शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
3
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
4
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
5
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
6
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
7
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
8
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
9
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
10
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
11
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
12
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
13
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
14
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
15
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
16
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
17
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
18
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
19
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
20
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?

घाटातील खचलेली कडा अपघातास आमंत्रण

By admin | Updated: November 8, 2014 01:46 IST

पुसद-वाशिम या वर्दळीच्या मार्गावरील खंडाळा घाटातील रस्त्याची खचलेली कडा गेल्या सहा महिन्यांपासून दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहे...

पुसद : पुसद-वाशिम या वर्दळीच्या मार्गावरील खंडाळा घाटातील रस्त्याची खचलेली कडा गेल्या सहा महिन्यांपासून दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहे. या ठिकाणचा रस्ता अरुंद असून वाहनचालकास हा रस्ता अनोळखी असल्यास केव्हाही अपघात होऊ शकतो. यवतमाळ-मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद इत्यादी दैनंदिन प्रवासी वाहतूक होणाऱ्या या रस्त्याकडे बांधकाम विभागाचे मात्र दुर्लक्ष आहे. पुसद-वाशिम मार्गावर सारखी रहदारी असते. शेतमालाची वाहतूक करणाऱ्या शेतकऱ्यांपासून तर पुण्या-मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स्ची दररोज ये-जा असते. खंडाळा घाटात ऐन वळणावरच ठिकठिकाणी रस्त्याच्या कडा खचलेल्या आहेत. वाहनांच्या प्रखर प्रकाशझोतात रात्रीच्या वेळी वाहनचालकांना खचलेल्या कडांचा अंदाज येत नाही. घाटाचा रस्ता असल्याने एखाद्या वाहनाचे चाक रस्त्याच्या खाली उतरले तर मोठा अपघात होऊ शकतो. गेल्या सहा महिन्यात कित्येक अपघातांची नोंद झाली आहे. दुरुस्तीच्या नावाखाली पावसाळ्यात नादुरुस्त रस्त्यांचे अहवाल संबंधित उपअभियंत्यांकडून मागविण्यात आले होते. ‘लोकमत’मध्ये खचलेल्या कडांचे वृत्त प्रकाशित झाल्यानंतर बांधकाम विभागाने मध्यंतरी दुरुस्तीचे काम हाती घेतले होते. परंतु गेल्या सहा महिन्यांपासून घाटातील कडा दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहे. प्रशासकीय यंत्रणेचे किरकोळ कामाकडे वारंवार दुर्लक्ष असून मोठ्या कामांनाच प्राधान्य देण्यात येत आहे. कोट्यवधींचा निधी येऊनही या रस्त्यांची दुरवस्था कायम आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने डागडुजीची कामे हाती घेतली खरी, परंतु चित्र काही वेगळेच दिसते आहे. रस्त्याच्या डागडुजीचे कंत्राट देणाराकडे संबंधित कामाची सर्वस्वी जबाबदारी असते. सदर कंत्राटदाराकडून काही दोष राहिल्यास त्यावर दंडात्मक कारवाई करावी लागते. कडा खचून पडलेल्या खड्यांमुळे एखादा अपघात घडल्यास त्या ठेकेदाराला दोषी ठरविण्याचे शासनाचे नियम आहेत. गत सहा महिन्यांपासून या रस्त्यांवर काही चारचाकी व अनेक दुचाकी वाहनचालकांचे अपघात झालेले आहेत. त्यामुळे हा रस्ता मृत्यूला आमंत्रण देत असतांना सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दुरुस्तीची कुठलीही कारवाई झालेली नाही. परिणामी अपघातांच्या घटनांत वाढ होत आहे. वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी आहे. (वार्ताहर)