वापरल्या गेले नाही. प्राकलनानुसार कामेच करण्यात आलेली नाही. बंधाऱ्याची खोली बहुतेक ठिकाणी राखल्या गेली नाही. केवळ थातुरमातूर कामे करण्यात धन्यता मानण्यात आली. मातीचे केवळ ढिगारे मारण्यात आले. कुठेही बर्म सोडण्यात आले नाही. आवश्यक ठिकाणी माती वाहून नेणे गरजेचे असताना एकही ब्रास माती वाहून नेण्यात आली नाही. त्यामुळे आतापासूनच माती नाल्यात पडू लागली आहे. वास्तविकपणे खोदलेली माती वाहुन नेण्याचे प्रावधान प्राकलनामध्ये समाविष्ठ आहे. त्यामुळे जोराच्या पावसात ही माती पुन्हा नाल्यात जमा होईल, अशी स्थिती आहे. त्यामुळे या अनियमितेविषयी आमदार डॉ.अशोक उईके यांनी उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार यांना पूर्ण चौकशी करण्याची सूचना केली आहे. राजकीय वरदहस्त व अधिकाऱ्यांची टक्केवारी यामुळे हा प्रकार झाल्याचे बोलले जाते. त्यामुळे आता या प्रकरणात जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी गांभिर्याने लक्ष देणे अपेक्षित आहे. सदर कामाच्या संदर्भात उच्चस्तरीय अधिकाऱ्यांनी दखल घेणे गरजेचे आहे. कारण शासनाची महत्वाकांक्षी असलेली योजना चुकीचे काम होत असल्यामुळे अपयशी ठरण्याची शक्यता आहे. युती शासनाची ‘जलयुक्त शिवार’ ही अतिशय महत्वाकांक्षी योजना आहे. बऱ्याच ठिकाणी यामध्ये सुंदर कामे सुरु आहे. परंतु कळंब तालुक्यात या योजनाचा बट्याबोळ करण्याचे काम अधिकारी व कंत्राटदारांनी चालविले आहे. याविषयी येत्या अधिवेशनात संबधितांना धारेवार धरु अशी माहिती आमदार डॉ.अशोक उईके यांनी दिली. (तालुका प्रतिनिधी)