शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
2
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
3
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
4
भयंकर! ट्रेंड फॉलो करण्यासाठी रेल्वे ट्रॅकवर रील बनवणं बेतलं जीवावर; मागून आली ट्रेन अन्...
5
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
6
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार
7
"माझं बालवाङ्मय वाचण्याचं वय राहिलेलं नाही"; CM देवेंद्र फडणवीसांचा संजय राऊतांना खोचक टोला
8
Kedarnath Weather Alert: केदारनाथला जात आहात! जाणून घ्या, पुढील ५ दिवस कसे असणार हवामान?
9
'भाजपवर शंका घेणाऱ्यांनी पाकिस्तानात...' शिंदे गटाचे नेते संजय निरुपम यांचे मोठे वक्तव्य
10
सचिन तेंडुलकर, धोनीनंतर आता रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनाही मिळणार 'हा' सन्मान?
11
डिफेन्स शेअर्सची घोडदौड सुरुच; मिड आणि स्मॉलकॅपमध्येही तेजी, 'या' स्टॉक्सना मोठं नुकसान
12
Astrology: १७ मे, गजकेसरी योगात शनिकृपेचा ५ राशींवर वर्षाव; घडणार अविस्मरणीय घटना!
13
Astro Tips: शनिवारी सायंकाळी पिंपळपारावार लावा पंचदिप; भाग्योदय येईल समीप!
14
"मला त्यांचं तोंडही पाहायचं नाही..", पाकिस्तानी वडिलांचा प्रचंड द्वेष करते ही अभिनेत्री
15
ना रस्ता... ना बस, मोबाइलला तर रेंजही नाही; अखेर गावकऱ्यांनी बीडमधील वाडीच काढली विक्रीला!
16
अनुष्का तिवारी नाही, कारागिरांसारखी मुलं करत होती शस्त्रक्रिया! 'हेअर ट्रान्सप्लांट' प्रकरणात धक्कादायक खुलासा
17
डोकं फिरलंया! फायटर जेट पाडून भारताने लावली पाकची वाट, तरी इशाक दार यांनी थोपटली त्यांच्या वायुदलाची पाठ
18
परेश रावल यांची 'हेरा फेरी ३' मधून एक्झिट! समोर आलं कारण; चाहत्यांची घोर निराशा
19
टीम कुक यांनी ट्रम्प यांचा सल्ला का धुडकावला? अ‍ॅपल अमेरिकेला स्थलांतरीत केल्यास काय होईल?
20
COVID 19 : हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोना परतला, रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ

ठक्कर बाप्पा योजनेत अनियमितपणा

By admin | Updated: December 13, 2014 22:48 IST

येथे गटग्रामपंचायत असून या ग्रामपंचायतीची लोकसंख्या दोन हजार ८०० च्या जवळपास आहे. मात्र ग्रामपंचायतीअंतर्गत सुरू असलेल्या ठक्कर बाप्पा योजनेतील कामांध्ये प्रचंड अनियमितता आहे.

शिबला : येथे गटग्रामपंचायत असून या ग्रामपंचायतीची लोकसंख्या दोन हजार ८०० च्या जवळपास आहे. मात्र ग्रामपंचायतीअंतर्गत सुरू असलेल्या ठक्कर बाप्पा योजनेतील कामांध्ये प्रचंड अनियमितता आहे.शिबला गटग्रापंचायतीत शिबला, गोदामपोड पाचपोहर, उंबरीपोड, बंडापोड, रामपूर, राजणी या लहान गाव आणि पोडांचा समावेश आहे. या ग्रामपंचायतीअंतर्गत ९० टक्के आदिवासी बांधव राहातात. येथे पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणात जाणवत होती. त्यामुळे ग्रामपंचायतीने पुढाकार घेत ठक्कर बाप्पा योजनेमधून शिबला ते चौपाटी येथे १५ लाख रूपयांची पाणी पुरवठा विहीर व टाकीचे बांधकाम मंजूर करून घेतले. तसेच रामपूर येथे पाच लाख रूपयांचे बांधकाम मंजूर झाले. पाचपोहर येथे सात लाख रूपये निधीचे काम घेण्यात आले.ही कामे मंजूर झाली. त्यांची काही प्रमाणात बांधकामेही झाली. पाचपोहर येथे मात्र निधी कमी पडत असल्यामुळे काम ठप्प ठेवण्यात आले. ठक्कर बाप्पा योजनेमधून शिबला येथे २५ लाखांचे काम, तर चौपाटी येथे १५ लाख रूपयांचे पाणी पुरवठा योजनेचे काम पूर्ण करण्यात आले. मात्र प्रत्यक्षात अद्याप जनतेपर्यंत पाणी पोहचले नाही. जनता अद्याप तहानलेलीच आहे. रामपूर येथेही पाच लाखांचे काम पूर्ण झाले. मात्र तेथील जनतेपर्यंतही अद्याप पाणी पोहोचलेच नाही. ही कामे पूर्ण होऊन आता दोन वर्षे लोटली आहेत. मात्र ग्रामपंचायत कोणतीही हालचाल करताना दिसत नाही. या पाणी पुरवठा बांधकामध्ये निकृष्ट साहित्याचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला, असे ग्रामस्थ सांगतात. रामपूर येथे तर कंत्राटदाराने चक्क जुन्याच विहिरीवर बांधकाम केल्याचे ग्रामपंचायत व प्रशासनाला माहिती असूनही कोणतीही कारवाई झाली नाही. या कामांमध्ये कंत्राटदाराने बांधकाम विभागाच्या संबंधित अभियंत्यासोबत ‘अर्थपूर्ण’ वाटाघाटी करून देयके मात्र काढली. आता परिसरातील ग्रामस्थांना पाणी समस्या जाणवत आहे. बांधकाम तर पूर्ण झाले, पण पाणी कधी मिळणार, असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे. ठक्कर बाप्पा योजनेमधील शासनाचे लाखो रूपये व्यर्थ तर जाणार नाही, अशी शंका त्यांता सतावत आहे. याप्रकरणी संबंधित कंत्राटदार व प्रशासनाच्या जबाबदार अधिकाऱ्यांना जाब विचारण्याची आता वेळ आली आहे. आदिवासीबहुल भागातील अडानी जनतेच्या अज्ञानाचा लाभ घेत या योजनेत अनियमितपणा केला जात आहे. त्याचा लाभ कंत्राटदारांनाच मिळत आहे. येथील पाणी समस्या तातडीने सोडवावी, अशी ग्रामस्थांची अपेक्षा आहे. (वार्ताहर)