शहरं
Join us  
Trending Stories
1
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
2
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
3
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
4
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
5
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
6
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
7
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
8
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
9
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 
10
लेख: आषाढी पायी वारी :विज्ञाननिष्ठ उत्सव
11
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
12
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 
13
भारतीय संगीत पुढे आणण्याची गरज, आशा भोसले यांनी मांडले मत; देवेंद्र फडणवीसांनी गायले गाणे
14
फिजिओथेरपीच्या इंटर्न्सच्या वेतनात वाढ, बीएस्सी नर्सिंगच्या इंटर्सना मिळणार विद्यावेतन
15
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
16
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
17
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
18
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
19
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
20
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग

हद्दवाढीचा विषय बारगळला

By admin | Updated: June 11, 2014 23:39 IST

वणी शहराच्या हद्दवाढीचा विषय मंगळवारी झालेल्या नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत प्रचंड विरोधानंतर बारगळला. त्यामुळे नगराध्यक्षांच्या ‘अजेंड्या’वरच पाणी फेरले गेल्याची चर्चा सुरू आहे.

सर्वसाधारण सभा : नगराध्यक्षांच्या छुप्या अजेंंड्यावर फिरले पाणीवणी : वणी शहराच्या हद्दवाढीचा विषय मंगळवारी झालेल्या नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत प्रचंड विरोधानंतर बारगळला. त्यामुळे नगराध्यक्षांच्या ‘अजेंड्या’वरच पाणी फेरले गेल्याची चर्चा सुरू आहे.नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा काल मंगळवारी पार पडली. या सभेत प्रमुख तीन विषय होते. त्यात कंट्रोल मॅप, शहराची हद्दवाढ आणि विकास कामे सुचविणे, या विषयांचा समावेश होता. सोबतच कंत्राटदारांची अनामत रक्कम परत करण्याचाही विषय होता. वणी शहरासभोवताल काही परिसर आहे. त्यात काही ठिकाणी वसाहती निर्माण झाल्या आहेत. मात्र त्यापैकी काही वसाहती ना नगरपरिषद क्षेत्रात मोडतात, ना लगतच्या ग्रामपंचायत क्षेत्रात मोडतात. परिणामी अशा वसाहतींकडे ग्रामपंचायती आणि नगरपरिषदेचे दुर्लक्ष होते. तेथे विकास कामे करता येत नाही. त्यामुळे शहराची हद्दवाढ करून अशा क्षेत्रांना नगरपरिषद क्षेत्रात समाविष्ट करण्याचा विषय होता. नगरपरिषद क्षेत्राची हद्दवाढ करताना शहरासभोवतालच्या अशा वसाहतींचा समावेश करतानाच काही इतर परिसराचाही हद्दवाढीत नगरपरिषद क्षेत्रात समाविष्ट करण्याचा ‘घाट’ घालण्यात आला होता, अशी माहिती आहे. यात काही ठिकाणी आता ले-आउटची निर्मिती झाली आहे. मात्र सदर ले-आउट तूर्तास नगरपरिषद हद्दीत मोडत नाही. त्यामुळे त्यांना नगरपरिषद क्षेत्रात समाविष्ट करण्यासाठीच हा हद्दवाढीचा विषय खुद्द नगराध्यक्षांनी उचलून धरल्याची माहिती आहे. मात्र सभेत विरोधकांसह काही सत्ताधारी सदस्यांनीही या हद्दवाढीला विरोध दर्शविल्याने अखेर हा विषय बारगळला.शहराचा आकार दिवसेंदिवस वाढत असून आधीच शहरवासीयांना अनेक मूलभूत सुविधा मिळत नाही. नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नाही. काही भागातील नागरिकांना अद्यापही बोअरवेलचेच पाणी पुरविले जाते. शहरातील अनेक ले-आउटही अद्याप पूर्णपणे विकसित झाले नाही. तसेच शहरालगतच्या कोणत्याही ग्रामपंचायतीने हद्दवाढ करण्याचा प्रस्तावही दिला नाही. असे असतानाही सर्वसाधारण सभेत हद्दवाढीचा विषय उपस्थित झाला, हे विशेष. त्यामुळे ही हद्दवाढ भू माफियांसाठी करण्यात येत आहे काय, असा संतप्त प्रश्न काही नगरसेवकांनी उपस्थित केला. याच सभेत नगरपरिषदेच्या विविध कामांसाठी करारनामे करणाऱ्या काही कंत्राटदारांना अनामत रक्कम परत करण्याचाही विषय होता. तथापि काही कंत्राटदारांनी करारनामे करूनही संबंधित काम पूर्ण केले नसल्यामुळे त्यांना अनामत रक्कम परत करू नये, अशी भूमिका काही सदस्यांनी मांडली. करारनामे करूनही कंत्राटदारांनी कामे न केल्याने त्यांची अनामत रक्कम जप्त करावी, अशी त्यांची भूमिका होती. विरोध प्रबळ असल्याने हा विषयही काल मार्गी लागू शकला नाही. (कार्यालय प्रतिनिधी)