शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
2
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
3
अमेरिकेत करिअरचे दार उघडणारा H-1B व्हिसा काय आहे? कोणाला मिळतो? जाणून घ्या संपूर्ण माहिती...
4
पुढच्या आठवड्यात येणार IPO चा पाऊस, २२ आयपीओंमध्ये मिळणार गुंतवणूकीची संधी; कोणत्या आहेत कंपन्या?
5
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
6
Hanuman Temple: 'या' मंदिरात हनुमान निद्रावस्थेत, तरीही केवळ दर्शनाने पूर्ण होते भक्तांची प्रत्येक इच्छा 
7
५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?
8
शाहिद आफ्रिदीचं इरफान पठाणला आव्हान, म्हणाला, ‘’मर्द असशील तर…”, मिळालं असं प्रत्युत्तर
9
नागपूरमध्ये मनोज जायस्वाल यांना अटक, सीबीआयची हॉटेलमध्ये कारवाई; 4000 कोटींची केस काय?
10
मोलकरणीने मालकिणीच्या 'थप्पड'चा असा घेतला बदला, वाचून तुमच्याही भुवया उंचावतील!
11
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
12
'शिंदे, पवार अन् भाजपचे ९०% आमदार मते चोरुन निवडून आले', संजय राऊतांचे टीकास्त्र
13
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
14
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
15
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
16
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
17
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
18
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
19
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
20
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा

पाण्यासाठी निधीची चणचण

By admin | Updated: February 19, 2015 00:11 IST

उन्हाळ्यातील भीषण पाणी टंचाई निवारणासाठी नगरपरिषदेला निधीची चणचण भासत आहे. शासनाकडे सहा कोटींची मागणी करूनही एक छदामही नगरपरिषदेला अद्याप प्राप्त झाला नाही.

वणी : उन्हाळ्यातील भीषण पाणी टंचाई निवारणासाठी नगरपरिषदेला निधीची चणचण भासत आहे. शासनाकडे सहा कोटींची मागणी करूनही एक छदामही नगरपरिषदेला अद्याप प्राप्त झाला नाही. त्यामुळे पुन्हा एकदा आज बुधवारी नवीन प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.यावर्षी अत्यल्प पाऊस झाला. त्यामुळे शहराची जीवनदायीनी असलेली निर्गुडा नदी जानेवारीतच आटली आहे. मारेगाव तालुक्यातील नवरगाव येथील मध्यम प्रकल्पावर या नदीचे भवितव्य अवलंबून आहे. प्रकल्पातून पाणी सोडले तरच, ते नागरिकांना मिळू शकणार आहे. नगरपरिषदेने संभाव्य पाणी टंचाई निवारणार्थ चार कोटी ९0 लाख ते पाच कोटी ९0 लाखांची मागणी केली होती. मात्र यापैकी एक छदामही अद्याप नगरपरिषदेला प्राप्त झाला नाही. पाणीटंचाई निवारणासाठी शहरात १२ नवीन ट्युबवेल मंजूर करण्यात आले आहे. मात्र त्यासाठीही अद्याप निधी प्राप्त झाला नाही. यातील चार ट्युबवेल निर्गुडा नदीच्या पात्राजवळ खोदण्यात येणार होत्या. नदीच्या जॅकवेल परिसरातील बंधाऱ्यांची विशेष दुरुस्ती करण्यात येणार होती. नळ योजनांची विशेष दुरुस्ती केली जाणार होती. सोबतच अत्याधिक टंचाईग्रस्त परिसराला टँकरने पाणी पुरवठा केला जाणार आहे. निर्गुडा नदीशिवाय शहरात इतरत्र आठ ट्युबवेल खोदण्याचा मानस होता. या सर्व कामांसाठी थेट पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या प्रधान सचिवांकडे उपाययोजना करण्यासाठी पाच कोटी ९0 लाखांची मागणी करण्यात आली होती. सोबतच मार्चनंतर शहरात भीषण पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. मात्र नगरपरिषदेला अद्याप पाणीटंचाई निवारणासाठी शासनाकडून एक पैकाही मिळाला नाही. सध्या नवरगाव धरणातून आरक्षित केलेल्या पाण्यावर शहरवासीयांची तहान भागविली जात आहे. या धरणातून दोन दशलक्ष घनमीटर पाणी आरक्षित करण्यात आले आहे. मात्र हे पाणी मार्चपर्यंतच पुरणार आहे. त्यानंतर शहरात पाणीटंचाई तीव्र होण्याची शक्यता आहे. (कार्यालय प्रतिनिधी)केंद्रीय राज्यमंत्र्यांना घातले साकडेसंभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन काही नगरसेवकांनी केंद्रीय खत राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्यासह आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, पाणी पुरवठा विभाचे प्रधान सचिव, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन पाठविले आहे. नगरपरिषदेच्या कृती आराखड्याला मंजुरात देण्यासाठी त्यांनी सहकार्य करण्याची मागणी नगरसेवक सिद्दीक रंगरेज, अभिजित सातोकर यांनी केली आहे. निधी उशीरा प्राप्त झाल्यास पाणीटंचाई निवारणाच्या उपाययोजना रखडण्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे. नगरपरिषदेने २६ डिसेंबरलाच कृती आराखडा जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला. त्याला मंजुरी प्राप्त होईस्तोवर आराखड्याचा विहित कालावधी संपुष्टात आल्यास संभाव्य पाणीटंचाई कशी दूर होईल, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.निधीसाठी पुन्हा नव्याने प्रस्ताव पाठविलानगरपरिषदेने पाणीटंचाई निवारणासाठी तत्काळ निधी मिळावा म्हणून आज बुधवारी पुन्हा निधीसाठी नवीन प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला आहे. शहरातील १२ बोअरसाठी तातडीने ३0 लाख रूपये देण्याची मागणी त्यातून करण्यात आली आहे. उपाययोजनांसाठी अद्याप एकही पैसा मिळाला नसल्याने निधीची चणचण जाणवत आहे. निधी उपलब्ध नसल्यामुळे सर्वच उपाययोजना रखडल्या आहेत. परिणामी पाणीटंचाई तीव्र होण्याची शक्यता बळावली आहे. आता जेमतेम तीन महिने कालावधी आहे. त्यात उपाययोजना तातडीने करणे गरजेचे आहे. नदी सफाई, बंधाऱ्यासाठी ४० लाखनिर्गुडा नदीच्या स्वच्छतेसाठी व बंधाऱ्यांची उंची वाढविण्यासाठी नगरपरिषदेने जनरल फंडातून ४0 लाखांची तरतूद केली आहे. या निधीतून नदीच्या सफाईला सुरूवात करण्यात आली आहे. त्यामुळे नदीत पाणी साचून काही काळ तरी पाणीटंचाईला रोखून धरण्यात यश मिळेल, अशी अपेक्षा आहे. नदीत पाणी साचून राहिल्यास नागरिकांना पाणी मिळू शकणार आहे. या निधीतून नदीतील काही बंधाऱ्यांची उंची वाढविण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी गोपिचंद पवार यांनी दिली. येत्या १५ दिवसांत हे काम पूर्ण होण्याची शक्यता त्यांनी वर्तविली.