शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

जैन भागवती दीक्षा गुणगौरव सोहळा

By admin | Updated: April 11, 2016 02:34 IST

जैन भागवती दीक्षा गुणगौरव कार्यक्रम येथील नवजीवन मंगल कार्यालयात घेण्यात आला.

यवतमाळ : जैन भागवती दीक्षा गुणगौरव कार्यक्रम येथील नवजीवन मंगल कार्यालयात घेण्यात आला. श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ पहूरच्यावतीने आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाभूळगाव येथील गुरू गणेश गोशाळेचे अध्यक्ष प्रकाशचंद छाजेड होते. पदमचंद बाफना परिवारातील काही सदस्यांनी जैन भागवती दीक्षा घेण्याचा संकल्प केला होता. त्याला अनुसरून जैन भागवती दीक्षा गुणगौरव समारंभ घेण्यात आला. यावेळी प्रमुख मार्गदर्शक व वक्ते म्हणून भारतीय जैन संघटनेचे राज्याध्यक्ष अमरचंद गांधी, जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह, वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ पहूरचे अध्यक्ष अशोकचंद दर्डा, सकल जैन समाजाचे पदमचंद बाफना आदी मंचावर उपस्थित होते.राज्याध्यक्ष अमरचंद गांधी म्हणाले, त्याग, संयम, तप आणि अहिंसेच्या मार्गावर चालण्यासाठी जैन धर्मात जैन भागवती दीक्षेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. वर्तमान परिस्थितीत जैन समाजाला सामाजिक दायित्व एकजूट होवून राबविणे गरजेचे आहे. अध्यक्षीय मार्गदर्शनात प्रकाशचंद छाजेड यांनी बाफना परिवारातील सदस्यांची प्रशंसा केली. पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह म्हणाले, जैन भागवती दीक्षा मी जवळून बघितली आहे. जैन धर्म विश्वधर्म असून अहिंसेची शिकवण देणारा आहे.प्रियता प्रवीण दर्डा, पूजा मनोज कोटेचा यांनी स्वागतगीत सादर केले. अभिनंदन गीत राखी आनंद दर्डा, वंदना चेतन दर्डा यांनी गायिले. ममता बाफना व पुष्पा तोडरवाल यांनी समयोचित मनोगत व्यक्त केले. मंगलपाठ आशीष बाफना यांनी केले. संचालन प्रा. दिलीप बंब व राजश्री बंब यांनी केले. यशस्वीतेसाठी प्रेमचंद बोरा, सुरेश तोडरवाल, डॉ. रवी कोटेचा, चेतन दर्डा, नरेंद्र दर्डा, आनंद दर्डा, डॉ. सतीश दर्डा, रिखब तोडरवाल, डॉ. रितेश कोटेचा, नीलमचंद तोडरवाल आदींनी पुढाकार घेतला. (वार्ताहर)