शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

काल्याच्या काळ्या कारनाम्याचा स्थानिक गुन्हे शाखेकडे तपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 05:00 IST

कळंब, वर्धा येथे काल्या उर्फ शेख रहीम शेख करीम याने मोठमोठे गोदाम बांधले आहे. या ठिकाणी रेशनच्या धान्याचा साठा केला जातो. ही बाब २५ ऑगस्टला धाड टाकून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने उघड केली. ‘लोकमत’ सातत्याने वृत्ताच्या माध्यमातून गरिबांचे धान्य कसे काळ्याबाजारात विकले जात आहे, याचा पाठपुरावा करीत आहे. याचीच दखल घेत पोलिसांनी कारवाई केली. काल्याची पाळेमुळे खोदून काढण्यासाठी रेशनच्या काळ्या बाजारावर लक्ष केंद्रित करण्यात आले. 

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : रेशनचा तांदूळ व गहू याची काळ्या बाजारात विक्री करणारी मोठी टोळी जिल्ह्यात सक्रिय आहे. या टोळीला आजपर्यंत अभय मिळत होते. याचा म्होरक्या कळंब येथील काल्या असून त्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रंगेहात अटक केली. त्याच्या गोदामातून जवळपास १६ लाखांंचे रेशनचे धान्य जप्त केले. याशिवाय यवतमाळातही दोन धान्य घेवून जाणारे संशयित ट्रक पकडण्यात आले. रेशन माफियाचे नेटवर्क राज्यभर पसरले असून आंतरजिल्हा याची वाहतूक सुरू असते.  रेशन धान्यातून उभ्या केलेल्या काल्याच्या नेटवर्कचा तपास करण्याची जबाबदारी स्थानिक गुन्हे शाखेकडे देण्यात आली. कळंब ठाणेदारांनी या गुन्ह्यात न्यायालयाकडून काल्याची एक दिवसाची पोलीस कोठडी घेतली होती. कळंब, वर्धा येथे काल्या उर्फ शेख रहीम शेख करीम याने मोठमोठे गोदाम बांधले आहे. या ठिकाणी रेशनच्या धान्याचा साठा केला जातो. ही बाब २५ ऑगस्टला धाड टाकून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने उघड केली. ‘लोकमत’ सातत्याने वृत्ताच्या माध्यमातून गरिबांचे धान्य कसे काळ्याबाजारात विकले जात आहे, याचा पाठपुरावा करीत आहे. याचीच दखल घेत पोलिसांनी कारवाई केली. काल्याची पाळेमुळे खोदून काढण्यासाठी रेशनच्या काळ्या बाजारावर लक्ष केंद्रित करण्यात आले. जिल्ह्यासह बाहेर जिल्ह्यातून, तेलंगणा सीमेवर रेशनचा तांदूळ, गहू साठवून त्याची विक्री केली जाते. या व्यवहारात मोठी आर्थिक उलाढाल होत असल्याने यामध्ये अनेक बडे मासे  आहेत. त्यांचा शोध घेण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक डाॅ. दिलीप पाटील भुजबळ यांनी कळंबच्या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे दिला आहे. रेशनचे धान्य परस्पर विकणाऱ्या या माफियांच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांकडून पुरेपूर तयारी केली जात आहे. इतकेच नव्हे तर काल्याच्या यवतमाळ जिल्ह्यासह वर्धा, तेलंगाणा येथील नेटवर्कचाही शोध घेतला जात आहे. रेशनचा तांदूळ राईस मिलपर्यंत कसा पोहोचतो, घातक रसायने वापरुन या तांदळावर कशी प्रक्रिया करून त्याला सुगंधित तांदळात मिसळून विक्री केली जाते, याचाही शोध पोलीस घेणार आहे. 

पुरवठ्याच्या अहवालाने दोन ट्रक सुटले - जीवनावश्यक वस्तू कायद्यानुसार रेशनच्या धान्याच्या काळ्या बाजार चालविणाऱ्यांवर कारवाईचा अधिकार पोलिसांना नाही, धडधडीत दिसूनही रेशनचे धान्य हे पुरवठा विभागाकडून प्रमाणित करून घ्यावे लागते,  बरेचदा पुरवठ्याची यंत्रणा सोईस्कर भूमिका घेवून ते धान्य रेशनिंगचा नसल्याचा अहवाल देतात, त्यामुळेच यवतमाळ ग्रामीण पोलिसांनी भांबराजा येथे पकडलेला ५०० पोते संशयित तांदुळाचा ट्रक सोडून द्यावा लागला. तर जिल्हा वाहतूक शाखेने आर्णी बायपासवर पकडलेला ट्रकसुद्धा केवळ पुरवठा विभागाचा अहवाल निगेटिव्ह आल्याने सोडावा लागला. - पोलीस कारवाई करताच पुढे मात्र रेशनचा अहवाल निर्णायक ठरतो. यामुळेच बरेचदा रेशनच्या काळ्या व्यापाराची माहिती असूनही पोलिसांकडून कारवाईसाठी पुढाकार घेतला जात नाही. पुरवठा विभागाचे सहकार्य मिळत नसल्याचेही सांगितले जाते. गरिबाचे धान्य हडपणाऱ्यांविरोधात पोलीस व पुरवठा विभागाला समन्वय ठेवूनच काम करावे लागणार आहे.  

 

टॅग्स :Policeपोलिसmafiaमाफिया