शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

कोट्यवधींची गुंतवणूक मात्र उद्योगाला गती नाही

By admin | Updated: August 26, 2014 23:44 IST

ग्रामीण तरुणांच्या हाताला काम मिळावे, उद्योग व्यवसाय भरभराटीस यावे यासाठी स्थापन केलेल्या उमरखेड येथील एमआयडीसीत उद्योजकांनी कोट्यवधींची गुंतवणूक केली.

उमरखेड (कुपटी) : ग्रामीण तरुणांच्या हाताला काम मिळावे, उद्योग व्यवसाय भरभराटीस यावे यासाठी स्थापन केलेल्या उमरखेड येथील एमआयडीसीत उद्योजकांनी कोट्यवधींची गुंतवणूक केली. मात्र एमआयडीसीतील दुरावस्थेने उद्योगांना गतीच आली नाही. परिणामी बँकांचे व्याज भरुन उद्योगक मात्र त्रस्त होत आहे.उमरखेड शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर एमआयडीसी आहे. औद्योगिक विकास महामंडळाचे एमआयडीसीच्या विकासाकडे दुर्लक्ष होत आहे. मात्र या ठिकाणी १८ उद्योजकांनी आपले उद्योग सुरू केले. यासाठी राष्ट्रीयकृत बँकांसह खासगी बँकांमधूनही कर्ज घेतले. काजू प्रक्रिया उद्योग, तेल मील, दालमील, बॅटरी निर्मिती, मसाला उद्योग, चहापत्ती, भंगार इन्डस्ट्रीज, टायर रिमोल्डींग, अ‍ॅग्रो इन्डस्ट्रीज आदी उद्योग सुरू केले. यासाठी उद्योजकांनी तब्बल ५० कोटींच्यावर गुंतवणूक केली. परंतु आता येथील दुरावस्था पाहता उद्योजक हतबल झाले आहे. एमआयडीसीला २४ तास वीज पुरवठा होणे गरजेचे आहे. परंतु ग्रामीण फिडरवर एमआयडीसी जोडल्याने वीज पुरवठा खंडित असतो. त्याचा मोठा फटका उत्पादनावर होतो. विजेसोबतच पाण्याचीही गंभीर समस्या आहे. ५० लाख लिटर दररोज पाण्याची आवश्यकता असताना ५० हजार लिटर पाणी उपलब्ध होते. यामुळे व्यापारी त्रस्त झाले आहे. यासाठी वारंवार निवेदने दिली. परंतु उपयोग झाला नाही. उत्पादन घटत चालले असून बँकांचे दरमहा व्याज मात्र वाढत आहे. (वार्ताहर)