शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

आंतरजिल्हा गुन्हेगार टोळीवर संशय

By admin | Updated: June 25, 2016 02:23 IST

शिवाजीनगर येथील पंकज नानवाणी यांच्याकडील घटनेत गुन्हेगारांच्या आंतरजिल्हा टोळीचा सहभाग असावा,

नानवाणीकडील दरोडा : एसपींची माहिती, सीसीटीव्ही फुटेजमध्येही ‘क्ल्यू’, तरुणाईवर ‘वॉच’ यवतमाळ : शिवाजीनगर येथील पंकज नानवाणी यांच्याकडील घटनेत गुन्हेगारांच्या आंतरजिल्हा टोळीचा सहभाग असावा, असा संशय असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांनी ‘लोकमत’ला दिली. एसपी सिंह म्हणाले, नानवाणी यांच्याकडील घटनेत सहभागी व्यक्तींचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यात काही ‘क्ल्यू’ मिळत आहेत. त्यातून या तपासात निश्चित प्रगती होईल. दारव्हा रोडवरील सतीश फाटक यांच्याकडील गुन्ह्यात आंतरजिल्हा टोळीचा सहभाग उघड झाला. नानवाणी यांच्याकडेही गुन्ह्याची हीच पद्धत होती. त्यामुळे या गुन्ह्यातही आंतरजिल्हा टोळीच असावी, असा संशय आहे. तरीही तपासाच्या दृष्टीने सर्व पैलूंवर भर दिला जात असल्याचे सिंह यांनी सांगितले. अखिलेशकुमार सिंह म्हणाले, तरुणाईच्या गरजा वाढल्या आहेत, परंतु त्या तुलनेत पैसा उपलब्ध होत नाही. सुशिक्षित तरुण आहेत, परंतु त्यांच्या हाताला काम नाही. रोजगार नसला तरी दैनंदिन गरजा भागविण्यासाठी पैसा हा लागतोच. या तरुणांची परिश्रम करून प्रामाणिकपणे पैसा मिळविण्याची तयारी नाही. मग ही तरुणाई गरजा पूर्ण करण्यासाठी सहज मिळणाऱ्या पैशांकडे वळते आहे. त्यातूनच गुन्हेगारी जगतात नव्या चेहऱ्यांनी पाय रोवले आहेत. हे नवे चेहरे अद्याप पोलिसांच्या रेकॉर्डवर आले नसले तरी त्यांना रेकॉर्डवर घेण्याचे काम सुरू झाले आहे. कुणाला वाटणार नाही अशी मुले गुन्हेगारी वर्तुळात सक्रिय आहे. त्यांचा लवकरच पर्दाफाश होणार आहे. पालकांनीही आपल्या मुलांबाबत व त्याच्या मित्र मंडळींबाबत सतर्क राहणे तेवढेच गरजेचे आहे. त्यांची ही सतर्कता मुलाला गुन्हेगारी विश्वात एन्ट्री करण्यापासून निश्चितच रोखू शकते. यवतमाळ पोलिसांचे डिटेक्शन वाढले आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून डिटेक्शन केले जात आहे. फाटक यांच्याकडील दरोडा, कळंबमधील चेनस्नॅचिंग, पुसदमध्ये जबरी चोरी, अनेक घरफोड्या उघडकीस आल्या आहेत. आणखी डिटेक्शनचे प्रमाण वाढविले जाईल. चार्ली पेट्रोलिंग, प्रतिबंधात्मक कारवाई व अन्य उपाययोजना केल्या जात आहे. पोलिसांचा अनेकांवर गुप्त वॉच आहे. (जिल्हा प्रतिनिधी) नागरिकांनो सावधान, क्राईम पॅटर्न बदलला, जागरुकता हाच उपाय जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांनी सांगितले की, वाढत्या वसाहती, वाढती लोकसंख्या, अत्याधुनिक साधन सामुग्री यामुळे त्यांच्या सुरक्षेसाठी असलेल्या पोलिसांच्या संख्येचा मेळ बसविणे कठीण आहे. त्यामुळे आता नागरिकांनी केवळ पोलिसांवर विसंबून न राहता स्वत: पूर्णवेळ सतर्क राहून स्वत:च्या जीविताची आणि मालमत्तेची सुरक्षा सांभाळणे गरजेचे आहे. पोलीस हे नागरिकांच्या सुरक्षेसाठी आहेतच. पण त्यांना बळ देण्यासाठी नागरिकांनीही संकटात पोलिसांच्या पाठीशी उभे राहणे, त्यांना सतर्क करणे, सहकार्य करणे तेवढेच गरजेचे आहे. नागरिकांच्या सहकार्याशिवाय पोलीस यशस्वी होऊ शकणार नाही. लोकांनी पोलिसांवर विश्वास ठेवावा, पोलीस तुमच्या सुरक्षेसाठीच आहेत, त्यांची भीती बाळगण्याची गरज नाही. अलिकडे अत्याधुनिक साधनांमुळे क्राईम पॅटर्न बदलला आहे. पूर्वी रात्रीला आणि बंद घरातच चोऱ्या व्हायच्या. परंतु आता दिवसाही चोरटे घरांना निशाणा बनवू लागले आहेत. कारण त्यांच्याकडे दळणवळणाची आधुनिक साधने उपलब्ध आहे. त्याद्वारे ते गुन्हा करून पोलिसांना खबर लागण्यापूर्वी दुसऱ्या जिल्ह्यात सहज पळून जाऊ शकतात. म्हणूनच दुपारच्या वेळी घरी राहणाऱ्या गृहिणींनी विशेष सतर्कता बाळगणे गरजेचे आहे. कुणी आपल्या घरावर वॉच ठेवतो का, याबाबत दक्ष राहणे आवश्यक आहे. घरात दुपारी कुणी नसेल अशा वेळी एकट्या असलेल्या महिला-मुलांनी मुख्य दार बंद ठेवणे, शक्य असल्यास फाटकाला कुलूप लावणे, अशी खबरदारी घ्यावी, असे अखिलेशकुमार सिंह यांनी सूचविले. नागरिकांनी दहशतीत राहण्याची, घाबरण्याची काही एक गरज नाही. पण दक्षता बाळगणे हे जागरुक नागरिकाचे कर्तव्य आहे. कुठेही काहीही धोकादायक वाटत असेल, चुकीचे होत असेल तर निर्भिडपणे पोलिसांशी संपर्क करण्याचे आवाहन अखिलेशकुमार सिंह यांनी जिल्हाभरातील नागरिकांना ‘लोकमत’च्या माध्यमातून केले आहे.