शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तराखंडच्या राज्यपालांचा धामींना धक्का ! UCC दुरुस्ती व धर्मांतर विरोधी सुधारणा विधेयक परत पाठविले
2
न्यायाधीशांना ई-मेल पाठवून नागपूर जिल्हा न्यायालयात बॉम्बस्फोट करण्याची धमकी
3
माजी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश! काँग्रेसचं काय चुकतंय विचारताच, म्हणाल्या...
4
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
5
‘मला उमेदवारी द्या, अन्यथा माझ्या जीवाचं काही बरंवाईट झाल्यास पक्ष जबाबदार राहील’, भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्याची धमकी
6
चांदीची 'पांढरी' लाट! सोन्याला मागे टाकत गाठला २ लाखांचा ऐतिहासिक टप्पा; काय आहेत भाववाढीची कारणे?
7
डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानक का वापरलं 'भारत मॉडेल'?; मिड टर्म निवडणुकीपूर्वी अमेरिकेत मोफत खैरात
8
'पुढे दरोडा पडलाय, दागिने काढून ठेवा'; पोलिसांच्या वेशातील टोळीचा पर्दाफाश, लोकांना घाबरवून लुटायचे
9
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
10
"विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे २९ महापालिकांत पराभव पक्के", भाजपाने संजय राऊतांना डिवचलं
11
Car 360 Degree Camera: कारमध्ये ३६० डिग्री कॅमेरा असणं किती फायद्याचं? नेमकं कसं आणि काय काम करतो?
12
Mumbai: खड्ड्यात दुचाकी आदळून तरुणाचा मृत्यू, पण पोलिसांनी मृतावरच नोंदवला गुन्हा!
13
"आम्ही काही मैत्रिणी नाही आहोत...", लारा दत्तासोबत काम केल्यावर रिंकू राजगुरुची प्रतिक्रिया
14
Supriya Sule: "धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतले तर...", खासदार सुप्रिया सुळेंचा इशारा!
15
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
16
अर्टिगाचे काही खरे नाही...! ७-सीटर 'ग्रॅव्हाईट' लाँच होणार, ६ लाखांत मिळणार हाय-टेक फीचर्स...
17
निष्काळजीपणाचा कळस! 'A' पॉझिटिव्ह ऐवजी 'B+' रक्त अन्...; ७५ वर्षीय रुग्णाच्या जीवाशी खेळ
18
Ola Electric च्या शेअर्समध्ये मोठी घसरण! भाविश अग्रवाल यांनी हिस्सा विकून फेडलं कर्ज; पण गुंतवणूकदारांची चिंता वाढली
19
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
20
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
Daily Top 2Weekly Top 5

बाजारात आवक मंदावली

By admin | Updated: November 19, 2014 22:49 IST

उशीरा आलेला पाऊस, त्यानंतर मारलेली दडी, परतीच्या पावसाने दिलेला दगा, पावसाअभावी उदभवलेली दुबार-तिबार पेरणीची परिस्थिती, यामुळे यावर्षी कापूस, सोयाबिनसह सर्वच शेतमालाच्या

वणी : उशीरा आलेला पाऊस, त्यानंतर मारलेली दडी, परतीच्या पावसाने दिलेला दगा, पावसाअभावी उदभवलेली दुबार-तिबार पेरणीची परिस्थिती, यामुळे यावर्षी कापूस, सोयाबिनसह सर्वच शेतमालाच्या उतारीत घट आली आहे. परिणामी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमालाची आवकही प्रचंड मंदावली आहे. बाजार समितीत अद्यापही शुकशुकाट दिसून येत आहे. यावर्षी रोहिणी, मृग नक्षत्रापासून पावसाने दडी मारली. नंतर दोन दिवस संततधार पाऊस कोसळला. त्या दोनच दिवसांत तब्बल ३५ मिलीमीटर पाऊस पडला होता. त्यामुळे शेतात ओलावा आला होता. तरीही मृगात केलेली पेरणी वाया गेली होती. बहुतांश शेतकऱ्यांवर दुबार-तिबार पेरणीचे संकट ओढवले होते. त्यामुळे शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला होता. प्रथम बियाणे पेरल्यानंतर मोड आल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले होते. सरतेशेवटी वणी तालुक्यात ४१ हजार ४९४ हेक्टरवर कपाशी, सात हजार ५९ हेक्टरवर सोयाबीन, पाच हजार ४४६ हेक्टरवर तूर, तर ५७८ हेक्टरवर ज्वारीची पेरणी झाली होती. तथापि यापैकी तब्बल २८ हजार ९३३ हेक्टवर शेतकऱ्यांना दुबार-तिबार पेरणी करावी लागली होती. शेतकऱ्यांनी कपाशीसह २३५ हेक्टरवर सोयाबीन, दोन हजार २५५ हेक्टरवर तूर, तर ७३ हेक्टरवर ज्वारीची दुबार-तिबार पेरणी केली होती. पावसाअभावी दुबार आणि तिबार पेरणीच्या संकटाला सामोरे जावे लागलेल्या शेतकऱ्यांच्या कष्टाला मात्र तरीही यश आल्याचे दिसत नाही. प्रचंड मेहनत करून, काबाडकष्ट करून, कर्ज काढून शेतकऱ्यांनी दुबार-तिबार पेरणी करूनही हाती काहीच येत नसल्याने बळीराजा यावर्षी घायाकुतीस आला आहे. त्यातच पुन्हा परतीच्या पावसाने दगा दिला. परिणामी जमिनीतील ओलावा कमी झाला अन् शेतातील उभ्या पिकांवर विविध रोगांनी आक्रमण केले. त्यामुळे फवारणीचा खर्चही प्रचंड वाढला. एवढा सर्व आटापिटा करूनही उत्तारा कमी आल्याने शेतकरी प्रचंड हादरून गेले आहेत. कपाशी आणि सोयाबिनचा उतारा कमी आल्याने बाजार समितीतीही शुकशुकाट दिसून येत आहे. मागीलवर्षी नोव्हेंबर महिन्याच्या मध्यापर्यंत बाजार समितीत वर्दळ वाढली होती. मात्र यावर्षी ही वर्दळ प्रचंड प्रमाणात रोडावली आहे. कापूस, सोयाबीन, तूर, ज्वारी आदी पिकांची आवक मंदावली आहे. त्यातच दरही योग्य मिळत नसल्याने बळीराजा पुरता हवालदिल झाला आहे.यावर्षी आजपर्यंत येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत केवळ २७ हजार ४५८ क्विंटल कापूस, सहा हजार २२९ क्विंटल सोयाबीन, ११३ क्विंटल चना, ७६ क्विंटल तूर, तर ४८ क्विंटल गहू खरेदी करण्यात आल्याची माहिती बाजार समितीचे सचिव अशोक झाडे यांनी दिली. वणीसह समितीचा शिंदोला आणि नवरगाव येथे उपबाजार आहे. या तिनही ठिकाणी मिळून एवढाच शेतमाल बाजार समितीत आला आहे. त्यावरूनच यावर्षी शेतमालाची आवक मंदावल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. (कार्यालय प्रतिनिधी)