शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

इंटर्नशिप करणाऱ्या डॉक्टरांना केवळ सहा हजारात बसवावा लागतो महिन्याचा खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2019 12:38 IST

डॉक्टरकीचे शिक्षण पूर्ण करून सक्तीची असलेली आंतरवासीता (इंटर्नशीप) करणाऱ्या विद्यार्थ्यांना केवळ २०० रुपये रोज विद्यावेतन दिले जाते.

ठळक मुद्देरोज केवळ २०० रुपये विद्यावेतन महाराष्ट्रात सर्वात कमी आरोग्य सेवेची चेष्टा, भोजन व निवासाचे वांधे

विलास गावंडे ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : डॉक्टरकीचे शिक्षण पूर्ण करून सक्तीची असलेली आंतरवासीता (इंटर्नशीप) करणाऱ्या विद्यार्थ्यांना केवळ २०० रुपये रोज विद्यावेतन दिले जाते. महिन्याकाठी मिळणाऱ्या सहा हजार रुपयात भोजन, घरभाडे आणि इतर खर्च भागविताना या डॉक्टरांना अवघड शस्त्रक्रिया करतानाचा अनुभव येतो. राज्यभरातील सुमारे पाच हजार डॉक्टरांचा हा प्रश्न अतिशय जटील झाला आहे. विशेष म्हणजे सर्वात कमी विद्यावेतन महाराष्ट्रात आहे. सरकारकडून या डॉक्टरांची चेष्टा केली जात आहे.एमबीबीएस, बीएएमएस, बी.डीएस., आदी वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना एक वर्षे इंटर्नशीप करावी लागते. प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालयात प्रत्येकी तीन महिने आणि आयुर्वेद किंवा वैद्यकीय महाविद्यालयात सहा महिने सेवा द्यावी लागते. दिवसभरात किमान सहा ते आठ तास ड्यूटी सक्तीची आहे. यासाठी विद्यार्थ्यांना दरमहा सहा हजार रुपये विद्यावेतन शासनाकडून दिले जाते. आंतरवासीता करत असलेले बहुतांश विद्यार्थी गरीब कुटुंबातील आहे. सहा हजार रुपयात भागत नाही. कौटुंबिक परिस्थिती जेमतेम असल्याने पालकही पैसा पुरवू शकत नाही.विशेष म्हणजे सर्वात कमी विद्यावेतन महाराष्ट्रात सहा हजार रुपये आहे. केरळ राज्यात सर्वाधिक २३ हजार रुपये विद्यावेतन या डॉक्टरांना मिळते. कोलकाता १९ हजार, ओडिशा व झारखंड १५ हजार, हरियाणा १२ हजार एवढे विद्यावेतन दिले जाते. महाराष्ट्र शासनाने ११ हजार रुपये विद्यावेतन द्यावे, अशी मागणी या विद्यार्थी डॉक्टरांनी लाऊन धरली. २०१५ मध्ये विद्यावेतनात सहा हजार रुपये झाले होते. यात वाढ करून ११ हजार रुपये विद्यावेतनाची मागणी विद्यार्थ्यांनी केली. सरकारने याची अंमलबजावणी केली नाही. आजच्या महागाईच्या काळात सहा हजार रुपयात भागवायचे कसे, हा विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे.वसतिगृह प्रवेश बंदआंतरवासीता डॉक्टरांचे शासकीय महाविद्यालयातील वसतिगृह प्रवेशही काही वर्षांपासून बंद झाले आहे. प्रामुख्याने आयुर्वेदाचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा हा प्रश्न अधिक गंभीर होत चालला आहे. शासनाचे आयुर्वेदाला प्राधान्य असले तरी, या विषयाचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांविषयी मोठी अनास्था असल्याचे स्पष्ट होते. दरम्यान, विद्यावेतनाचा प्रश्न शासनाकडे निवेदनाद्वारे मांडण्यात आला असल्याचे ‘निमा’ स्टुडन्ट नागपूर शाखेचे अध्यक्ष शुभम बोबडे यांनी सांगितले. शासन गंभीर नसल्याने वारंवार संपावर जाण्याची भूमिका घ्यावी लागत असल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र