शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
4
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
5
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
6
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
7
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
8
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
9
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
10
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
11
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
12
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
13
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
14
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
15
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
16
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
17
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
18
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
19
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार
20
 तामिळनाडूत संघाच्या शाखेवर मोठी कारवाई, ३९ स्वयंसेवक ताब्यात, समोर आलं असं कारण  

पोषण आहार रिफिलिंगचा तपास गुंडाळला

By admin | Updated: March 24, 2015 01:17 IST

शालेय विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनासाठी पुरविण्यात येणारा तांदूळ रिफिलिंग होत असल्याचा प्रकार पोलीस

दोनच आरोपी : जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांना वरिष्ठांच्या मार्गदर्शनाची प्रतीक्षायवतमाळ : शालेय विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनासाठी पुरविण्यात येणारा तांदूळ रिफिलिंग होत असल्याचा प्रकार पोलीस कारवाईतून पुढे आला. त्यानंतर फार मोठी साखळी हाती लागेल अशी शक्यता वर्तविली जात होती. प्रत्यक्षात मात्र हा अपहार दडपण्याच प्रयत्न यंत्रणेच्यास्तरावरून होत आहे. जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्याने पोलिसात तक्रार देऊन गोडाऊन सील करत वरिष्ठांकडे मार्गदर्शन मागविले आहे. दोन दिवसात या प्रकरणात कोणतेच धागेदोरे सापडलेले नाही. जिल्ह्यात शालेय पोषण आहराचा तांदुळ पुरवठा करण्याचे कंत्राट जिल्हा मार्केटिंग अधिकारी भगवानदास डगवार यांनी विनोद एन्टरप्रायझेस नागपूर यांना दिले आहे. विनोद एन्टरप्रायझेस कडून जिल्ह्यात आरोपी अर्शद बेग याला जिल्हास्तरावरचे कंत्राट देण्यात आले आहे. मार्केटिंग फेडरेशनकडून फेब्रुवारी अखेरपर्यंत ६५ हजार ६६६ क्विंटल तांदुळाचा पुरवठा झाल्याचे दाखविण्यात आला आहे. शनिवारी दुपारी पोलिसांनी नागपूर बायपासवर तांदुळ घेऊन जात असलेले वाहन ताब्यात घेतले. पोलिसांचा संशय वाढल्याने त्यांनी आणखी चौकशी केली असता शालेय पोषण आहाराच्या तांदुळ रिफिलिंगचा कारखानाच हाती लागला. मार्केटिंग फेडरेशनच्या कंत्राटदाराने स्वत:च्या गोडाऊनमध्येच हा गोरखधंदा सुरू केला होता. याप्रकरणात कंत्राटदार अर्शद बेग इकबाल बेग आणि चालक आशीष सुधाकर ढाले यांना ताब्यात घेतले. पोलिसांनी या आरोपींकडून कुठलीही अधिक माहिती अद्यापर्यंत हस्तगत केलेली नाही. या दोन्ही आरोपींना न्यायलयीन कोठडी मिळाली आहे. आता तपास पुढे सरकाण्याची आशाच मंदावली आहे. ज्या वाहनातून ४० कट्टे तादुळ जप्त करण्यता आले, तो कुठे नेला जात होता. हे अद्यापही निरूत्तरीतच आहे. शिवाय ९१ कट्टे असलेले गोडाऊनही सील झाले. मात्र या कामात इतर कोणा-कोणाची मदत घेतली जात होती, रिफिलिंगला बाहेरून कोणाचे पाठबळ होते याचा शोध घेणे अद्यापही बाकी आहे. शालेय पोषण आहारावर डल्ला मारने हा नवीन प्रकार नाही मात्र इतक्या मोठ्या प्रमाणात प्रथमच घबाड बाहेर आले आहे. त्यामुळे या प्रकरणाचा सखोल तपास केल्यास अनेक बडे मासे गळाला लागण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषदेतील शिक्षण विभागातूनही या रिफिलिंगला पाठबळ मिळत होते का याचाही उलट तपास घेणे गरजेचे आहे. पटसंख्या अधिक दाखवून कमी उचल झाली का याचाही तपास घेण्याची गरज आहे. (कार्यालय प्रतिनिधी)पोलीस कारवाईनंतरच तांदुळ रिफिलिंग होत असल्याचा प्रकार माहीत झाला. त्यानंतर रितसर तक्रार दाखल केली आहे. पोषण आहार पुरवठ्याचे कंत्राट मुंबई येथील प्रधान कार्यालयाकडून दिले जाते. कोणती एजन्सी नियुक्त केली जाणार आहे. याचीसुद्धा माहिती स्थानिक पातळीवर राहत नाही. वरिष्ठांकडून मिळालेल्या निर्देशाप्रमाणेच काम करण्यात येते. तादुळ कमी अथवा निकृष्ठ पुरवठा होत असल्याची तक्रार आलेली नाही. पुढील कारवाईबाबत वरिष्ठांचे मार्गदर्शन मागविले आहे. - भगवानदास डगवार, जिल्हा मार्केटिंग अधिकारी