शहरं
Join us  
Trending Stories
1
युएन महासभेत गाझाचा मुद्दा; ट्रम्प यांनी मुनीर आणि शरीफ यांच्या पाठिंब्याचा केला खुलासा!
2
वांगचूक यांना सोडा; तरच लडाखबाबत केंद्राशी चर्चा करू! एलएबीच्या भूमिकेला केडीएचा ठाम पाठिंबा
3
बिहारमध्ये एकूण ७.४२ कोटी मतदार; एसआयआरपूर्वीपेक्षा ४७ लाख कमी
4
यंदाचा मान्सून ठरला 'घातक'; अतिवृष्टी, पूरामुळे देशात १,५२८ जणांचा गेला बळी! 
5
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
6
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
7
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
8
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
9
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
10
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
11
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
12
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
13
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
14
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
15
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
16
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
17
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
18
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
19
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
20
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली

सिंचन तलाव अद्याप तहानलेलेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2019 21:17 IST

यंदाच्या पावसाळ्यात संपूर्ण जून महिना कोरडा गेल्यामुळे वणी व मारेगाव तालुक्यातील सिंचन तलावांची अवस्था अद्यापही बिकट आहे. या तलावात थोडेफार पाणी साचले असले तरी अद्याप ११.९ टक्क्यांनी हे तलाव रिते आहेत.

ठळक मुद्देवणी उपविभाग : आठ तलावांमध्ये ११.९ टक्के जलसाठा कमी

म.आसिफ शेख ।लोकमत न्यूज नेटवर्कवणी : यंदाच्या पावसाळ्यात संपूर्ण जून महिना कोरडा गेल्यामुळे वणी व मारेगाव तालुक्यातील सिंचन तलावांची अवस्था अद्यापही बिकट आहे. या तलावात थोडेफार पाणी साचले असले तरी अद्याप ११.९ टक्क्यांनी हे तलाव रिते आहेत.मारेगाव तालुक्यातील रामपूर येथील सिंचन तलावात सर्वात कमी जलसाठा, तर वणी तालुक्यातील रासा येथील सिंचन तलावात सर्वाधिक जलसाठा आहे. वणी तालुक्यात दोन, तर मारेगाव तालुक्यात सहा सिंचन तलाव आहे. शेतातील सिंचनासाठी शेतकऱ्यांना पाणी मिळावे, यासाठी हे तलाव तयार करण्यात आले आहे. मात्र मागील काही वर्षात अल्प पर्जन्यमानामुळे अनेकदा डिसेंबर महिन्यातच हे तलाव कोरडे पडतात. त्यामुळे शेती सिंचनाची परिस्थिती बिकट होऊन जाते. यावर्षी मान्सूनचे आगमन लवकर होईल, असे भाकित हवामान खात्याने वर्तविले होते. परंतु अनेक वर्षानंतर पहिल्यांदाच मान्सून उशिरा दाखल झाला. गेल्या आठवड्यापासून या भागात पावसाने जोर पकडला असला तरी पावसाची झड मात्र अद्यापही अनुभवली नाही. वणी तालुक्यातील रासा येथील सिंचन तलावाची साठवण क्षमता १.२६३ दलघमी आहे. मात्र यावर्षी या तलावात ३८.७१ टक्के जलसाठा आहे.बोर्डा तलावाची क्षमता २.००३ दलघमी एवढी आहे. यावर्षी या तलावात केवळ ३.६९ टक्के जलसाठा आहे. मारेगाव तालुक्यातील शिवनाळा तलाव १९.९२ टक्के भरला आहे. या तलावाची साठवण क्षमता ०.७७८ दलघमी आहे. रामपुरा तलाव ३.१९ टक्के भरला असून तलावाची क्षमता १.३१८ दलघमी आहे. नरसाळा तलाव ३१.३७ टक्के भरला आहे. या तलावाची क्षमता १.३४८ दलघमी आहे. खंडणी तलाव १४.३२ टक्के भरला असून या तलावाची क्षमता ३.०६७ दलघमी एवढी आहे. म्हैसदोडका तलावाची साठवण क्षमता ०.८२० दलघमी आहे. हा तलाव केवळ ६.५८ टक्के भरला आहे. पेंढरी तलावाची जलसाठ्याची क्षमता २.५६८ दलघमी आहे. हा तलाव केवळ १० टक्के भरला आहे.हवामान खात्याच्या अंदाजावर विश्वास ठेऊन शेतकऱ्यांनी यंदा हंगामाचे नियोजन केले. मात्र पाऊसच उशिरा आल्याने शेतकऱ्यांचे संपूर्ण नियोजन कोलमडून गेले आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या पावसानंतर शेतकऱ्यांनी पेरणीची कामे हाती घेतली. या हंगामात चांगला पाऊस आला तरच हे सिंचन तलाव भरण्याची शक्यता आहे.आॅगस्टपर्यंत तलाव १०० टक्के भरण्याची अपेक्षायंदाच्या हंगामात पावसाचा जोर चांगला राहिल्यास आॅगस्ट महिन्यापर्यंत वणी व मारेगाव तालुक्यातील सिंचन तलाव १०० टक्के भरतील, असा विश्वास कालवा निरीक्षक नितीन करमरकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.