शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
4
'त्या प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
5
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
6
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
7
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
8
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
9
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
10
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
11
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
12
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
13
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
14
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
15
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
16
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
17
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
18
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
19
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
20
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

ठक्कर बाप्पा योजनेत अनियमितपणा

By admin | Updated: December 13, 2014 22:48 IST

येथे गटग्रामपंचायत असून या ग्रामपंचायतीची लोकसंख्या दोन हजार ८०० च्या जवळपास आहे. मात्र ग्रामपंचायतीअंतर्गत सुरू असलेल्या ठक्कर बाप्पा योजनेतील कामांध्ये प्रचंड अनियमितता आहे.

शिबला : येथे गटग्रामपंचायत असून या ग्रामपंचायतीची लोकसंख्या दोन हजार ८०० च्या जवळपास आहे. मात्र ग्रामपंचायतीअंतर्गत सुरू असलेल्या ठक्कर बाप्पा योजनेतील कामांध्ये प्रचंड अनियमितता आहे.शिबला गटग्रापंचायतीत शिबला, गोदामपोड पाचपोहर, उंबरीपोड, बंडापोड, रामपूर, राजणी या लहान गाव आणि पोडांचा समावेश आहे. या ग्रामपंचायतीअंतर्गत ९० टक्के आदिवासी बांधव राहातात. येथे पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणात जाणवत होती. त्यामुळे ग्रामपंचायतीने पुढाकार घेत ठक्कर बाप्पा योजनेमधून शिबला ते चौपाटी येथे १५ लाख रूपयांची पाणी पुरवठा विहीर व टाकीचे बांधकाम मंजूर करून घेतले. तसेच रामपूर येथे पाच लाख रूपयांचे बांधकाम मंजूर झाले. पाचपोहर येथे सात लाख रूपये निधीचे काम घेण्यात आले.ही कामे मंजूर झाली. त्यांची काही प्रमाणात बांधकामेही झाली. पाचपोहर येथे मात्र निधी कमी पडत असल्यामुळे काम ठप्प ठेवण्यात आले. ठक्कर बाप्पा योजनेमधून शिबला येथे २५ लाखांचे काम, तर चौपाटी येथे १५ लाख रूपयांचे पाणी पुरवठा योजनेचे काम पूर्ण करण्यात आले. मात्र प्रत्यक्षात अद्याप जनतेपर्यंत पाणी पोहचले नाही. जनता अद्याप तहानलेलीच आहे. रामपूर येथेही पाच लाखांचे काम पूर्ण झाले. मात्र तेथील जनतेपर्यंतही अद्याप पाणी पोहोचलेच नाही. ही कामे पूर्ण होऊन आता दोन वर्षे लोटली आहेत. मात्र ग्रामपंचायत कोणतीही हालचाल करताना दिसत नाही. या पाणी पुरवठा बांधकामध्ये निकृष्ट साहित्याचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला, असे ग्रामस्थ सांगतात. रामपूर येथे तर कंत्राटदाराने चक्क जुन्याच विहिरीवर बांधकाम केल्याचे ग्रामपंचायत व प्रशासनाला माहिती असूनही कोणतीही कारवाई झाली नाही. या कामांमध्ये कंत्राटदाराने बांधकाम विभागाच्या संबंधित अभियंत्यासोबत ‘अर्थपूर्ण’ वाटाघाटी करून देयके मात्र काढली. आता परिसरातील ग्रामस्थांना पाणी समस्या जाणवत आहे. बांधकाम तर पूर्ण झाले, पण पाणी कधी मिळणार, असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे. ठक्कर बाप्पा योजनेमधील शासनाचे लाखो रूपये व्यर्थ तर जाणार नाही, अशी शंका त्यांता सतावत आहे. याप्रकरणी संबंधित कंत्राटदार व प्रशासनाच्या जबाबदार अधिकाऱ्यांना जाब विचारण्याची आता वेळ आली आहे. आदिवासीबहुल भागातील अडानी जनतेच्या अज्ञानाचा लाभ घेत या योजनेत अनियमितपणा केला जात आहे. त्याचा लाभ कंत्राटदारांनाच मिळत आहे. येथील पाणी समस्या तातडीने सोडवावी, अशी ग्रामस्थांची अपेक्षा आहे. (वार्ताहर)