शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
4
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
5
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
6
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
7
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
8
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
9
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
10
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
11
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
12
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
13
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
14
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
15
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
16
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
17
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
18
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
20
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष

बाजारात आवक मंदावली

By admin | Updated: November 19, 2014 22:49 IST

उशीरा आलेला पाऊस, त्यानंतर मारलेली दडी, परतीच्या पावसाने दिलेला दगा, पावसाअभावी उदभवलेली दुबार-तिबार पेरणीची परिस्थिती, यामुळे यावर्षी कापूस, सोयाबिनसह सर्वच शेतमालाच्या

वणी : उशीरा आलेला पाऊस, त्यानंतर मारलेली दडी, परतीच्या पावसाने दिलेला दगा, पावसाअभावी उदभवलेली दुबार-तिबार पेरणीची परिस्थिती, यामुळे यावर्षी कापूस, सोयाबिनसह सर्वच शेतमालाच्या उतारीत घट आली आहे. परिणामी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमालाची आवकही प्रचंड मंदावली आहे. बाजार समितीत अद्यापही शुकशुकाट दिसून येत आहे. यावर्षी रोहिणी, मृग नक्षत्रापासून पावसाने दडी मारली. नंतर दोन दिवस संततधार पाऊस कोसळला. त्या दोनच दिवसांत तब्बल ३५ मिलीमीटर पाऊस पडला होता. त्यामुळे शेतात ओलावा आला होता. तरीही मृगात केलेली पेरणी वाया गेली होती. बहुतांश शेतकऱ्यांवर दुबार-तिबार पेरणीचे संकट ओढवले होते. त्यामुळे शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला होता. प्रथम बियाणे पेरल्यानंतर मोड आल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले होते. सरतेशेवटी वणी तालुक्यात ४१ हजार ४९४ हेक्टरवर कपाशी, सात हजार ५९ हेक्टरवर सोयाबीन, पाच हजार ४४६ हेक्टरवर तूर, तर ५७८ हेक्टरवर ज्वारीची पेरणी झाली होती. तथापि यापैकी तब्बल २८ हजार ९३३ हेक्टवर शेतकऱ्यांना दुबार-तिबार पेरणी करावी लागली होती. शेतकऱ्यांनी कपाशीसह २३५ हेक्टरवर सोयाबीन, दोन हजार २५५ हेक्टरवर तूर, तर ७३ हेक्टरवर ज्वारीची दुबार-तिबार पेरणी केली होती. पावसाअभावी दुबार आणि तिबार पेरणीच्या संकटाला सामोरे जावे लागलेल्या शेतकऱ्यांच्या कष्टाला मात्र तरीही यश आल्याचे दिसत नाही. प्रचंड मेहनत करून, काबाडकष्ट करून, कर्ज काढून शेतकऱ्यांनी दुबार-तिबार पेरणी करूनही हाती काहीच येत नसल्याने बळीराजा यावर्षी घायाकुतीस आला आहे. त्यातच पुन्हा परतीच्या पावसाने दगा दिला. परिणामी जमिनीतील ओलावा कमी झाला अन् शेतातील उभ्या पिकांवर विविध रोगांनी आक्रमण केले. त्यामुळे फवारणीचा खर्चही प्रचंड वाढला. एवढा सर्व आटापिटा करूनही उत्तारा कमी आल्याने शेतकरी प्रचंड हादरून गेले आहेत. कपाशी आणि सोयाबिनचा उतारा कमी आल्याने बाजार समितीतीही शुकशुकाट दिसून येत आहे. मागीलवर्षी नोव्हेंबर महिन्याच्या मध्यापर्यंत बाजार समितीत वर्दळ वाढली होती. मात्र यावर्षी ही वर्दळ प्रचंड प्रमाणात रोडावली आहे. कापूस, सोयाबीन, तूर, ज्वारी आदी पिकांची आवक मंदावली आहे. त्यातच दरही योग्य मिळत नसल्याने बळीराजा पुरता हवालदिल झाला आहे.यावर्षी आजपर्यंत येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत केवळ २७ हजार ४५८ क्विंटल कापूस, सहा हजार २२९ क्विंटल सोयाबीन, ११३ क्विंटल चना, ७६ क्विंटल तूर, तर ४८ क्विंटल गहू खरेदी करण्यात आल्याची माहिती बाजार समितीचे सचिव अशोक झाडे यांनी दिली. वणीसह समितीचा शिंदोला आणि नवरगाव येथे उपबाजार आहे. या तिनही ठिकाणी मिळून एवढाच शेतमाल बाजार समितीत आला आहे. त्यावरूनच यावर्षी शेतमालाची आवक मंदावल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. (कार्यालय प्रतिनिधी)