शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
4
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
5
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
6
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
7
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
8
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
9
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
10
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
11
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
12
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
13
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
14
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
15
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
16
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
17
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
18
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
19
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
20
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!

पाण्यासाठी निधीची चणचण

By admin | Updated: February 19, 2015 00:11 IST

उन्हाळ्यातील भीषण पाणी टंचाई निवारणासाठी नगरपरिषदेला निधीची चणचण भासत आहे. शासनाकडे सहा कोटींची मागणी करूनही एक छदामही नगरपरिषदेला अद्याप प्राप्त झाला नाही.

वणी : उन्हाळ्यातील भीषण पाणी टंचाई निवारणासाठी नगरपरिषदेला निधीची चणचण भासत आहे. शासनाकडे सहा कोटींची मागणी करूनही एक छदामही नगरपरिषदेला अद्याप प्राप्त झाला नाही. त्यामुळे पुन्हा एकदा आज बुधवारी नवीन प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.यावर्षी अत्यल्प पाऊस झाला. त्यामुळे शहराची जीवनदायीनी असलेली निर्गुडा नदी जानेवारीतच आटली आहे. मारेगाव तालुक्यातील नवरगाव येथील मध्यम प्रकल्पावर या नदीचे भवितव्य अवलंबून आहे. प्रकल्पातून पाणी सोडले तरच, ते नागरिकांना मिळू शकणार आहे. नगरपरिषदेने संभाव्य पाणी टंचाई निवारणार्थ चार कोटी ९0 लाख ते पाच कोटी ९0 लाखांची मागणी केली होती. मात्र यापैकी एक छदामही अद्याप नगरपरिषदेला प्राप्त झाला नाही. पाणीटंचाई निवारणासाठी शहरात १२ नवीन ट्युबवेल मंजूर करण्यात आले आहे. मात्र त्यासाठीही अद्याप निधी प्राप्त झाला नाही. यातील चार ट्युबवेल निर्गुडा नदीच्या पात्राजवळ खोदण्यात येणार होत्या. नदीच्या जॅकवेल परिसरातील बंधाऱ्यांची विशेष दुरुस्ती करण्यात येणार होती. नळ योजनांची विशेष दुरुस्ती केली जाणार होती. सोबतच अत्याधिक टंचाईग्रस्त परिसराला टँकरने पाणी पुरवठा केला जाणार आहे. निर्गुडा नदीशिवाय शहरात इतरत्र आठ ट्युबवेल खोदण्याचा मानस होता. या सर्व कामांसाठी थेट पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या प्रधान सचिवांकडे उपाययोजना करण्यासाठी पाच कोटी ९0 लाखांची मागणी करण्यात आली होती. सोबतच मार्चनंतर शहरात भीषण पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. मात्र नगरपरिषदेला अद्याप पाणीटंचाई निवारणासाठी शासनाकडून एक पैकाही मिळाला नाही. सध्या नवरगाव धरणातून आरक्षित केलेल्या पाण्यावर शहरवासीयांची तहान भागविली जात आहे. या धरणातून दोन दशलक्ष घनमीटर पाणी आरक्षित करण्यात आले आहे. मात्र हे पाणी मार्चपर्यंतच पुरणार आहे. त्यानंतर शहरात पाणीटंचाई तीव्र होण्याची शक्यता आहे. (कार्यालय प्रतिनिधी)केंद्रीय राज्यमंत्र्यांना घातले साकडेसंभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन काही नगरसेवकांनी केंद्रीय खत राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्यासह आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, पाणी पुरवठा विभाचे प्रधान सचिव, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन पाठविले आहे. नगरपरिषदेच्या कृती आराखड्याला मंजुरात देण्यासाठी त्यांनी सहकार्य करण्याची मागणी नगरसेवक सिद्दीक रंगरेज, अभिजित सातोकर यांनी केली आहे. निधी उशीरा प्राप्त झाल्यास पाणीटंचाई निवारणाच्या उपाययोजना रखडण्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे. नगरपरिषदेने २६ डिसेंबरलाच कृती आराखडा जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला. त्याला मंजुरी प्राप्त होईस्तोवर आराखड्याचा विहित कालावधी संपुष्टात आल्यास संभाव्य पाणीटंचाई कशी दूर होईल, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.निधीसाठी पुन्हा नव्याने प्रस्ताव पाठविलानगरपरिषदेने पाणीटंचाई निवारणासाठी तत्काळ निधी मिळावा म्हणून आज बुधवारी पुन्हा निधीसाठी नवीन प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला आहे. शहरातील १२ बोअरसाठी तातडीने ३0 लाख रूपये देण्याची मागणी त्यातून करण्यात आली आहे. उपाययोजनांसाठी अद्याप एकही पैसा मिळाला नसल्याने निधीची चणचण जाणवत आहे. निधी उपलब्ध नसल्यामुळे सर्वच उपाययोजना रखडल्या आहेत. परिणामी पाणीटंचाई तीव्र होण्याची शक्यता बळावली आहे. आता जेमतेम तीन महिने कालावधी आहे. त्यात उपाययोजना तातडीने करणे गरजेचे आहे. नदी सफाई, बंधाऱ्यासाठी ४० लाखनिर्गुडा नदीच्या स्वच्छतेसाठी व बंधाऱ्यांची उंची वाढविण्यासाठी नगरपरिषदेने जनरल फंडातून ४0 लाखांची तरतूद केली आहे. या निधीतून नदीच्या सफाईला सुरूवात करण्यात आली आहे. त्यामुळे नदीत पाणी साचून काही काळ तरी पाणीटंचाईला रोखून धरण्यात यश मिळेल, अशी अपेक्षा आहे. नदीत पाणी साचून राहिल्यास नागरिकांना पाणी मिळू शकणार आहे. या निधीतून नदीतील काही बंधाऱ्यांची उंची वाढविण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी गोपिचंद पवार यांनी दिली. येत्या १५ दिवसांत हे काम पूर्ण होण्याची शक्यता त्यांनी वर्तविली.