शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतीपदासाठी राजनाथ सिंह यांचे नाव? राष्ट्रपतींनी स्वीकारला धनखड यांचा राजीनामा
2
मराठी तरुणीला मारहाण करून पळालेल्या परप्रांतीय तरुणाला मनसैनिकांनी पकडले, चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले 
3
केवळ १८ महिन्यांचा संसार, मागितली १२ कोटींची पोटगी, बीएमडब्ल्यू! कोर्ट महिलेला म्हणाले... 
4
७/११ बॉम्बस्फोटाच्या निकालाविराेधात सरकार सुप्रीम कोर्टात; गुरुवारी सुनावणी
5
नवे उपराष्ट्रपती निवडताना भाजपला नाही चिंता; ४२२ सदस्यांचे समर्थन; बहुमताने एकच उमेदवार
6
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा वादात; म्हणे ‘शासनच भिकारी’
7
दिल्लीत लँडिंग होताच विमानाला अचानक आग; सर्व प्रवासी व कर्मचारी सुखरूप
8
मतदार यादीवरून विरोधक आक्रमकच; पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी कामकाज ठप्प
9
धनखड यांनी राजीनामा नेमका का दिला? संसदेबाहेर चर्चा
10
गडचिरोलीत विकासविरोधी कारवायांना विदेशातून फंडिंग! नक्षलींनी बंदुका सोडून मुख्य प्रवाहात येण्याचे आवाहन
11
Mumbai Local: मुंबईहून कसाऱ्याला जाणाऱ्या लोकलवर दरड कोसळली, २ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती 
12
कॅप्टनच्या 'सेंच्युरी'नंतर टीम इंडियाकडून क्रांतीचा 'सिक्सर'! टी-२० सह इंग्लंडला वनडेतही 'धोबीपछाड'
13
‘गँग्ज ऑफ उल्हासनगर’पुढे पोलिसांचे सपशेल लोटांगण; आरोपीची पीडित मुलीच्या घरासमोर मिरवणूक
14
बिहारमधील मतदार यादीतून हटवली जाणार ५१ लाख मतदारांची नावं, या व्यक्तींचा समावेश, निवडणूक आयोगाने दिली माहिती
15
रहस्यमय रस्ता, दिवसातून केवळ दोन तासच दिसतो, मग गायब होतो, कारण काय?
16
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
17
"किसिंग सीन शूट करताना त्या अभिनेत्याने..."; अभिनेत्री विद्या बालनने सांगितला भयानक किस्सा
18
IND vs ENG : हरमनप्रीत कौरची कडक सेंच्युरी! निर्णायक वनडेत टीम इंडियानं केली विक्रमांची 'बरसात'
19
"अशाने महाराष्ट्राचं नुकसान होईल…’’, भाषावादादरम्यान तामिळनाडूमधील आठवण सांगत राज्यपालांचं मोठं विधान 
20
गिलनं 'टाइमपास' करणाऱ्या इंग्लंडच्या सलामी जोडीच्या 'त्या' कृतीचा केला 'पंचनामा'; म्हणाला...

इसापूरचे पाणी पात्रात आलेच नाही

By admin | Updated: April 22, 2017 01:47 IST

तालुक्याची जीवनदायिनी असलेली पैनगंगा कोरडी पडली असून या नदी पात्रात पाणी सोडण्यासाठी नागरिकांनी आंदोलने केली.

पैनगंगा कोरडी ठण्ण : उर्ध्व पैनगंगा प्रकल्प अधिकाऱ्यांविरोधात असंतोष उमरखेड : तालुक्याची जीवनदायिनी असलेली पैनगंगा कोरडी पडली असून या नदी पात्रात पाणी सोडण्यासाठी नागरिकांनी आंदोलने केली. इसापूर धरणाचे पाणी सोडण्यातही आले. परंतु उंचवडद परिसरात अद्यापही पाणी पोहोचेल नाही. त्यामुळे परिसरात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून उर्ध्व पैनगंगा प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांविरोधात नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. उमरखेड तालुक्याच्या तीनही बाजूंनी पैनगंगा नदी वाहते. नदी पात्रात पाणी असले की परिसरातील विहिरी आणि हापतपंपाची पाणी पातळी वाढते. मात्र यंदा हिवाळ्यातच पैनगंगा नदी कोरडी पडली. त्यामुळे ४० गावांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली. पैनगंगा नदीचे पाणी नदी पात्रात सोडावे यासाठी आंदोलने करण्यात आली. विशेष म्हणजे नांदेड आणि यवतमाळ जिल्हा प्रशासनाने १५ दलघमी पाणी राखीव ठेवले आहे. त्यातील ११ दलघमी नांदेडच्या कोट्यातील पाणी सोडण्यात आले. परंतु उंचवडद येथील परिसरासाठी पैनगंगा नदी पात्रात पाणी सोडले नाही. पाण्यासाठी येथील नागरिकांनी पैनगंगा नदीच्या पात्रातच चार दिवस उपोषण केले. परंतु प्रशासनाला जाग आली नाही. तीन दलघमी पाणी नदी पात्रात सोडल्यास या परिसराचा पाणी प्रश्न निकाली निघू शकतो. परंतु अद्यापही प्रशासनाने याबाबत कोणतीच उपाययोजना केली नाही. विशेष म्हणजे विदर्भात हा प्रकल्प असला तरी मराठवाड्याला मात्र मुबलक पाणी मिळते. उन्हाळ्यातही असाच दुजाभाव होतो. दोन आठवड्यापूर्वी पैनगंगेचे सोडलेले पाणी मराठवाड्यातील नागरिकांनी अडविले होते. त्यानंतर तहसील प्रशासनाने पोलिसांच्या मदतीने बांध उद्ध्वस्त करण्यात आला. परंतु त्यानंतरही उंचवडदपर्यंत पाणीच पोहोचले नाही. प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी नागरिकांनी आंदोलन केले. उर्ध्व पैनगंगा प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी त्यावेळी आश्वासन दिले. परंतु अद्यापही या आश्वासनाची पूर्तता झाली नाही. आणि पैनगंगेच्या पात्रात उंचवडद परिसरात पाणी पोहोचले नाही. त्यामुळे या परिसरातील अनेक गावांमध्ये भीषण पाणीटंंचाई निर्माण झाली आहे. माणसांसोबतच जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे. एवढी गंभीर परिस्थिती असताना या परिसरातील लोकप्रतिनिधी मात्र कोणताही पवित्रा घेत नाही. उमरखेड तालुक्यातील पैनगंगा नदी तीरावरील गावांसोबतच इतर गावांमध्येही भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. अनेक गावातील नळ योजना अखेरच्या घटका मोजत आहे. तर विहिरींनी तळ गाठला असून हातपंपही बंद पडले आहे. पंचायत समितीने पाणीटंचाईचा कृती आराखडा तयार केला आहे. मात्र त्याची अद्यापही प्रभावी उपाययोजना झाली नाही. त्यामुळे बंदी भागासह तालुक्यातील इतर गावांमध्येही पाणीटंचाईच्या झळा नागरिकांना पोहोचत आहे. अनेकदा भारनियमामुळे कृत्रिम पाणीटंचाई निर्माण होते. उमरखेड तालुक्यातील पाणीटंचाईवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी लोकप्रतिनिधींसह प्रशासनाने पुढाकार घेण्याची गरज आहे. (शहर प्रतिनिधी)