शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

सिंचन तलाव अद्याप तहानलेलेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2019 21:17 IST

यंदाच्या पावसाळ्यात संपूर्ण जून महिना कोरडा गेल्यामुळे वणी व मारेगाव तालुक्यातील सिंचन तलावांची अवस्था अद्यापही बिकट आहे. या तलावात थोडेफार पाणी साचले असले तरी अद्याप ११.९ टक्क्यांनी हे तलाव रिते आहेत.

ठळक मुद्देवणी उपविभाग : आठ तलावांमध्ये ११.९ टक्के जलसाठा कमी

म.आसिफ शेख ।लोकमत न्यूज नेटवर्कवणी : यंदाच्या पावसाळ्यात संपूर्ण जून महिना कोरडा गेल्यामुळे वणी व मारेगाव तालुक्यातील सिंचन तलावांची अवस्था अद्यापही बिकट आहे. या तलावात थोडेफार पाणी साचले असले तरी अद्याप ११.९ टक्क्यांनी हे तलाव रिते आहेत.मारेगाव तालुक्यातील रामपूर येथील सिंचन तलावात सर्वात कमी जलसाठा, तर वणी तालुक्यातील रासा येथील सिंचन तलावात सर्वाधिक जलसाठा आहे. वणी तालुक्यात दोन, तर मारेगाव तालुक्यात सहा सिंचन तलाव आहे. शेतातील सिंचनासाठी शेतकऱ्यांना पाणी मिळावे, यासाठी हे तलाव तयार करण्यात आले आहे. मात्र मागील काही वर्षात अल्प पर्जन्यमानामुळे अनेकदा डिसेंबर महिन्यातच हे तलाव कोरडे पडतात. त्यामुळे शेती सिंचनाची परिस्थिती बिकट होऊन जाते. यावर्षी मान्सूनचे आगमन लवकर होईल, असे भाकित हवामान खात्याने वर्तविले होते. परंतु अनेक वर्षानंतर पहिल्यांदाच मान्सून उशिरा दाखल झाला. गेल्या आठवड्यापासून या भागात पावसाने जोर पकडला असला तरी पावसाची झड मात्र अद्यापही अनुभवली नाही. वणी तालुक्यातील रासा येथील सिंचन तलावाची साठवण क्षमता १.२६३ दलघमी आहे. मात्र यावर्षी या तलावात ३८.७१ टक्के जलसाठा आहे.बोर्डा तलावाची क्षमता २.००३ दलघमी एवढी आहे. यावर्षी या तलावात केवळ ३.६९ टक्के जलसाठा आहे. मारेगाव तालुक्यातील शिवनाळा तलाव १९.९२ टक्के भरला आहे. या तलावाची साठवण क्षमता ०.७७८ दलघमी आहे. रामपुरा तलाव ३.१९ टक्के भरला असून तलावाची क्षमता १.३१८ दलघमी आहे. नरसाळा तलाव ३१.३७ टक्के भरला आहे. या तलावाची क्षमता १.३४८ दलघमी आहे. खंडणी तलाव १४.३२ टक्के भरला असून या तलावाची क्षमता ३.०६७ दलघमी एवढी आहे. म्हैसदोडका तलावाची साठवण क्षमता ०.८२० दलघमी आहे. हा तलाव केवळ ६.५८ टक्के भरला आहे. पेंढरी तलावाची जलसाठ्याची क्षमता २.५६८ दलघमी आहे. हा तलाव केवळ १० टक्के भरला आहे.हवामान खात्याच्या अंदाजावर विश्वास ठेऊन शेतकऱ्यांनी यंदा हंगामाचे नियोजन केले. मात्र पाऊसच उशिरा आल्याने शेतकऱ्यांचे संपूर्ण नियोजन कोलमडून गेले आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या पावसानंतर शेतकऱ्यांनी पेरणीची कामे हाती घेतली. या हंगामात चांगला पाऊस आला तरच हे सिंचन तलाव भरण्याची शक्यता आहे.आॅगस्टपर्यंत तलाव १०० टक्के भरण्याची अपेक्षायंदाच्या हंगामात पावसाचा जोर चांगला राहिल्यास आॅगस्ट महिन्यापर्यंत वणी व मारेगाव तालुक्यातील सिंचन तलाव १०० टक्के भरतील, असा विश्वास कालवा निरीक्षक नितीन करमरकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.