शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारवर निशाणा?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
4
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
5
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
6
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
7
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
8
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
9
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
10
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
11
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
12
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
13
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
14
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
15
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
16
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
17
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
18
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
19
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
20
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
Daily Top 2Weekly Top 5

इसापूरचे पाणी पात्रात आलेच नाही

By admin | Updated: April 22, 2017 01:47 IST

तालुक्याची जीवनदायिनी असलेली पैनगंगा कोरडी पडली असून या नदी पात्रात पाणी सोडण्यासाठी नागरिकांनी आंदोलने केली.

पैनगंगा कोरडी ठण्ण : उर्ध्व पैनगंगा प्रकल्प अधिकाऱ्यांविरोधात असंतोष उमरखेड : तालुक्याची जीवनदायिनी असलेली पैनगंगा कोरडी पडली असून या नदी पात्रात पाणी सोडण्यासाठी नागरिकांनी आंदोलने केली. इसापूर धरणाचे पाणी सोडण्यातही आले. परंतु उंचवडद परिसरात अद्यापही पाणी पोहोचेल नाही. त्यामुळे परिसरात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून उर्ध्व पैनगंगा प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांविरोधात नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. उमरखेड तालुक्याच्या तीनही बाजूंनी पैनगंगा नदी वाहते. नदी पात्रात पाणी असले की परिसरातील विहिरी आणि हापतपंपाची पाणी पातळी वाढते. मात्र यंदा हिवाळ्यातच पैनगंगा नदी कोरडी पडली. त्यामुळे ४० गावांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली. पैनगंगा नदीचे पाणी नदी पात्रात सोडावे यासाठी आंदोलने करण्यात आली. विशेष म्हणजे नांदेड आणि यवतमाळ जिल्हा प्रशासनाने १५ दलघमी पाणी राखीव ठेवले आहे. त्यातील ११ दलघमी नांदेडच्या कोट्यातील पाणी सोडण्यात आले. परंतु उंचवडद येथील परिसरासाठी पैनगंगा नदी पात्रात पाणी सोडले नाही. पाण्यासाठी येथील नागरिकांनी पैनगंगा नदीच्या पात्रातच चार दिवस उपोषण केले. परंतु प्रशासनाला जाग आली नाही. तीन दलघमी पाणी नदी पात्रात सोडल्यास या परिसराचा पाणी प्रश्न निकाली निघू शकतो. परंतु अद्यापही प्रशासनाने याबाबत कोणतीच उपाययोजना केली नाही. विशेष म्हणजे विदर्भात हा प्रकल्प असला तरी मराठवाड्याला मात्र मुबलक पाणी मिळते. उन्हाळ्यातही असाच दुजाभाव होतो. दोन आठवड्यापूर्वी पैनगंगेचे सोडलेले पाणी मराठवाड्यातील नागरिकांनी अडविले होते. त्यानंतर तहसील प्रशासनाने पोलिसांच्या मदतीने बांध उद्ध्वस्त करण्यात आला. परंतु त्यानंतरही उंचवडदपर्यंत पाणीच पोहोचले नाही. प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी नागरिकांनी आंदोलन केले. उर्ध्व पैनगंगा प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी त्यावेळी आश्वासन दिले. परंतु अद्यापही या आश्वासनाची पूर्तता झाली नाही. आणि पैनगंगेच्या पात्रात उंचवडद परिसरात पाणी पोहोचले नाही. त्यामुळे या परिसरातील अनेक गावांमध्ये भीषण पाणीटंंचाई निर्माण झाली आहे. माणसांसोबतच जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे. एवढी गंभीर परिस्थिती असताना या परिसरातील लोकप्रतिनिधी मात्र कोणताही पवित्रा घेत नाही. उमरखेड तालुक्यातील पैनगंगा नदी तीरावरील गावांसोबतच इतर गावांमध्येही भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. अनेक गावातील नळ योजना अखेरच्या घटका मोजत आहे. तर विहिरींनी तळ गाठला असून हातपंपही बंद पडले आहे. पंचायत समितीने पाणीटंचाईचा कृती आराखडा तयार केला आहे. मात्र त्याची अद्यापही प्रभावी उपाययोजना झाली नाही. त्यामुळे बंदी भागासह तालुक्यातील इतर गावांमध्येही पाणीटंचाईच्या झळा नागरिकांना पोहोचत आहे. अनेकदा भारनियमामुळे कृत्रिम पाणीटंचाई निर्माण होते. उमरखेड तालुक्यातील पाणीटंचाईवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी लोकप्रतिनिधींसह प्रशासनाने पुढाकार घेण्याची गरज आहे. (शहर प्रतिनिधी)