शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
2
खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह ३ जणांची मनसेतून हकालपट्टी; राज ठाकरेंचे आदेश
3
सर्वांनी यावेळी तुटून पडा; मनोज जरांगे यांनी मुंबईकडे कूच करण्याचा संपूर्ण प्लॅनच सांगितला!
4
"मनोज जरांगे, तुम्हाला एवढीच जर खाज आहे, तर ज्या शरद पवारांनी..."; आमदार लाड, दरेकर का भडकले?
5
Asia Cup 2025 : विराट-रोहितच्या खांद्यावरून पाकच्या माजी क्रिकेटरचा सूर्या दादावर निशाणा, म्हणे...
6
गणेश चतुर्थीला मित्रांना, नातेवाईकांना सोशल मीडियावर 'हा' संदेश पाठवून करा स्पेशल आमंत्रण
7
आयुष्य संपवण्यासाठी नदीत उडी मारली पण नंतर मूड बदलला, मदतीसाठी ओरडला अन्...
8
Team India Sponsor Deal : टीम इंडियाला पहिला स्पॉन्सर कधी मिळाला? कसा वाढत गेला कमाईचा आकडा?
9
विपिन रात्रभर डिस्कोला जायचा अन्...; निक्की मर्डर केसमध्ये 'मिस्ट्री गर्ल'ची एन्ट्री
10
Dream11चं 'पॅक-अप'; आता टीम इंडियाचा नवा स्पॉन्सर कोण? 'या' बड्या कंपन्यांची नावे चर्चेत
11
Nikki Murder Case : फक्त हुंडा नाही तर रील, पार्लरवरुनही झालेली भांडणं; निक्की हत्याप्रकरणात धक्कादायक खुलासा
12
तिच्यासोबतच लग्न करायचंय! तरुणाचं शोलेस्टाईल आंदोलन, पण प्रेयसीचं सत्य समजताच पायाखालची वाळू सरकली
13
गणेश चतुर्थी २०२५: युट्यूब, फेसबुक Live, रेकॉर्डेड गणपती पूजन पुण्य देते का? पूजा सफल होते?
14
PM मोदी उद्या करणार उद्घाटन; Maruti च्या पहिल्या EV कारची शंभरहून अधिक देशात निर्यात
15
'ऑपरेशन सिंदूर' नंतर भारताची पहिल्यांदाच पाकिस्तानला मदत! दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांनी एकमेकांशी संपर्क साधला
16
Gold Silver Price 25 August: सोन्याच्या दरात बंपर तेजी, एका दिवसात चांदी २६२७ रुपयांनी महागली; पाहा काय आहेत नवे दर?
17
जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा का दिला? अमित शाह म्हणाले, 'जास्त ताणून काहीतरी...'
18
'तुमच्या यूट्यूब चॅनेल्सवर माफी मागा', दिव्यांगांची खिल्ली उडवल्याप्रकरणी SC चे समय रैनासह ५ जणांना आदेश
19
काय आहे 'सलवा जुडूम' ?; ज्यावरून अमित शाहांनी विरोधकांच्या उपराष्ट्रपतिपदाच्या उमेदवाराला घेरले
20
जाऊ डबलसीट रे लांब लांब... पण हे असं?; 'लव्ह बर्ड्स'चा आणखी एक Video तुफान व्हायरल

सत्ता आहे म्हणूनच चार लोकांमध्ये मान

By admin | Updated: July 16, 2015 02:35 IST

पक्ष चालविताना केवळ गोड बोलून चालत नाही. सत्ता आहे म्हणून चार लोकात तुमचा मान आहे, अन्यथा कुणी विचारत नाही.

रावसाहेब दानवे : भाजपाच्या मेळाव्यात काँग्रेस नेत्यांवर तोंडसुख यवतमाळ : पक्ष चालविताना केवळ गोड बोलून चालत नाही. सत्ता आहे म्हणून चार लोकात तुमचा मान आहे, अन्यथा कुणी विचारत नाही. त्यामुळे हे वैभव टीकवून ठेवा आणि जनतेचा विश्वास संपादन करा, केंद्र व राज्य सरकारकडून अनेक जनहिताच्या योजना राबविल्या जात आहेत, जनहिताचे निर्णय घेण्यात येत आहे, त्याची माहिती गावागावात कार्यकर्त्यांनी पोहचवावी, असे आवाहन भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात केले. यावेळी त्यांनी काँग्रेस व माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्यावर चांगलेच तोंडसुख घेतले. तत्पूर्वी केंद्रीय मंत्री हंसराज अहीर यांनी आपल्या भाषणातून केंद्र सरकारकडून राबविल्या जाणाऱ्या योजनांची माहिती दिली. काँग्रेसचा बालेकिल्ला असणाऱ्या यवतमाळ जिल्ह्यात भाजपाने प्रथमच विधानसभेच्या पाच जागा जिंकल्या, भविष्यात यामध्ये वाढ झाली पाहिजे, असे अहीर म्हणाले. पक्ष माझ्यासाठी काय करतो, यापेक्षा मी पक्ष्यासाठी काय करतो, हा विचार होणे गरजेचे असल्याचे सांगून आज देशात ११ कोटी व महाराष्ट्रात एक कोटी भाजपा सदस्यांची नोंदणी झाली असून हा आकडा आणखी वाढणार असल्याचे ते म्हणाले. केंद्र शासन सर्वसामान्यांसाठी कधी नव्हे त्या योजना राबवित आहेत. या योजनांची माहिती कार्यकर्त्यांनी सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहचवावी, असे आवाहनही त्यांनी केले. मेळाव्याला जिल्ह्यातील आजी-माजी भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यानंतर शासकीय विश्रामभवनावर खासदार दानवे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीसोबत युती केल्याच्या मुद्यावर विचारले असता ही निवडणूक चिन्हावर होत नाही. त्यामुळे स्थानिक अ‍ॅडजेस्टमेंट म्हणून ही युती केली असावी, असे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, मंत्रीमंडळात समतोल आहे, विस्तारात मात्र यवतमाळ जिल्ह्याचा निश्चित विचार केला जाईल. अमरावती विभागात यवतमाळ जिल्ह्याने सर्वाधिक तीन लाख ७० हजार नव्या सदस्यांची नोंदणी केली आहे. म्हणूनच यवतमाळातून महासंपर्क अभियानाचा प्रारंभ केला आहे. शेतकऱ्यांना माफीचा कोणताही विचार सरकार स्तरावर नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)