शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा का दिला? अमित शाह म्हणाले, 'जास्त ताणून काहीतरी...'
2
काय आहे 'सलवा जुडूम' ?; ज्यावरून अमित शाहांनी विरोधकांच्या उपराष्ट्रपतिपदाच्या उमेदवाराला घेरले
3
AI ची कमाल, आता म्हातारपणही रोखणार, राहाल "चिरतरुण"! काय आहे चॅटबॉट रिव्हर्स एजिंग? जाणून घ्या
4
अमित साटम मुंबई भाजपाचे नवे अध्यक्ष; महापालिकेत नवा रेकॉर्ड करणार, CM देवेंद्र फडणवीसांचा दावा
5
ओला इलेक्ट्रिकच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी; नीति आयोगाच्या वृत्ताचा परिणाम, तुमच्याकडे आहे का?
6
Pune: सिंहगडावरून बेपत्ता झालेला गौतम गायकवाड पाच दिवसांनी सापडला; कुठे होता, पोलिसांनी काय सांगितलं?
7
"मी कुणाच्या वाट्याला जात नाही आणि..." अजित पवारांनी घेतली संकर्षण कऱ्हाडेची फिरकी
8
अमेरिका ७, चीन ४, भारत १.., ही कोणती यादी, जिथे फक्त दोनच दिग्गजांचं आहे वर्चस्व; यातून काय मिळताहेत संकेत?
9
लहान गुंतवणुकीतून कोट्यधीश होण्यासाठी SIP का आहे बेस्ट? 'हे' ८ मुद्दे ठरतात गेमचेंजर
10
गर्लफ्रेंडशी शरीरसंबंध प्रस्थापित करताना पुरूषाचा मृत्यू, कोर्टाने प्रेमिकेला ठोठवला दंड
11
वराह म्हणजे डुक्कर नाही, तर ते यज्ञरूप आहे; वराह जयंतीनिमित्त जाणून घ्या विष्णूंचे अवतारकार्य
12
Viral: रीलचा नाद जीवावर बेतला; २२ वर्षीय युट्यूबर धबधब्यामध्ये बुडाला, घटनाकॅमेऱ्यात कैद
13
गुडन्यूज! परिणीती चोप्रा होणार आई, लग्नाच्या दोन वर्षांनंतर कुणीतरी येणार येणार गं...
14
सरकारच्या एक निर्णयाने अडचणीत आली ₹6,98,44,77,87,200 ची कंपनी; कोण आहेत ड्रीम-11 चे मालक हर्ष जैन? अंबानी कुटुंबाशी खास नातं!
15
एक मुलगा छातीवर बसला, दुसऱ्याने हात-पाय बांधले; रिटायर्ड DSP ना मारहाण; हिसकावलं ATM
16
चौथ्या स्टेजच्या कर्करोगाशी झुंजतेय अभिनेत्री तनिष्ठा चॅटर्जी, तिला सतावतेय ९ वर्षांच्या मुलीची चिंता
17
Prithvi Shaw : संघ बदलला अन् फार्मात आला! पृथ्वी शॉच्या भात्यातून आली आणखी एक कडक खेळी
18
Nikki Murder Case : हुंड्यासाठी निक्कीला जाळून मारलं; पती, सासूनंतर आता दीर आणि सासऱ्यालाही अटक
19
हरितालिका व्रत २०२५: ‘हे’ नियम अवश्य पाळावेत; व्रत पूजनानंतर म्हणावी हरितालिका आरती
20
१० वेळा बॉयफ्रेंडसोबत पळाली, आता विवाहित महिलेने ठेवला १५-१५ चा अजब फॉर्म्युला; ऐकून सगळेच हैराण

इंटर्नशिप करणाऱ्या डॉक्टरांना केवळ सहा हजारात बसवावा लागतो महिन्याचा खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2019 12:38 IST

डॉक्टरकीचे शिक्षण पूर्ण करून सक्तीची असलेली आंतरवासीता (इंटर्नशीप) करणाऱ्या विद्यार्थ्यांना केवळ २०० रुपये रोज विद्यावेतन दिले जाते.

ठळक मुद्देरोज केवळ २०० रुपये विद्यावेतन महाराष्ट्रात सर्वात कमी आरोग्य सेवेची चेष्टा, भोजन व निवासाचे वांधे

विलास गावंडे ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : डॉक्टरकीचे शिक्षण पूर्ण करून सक्तीची असलेली आंतरवासीता (इंटर्नशीप) करणाऱ्या विद्यार्थ्यांना केवळ २०० रुपये रोज विद्यावेतन दिले जाते. महिन्याकाठी मिळणाऱ्या सहा हजार रुपयात भोजन, घरभाडे आणि इतर खर्च भागविताना या डॉक्टरांना अवघड शस्त्रक्रिया करतानाचा अनुभव येतो. राज्यभरातील सुमारे पाच हजार डॉक्टरांचा हा प्रश्न अतिशय जटील झाला आहे. विशेष म्हणजे सर्वात कमी विद्यावेतन महाराष्ट्रात आहे. सरकारकडून या डॉक्टरांची चेष्टा केली जात आहे.एमबीबीएस, बीएएमएस, बी.डीएस., आदी वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना एक वर्षे इंटर्नशीप करावी लागते. प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालयात प्रत्येकी तीन महिने आणि आयुर्वेद किंवा वैद्यकीय महाविद्यालयात सहा महिने सेवा द्यावी लागते. दिवसभरात किमान सहा ते आठ तास ड्यूटी सक्तीची आहे. यासाठी विद्यार्थ्यांना दरमहा सहा हजार रुपये विद्यावेतन शासनाकडून दिले जाते. आंतरवासीता करत असलेले बहुतांश विद्यार्थी गरीब कुटुंबातील आहे. सहा हजार रुपयात भागत नाही. कौटुंबिक परिस्थिती जेमतेम असल्याने पालकही पैसा पुरवू शकत नाही.विशेष म्हणजे सर्वात कमी विद्यावेतन महाराष्ट्रात सहा हजार रुपये आहे. केरळ राज्यात सर्वाधिक २३ हजार रुपये विद्यावेतन या डॉक्टरांना मिळते. कोलकाता १९ हजार, ओडिशा व झारखंड १५ हजार, हरियाणा १२ हजार एवढे विद्यावेतन दिले जाते. महाराष्ट्र शासनाने ११ हजार रुपये विद्यावेतन द्यावे, अशी मागणी या विद्यार्थी डॉक्टरांनी लाऊन धरली. २०१५ मध्ये विद्यावेतनात सहा हजार रुपये झाले होते. यात वाढ करून ११ हजार रुपये विद्यावेतनाची मागणी विद्यार्थ्यांनी केली. सरकारने याची अंमलबजावणी केली नाही. आजच्या महागाईच्या काळात सहा हजार रुपयात भागवायचे कसे, हा विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे.वसतिगृह प्रवेश बंदआंतरवासीता डॉक्टरांचे शासकीय महाविद्यालयातील वसतिगृह प्रवेशही काही वर्षांपासून बंद झाले आहे. प्रामुख्याने आयुर्वेदाचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा हा प्रश्न अधिक गंभीर होत चालला आहे. शासनाचे आयुर्वेदाला प्राधान्य असले तरी, या विषयाचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांविषयी मोठी अनास्था असल्याचे स्पष्ट होते. दरम्यान, विद्यावेतनाचा प्रश्न शासनाकडे निवेदनाद्वारे मांडण्यात आला असल्याचे ‘निमा’ स्टुडन्ट नागपूर शाखेचे अध्यक्ष शुभम बोबडे यांनी सांगितले. शासन गंभीर नसल्याने वारंवार संपावर जाण्याची भूमिका घ्यावी लागत असल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र