शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे 'शिवतीर्थ'हून निघाले, कार थांबवली, काच खाली केली अन् म्हणाले, "मातोश्री'वर चाललोय...!"
2
राहुल गांधींच्या लेखाने राजकीय भूंकप, विधानसभा निवडणूक फिक्सिंगची चौकशी का करत नाही?: सपकाळ
3
राज्यातील महाराष्ट्रविरोधी सरकार घालवायला ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर स्वागत: वडेट्टीवार
4
"मी गावचा माणूस, मला इंग्रजी समजत नाही"; शिक्षणमंत्र्यांनी विद्यार्थिनीसमोर पकडले कान
5
तुम्हाला गुंतवणूकीचा ६०:४० चा नियम माहितीये? पैसे कमावण्याची आहे सोपी पद्धत, जाणून घ्या कसं?
6
Raja Raghuvanshi : सस्पेन्स वाढला! राजा आणि सोनमचं मेघालयमध्ये झालं भांडण? भावाला आल्या धमक्या
7
Fact Check: पाकिस्तानचा क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीचं निधन? व्हायरल व्हिडीओमागील सत्य समोर!
8
३० लाखांच्या होम लोनवर वाचतील ४.६३ लाख; आपली कर्जाची रक्कम टाका आणि पाहा किती होईल बचत?
9
Astrology: राहू दशा सुरु झाली हे कसं ओळखावं? राहूमुळे कोणकोणती हानी होते? वाचा!
10
'सुनील तटकरेंनी राजीनामा द्यायला पाहिजे, त्यांनी दिला तर मी नक्की देईन', आमदार महेंद्र थोरवेंचा घणाघात
11
स्कूटरवरून आले, सामान हॉटेलमध्ये ठेवलं अन्...; राजा आणि सोनम बेपत्ता होण्यापूर्वीच्या CCTV व्हिडीओमध्ये काय?
12
“२ तास गोंधळ, मतमोजणी हायजॅक, मोदींचा वाराणसीत जवळपास पराभवच झाला होता”; कुणाचा दावा?
13
एकटं राहायला आवडतं? उषा नाडकर्णी म्हणाल्या, "आमच्या इमारतीत राज ठाकरेंची मावशी..."
14
म्युच्युअल फंड गुंतवणूकदाराचा अचानक मृत्यू झाला तर पैशांचं काय होतं? पाहा महत्त्वाची माहिती आणि प्रक्रिया
15
Astrology: पत्रिका मंगळाची असेल तर सगळेच अमंगल होते का? काय आहे त्यावर उपाय? वाचा!
16
Rahul Gandhi: महाराष्ट्र विधानसभेत 'मॅच फिक्सिंग', राहुल गांधींचा आरोप; भाजपचा पलटवार!
17
Jyoti Malhotra : ज्योती मल्होत्राबाबत मोठा खुलासा; पाकिस्तानमधील रिटायर्ड सब-इन्स्पेक्टरच्या होती संपर्कात
18
COVID19: कोरोना वाढतोय, काळजी घ्या! २४ तासांत ४ मृत्यू, सक्रीय रुग्णांची संख्या ५००० च्या वर!
19
“२०१४, २०१७ ला काय घडले यात रस नाही, आम्ही मागे वळून पाहत नाही”; प्रस्तावावर राऊतांचे विधान
20
'उद्धव ठाकरेंना गर्दीचं मतांमध्ये परिवर्तन करण्यात यश', शरद पवार राज ठाकरेंबद्दल काय म्हणाले?

जलयुक्त शिवार अभियानाला गालबोट

By admin | Updated: June 24, 2016 02:40 IST

पाणीटंचाईवर कायमस्वरुपी मात करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सुरु असलेल्या सिमेंट नाला ...

निकृष्ठ बंधाऱ्यांची निर्मीती : तालुक्यातील सिमेंट बंधारे कामात गैरप्रकारकळंब : पाणीटंचाईवर कायमस्वरुपी मात करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सुरु असलेल्या सिमेंट नाला बंधाऱ्याचे काम निकृष्ठ केल्या दर्जाचे होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे कळंब तालुक्यात जलयुक्त शिवार अभियानाला गालबोट लागले आहे. तरोडा येथे उभारण्यात येत असलेल्या सिमेंट बंधाऱ्याची तपासणी उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार यांनी नुकतीच केली. त्यांच्या पाहणीतही बंधाऱ्याची उपयोगिता व गुणवत्तेच्या प्रश्नावर बोट ठेवण्यात आले होते. कळंब तालुक्यात पाणीटंचाईवर कायमस्वरुपी मात करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सुरु असलेल्या सिमेंट नाल्यांच्या कामात प्रचंड गैरप्रकार होत आहे. बंधाऱ्याचे काम निकृष्ठ दर्जाचे केल्या गेले. आता तर कामही थांबविण्यात आले आहे. त्यामुळे या बंधाऱ्याची उपयोगिता व गुणवत्ता तपासण्याची मागणी करण्यात आली आहे. तरोडा येथील तीन सिमेंट बंधाऱ्यांची निर्मिती बेंबळा कॅनॉल विभागाच्यावतीने करण्यात आली. परंतु बंधारे बांधण्यात कुठलेही तांत्रिक कौशल्य वापरल्या गेले नाही. प्राकलनानुसार कामेच करण्यात आलेली नाही. बंधाऱ्याची खोली बहुतेक ठिकाणी राखल्या गेली नाही. केवळ थातुरमातूर कामे करण्यात धन्यता मानण्यात आली. मातीचे केवळ ढिगारे मारण्यात आले. कुठेही बर्म सोडण्यात आले नाही. आवश्यक ठिकाणी माती वाहून नेणे गरजेचे असताना एकही ब्रास माती वाहून नेण्यात आली नाही. त्यामुळे आतापासूनच माती नाल्यात पडू लागली आहे. वास्तविकपणे खोदलेली माती वाहुन नेण्याचे प्रावधान प्राकलनामध्ये समाविष्ठ आहे. त्यामुळे जोराच्या पावसात ही माती पुन्हा नाल्यात जमा होईल, अशी स्थिती आहे. त्यामुळे या अनियमितेविषयी आमदार डॉ.अशोक उईके यांनी उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार यांना पूर्ण चौकशी करण्याची सूचना केली आहे. राजकीय वरदहस्त व अधिकाऱ्यांची टक्केवारी यामुळे हा प्रकार झाल्याचे बोलले जाते. त्यामुळे आता या प्रकरणात जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी गांभिर्याने लक्ष देणे अपेक्षित आहे. सदर कामाच्या संदर्भात उच्चस्तरीय अधिकाऱ्यांनी दखल घेणे गरजेचे आहे. कारण शासनाची महत्वाकांक्षी असलेली योजना चुकीचे काम होत असल्यामुळे अपयशी ठरण्याची शक्यता आहे. युती शासनाची ‘जलयुक्त शिवार’ ही अतिशय महत्वाकांक्षी योजना आहे. बऱ्याच ठिकाणी यामध्ये सुंदर कामे सुरु आहे. परंतु कळंब तालुक्यात या योजनाचा बट्याबोळ करण्याचे काम अधिकारी व कंत्राटदारांनी चालविले आहे. याविषयी येत्या अधिवेशनात संबधितांना धारेवार धरु अशी माहिती आमदार डॉ.अशोक उईके यांनी दिली. (तालुका प्रतिनिधी)