शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिद्ध होतील", ओबीसी समाजाला आवाहन करत काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं विधान
2
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
3
ऑनलाईन मागवलं विष, दह्यामध्ये टाकून पतीला दोनदा पाजलं; पत्नीचा कारनामा पोलिसांनी केला उघड
4
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
5
Shravan 2025: शिवमंदिरात भाविक तीनदा टाळ्या का वाजवतात? काय आहे मान्यता? वाचा!
6
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
7
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
8
अंगावर धावून गेली, चप्पल फेकून मारली अन्...; रुची गुज्जरची निर्मात्याला मारहाण, व्हिडीओ व्हायरल
9
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
10
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
11
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
12
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
13
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
14
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
15
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
16
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
17
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
18
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
19
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
20
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."

आंतरजिल्हा गुन्हेगार टोळीवर संशय

By admin | Updated: June 25, 2016 02:23 IST

शिवाजीनगर येथील पंकज नानवाणी यांच्याकडील घटनेत गुन्हेगारांच्या आंतरजिल्हा टोळीचा सहभाग असावा,

नानवाणीकडील दरोडा : एसपींची माहिती, सीसीटीव्ही फुटेजमध्येही ‘क्ल्यू’, तरुणाईवर ‘वॉच’ यवतमाळ : शिवाजीनगर येथील पंकज नानवाणी यांच्याकडील घटनेत गुन्हेगारांच्या आंतरजिल्हा टोळीचा सहभाग असावा, असा संशय असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांनी ‘लोकमत’ला दिली. एसपी सिंह म्हणाले, नानवाणी यांच्याकडील घटनेत सहभागी व्यक्तींचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यात काही ‘क्ल्यू’ मिळत आहेत. त्यातून या तपासात निश्चित प्रगती होईल. दारव्हा रोडवरील सतीश फाटक यांच्याकडील गुन्ह्यात आंतरजिल्हा टोळीचा सहभाग उघड झाला. नानवाणी यांच्याकडेही गुन्ह्याची हीच पद्धत होती. त्यामुळे या गुन्ह्यातही आंतरजिल्हा टोळीच असावी, असा संशय आहे. तरीही तपासाच्या दृष्टीने सर्व पैलूंवर भर दिला जात असल्याचे सिंह यांनी सांगितले. अखिलेशकुमार सिंह म्हणाले, तरुणाईच्या गरजा वाढल्या आहेत, परंतु त्या तुलनेत पैसा उपलब्ध होत नाही. सुशिक्षित तरुण आहेत, परंतु त्यांच्या हाताला काम नाही. रोजगार नसला तरी दैनंदिन गरजा भागविण्यासाठी पैसा हा लागतोच. या तरुणांची परिश्रम करून प्रामाणिकपणे पैसा मिळविण्याची तयारी नाही. मग ही तरुणाई गरजा पूर्ण करण्यासाठी सहज मिळणाऱ्या पैशांकडे वळते आहे. त्यातूनच गुन्हेगारी जगतात नव्या चेहऱ्यांनी पाय रोवले आहेत. हे नवे चेहरे अद्याप पोलिसांच्या रेकॉर्डवर आले नसले तरी त्यांना रेकॉर्डवर घेण्याचे काम सुरू झाले आहे. कुणाला वाटणार नाही अशी मुले गुन्हेगारी वर्तुळात सक्रिय आहे. त्यांचा लवकरच पर्दाफाश होणार आहे. पालकांनीही आपल्या मुलांबाबत व त्याच्या मित्र मंडळींबाबत सतर्क राहणे तेवढेच गरजेचे आहे. त्यांची ही सतर्कता मुलाला गुन्हेगारी विश्वात एन्ट्री करण्यापासून निश्चितच रोखू शकते. यवतमाळ पोलिसांचे डिटेक्शन वाढले आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून डिटेक्शन केले जात आहे. फाटक यांच्याकडील दरोडा, कळंबमधील चेनस्नॅचिंग, पुसदमध्ये जबरी चोरी, अनेक घरफोड्या उघडकीस आल्या आहेत. आणखी डिटेक्शनचे प्रमाण वाढविले जाईल. चार्ली पेट्रोलिंग, प्रतिबंधात्मक कारवाई व अन्य उपाययोजना केल्या जात आहे. पोलिसांचा अनेकांवर गुप्त वॉच आहे. (जिल्हा प्रतिनिधी) नागरिकांनो सावधान, क्राईम पॅटर्न बदलला, जागरुकता हाच उपाय जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांनी सांगितले की, वाढत्या वसाहती, वाढती लोकसंख्या, अत्याधुनिक साधन सामुग्री यामुळे त्यांच्या सुरक्षेसाठी असलेल्या पोलिसांच्या संख्येचा मेळ बसविणे कठीण आहे. त्यामुळे आता नागरिकांनी केवळ पोलिसांवर विसंबून न राहता स्वत: पूर्णवेळ सतर्क राहून स्वत:च्या जीविताची आणि मालमत्तेची सुरक्षा सांभाळणे गरजेचे आहे. पोलीस हे नागरिकांच्या सुरक्षेसाठी आहेतच. पण त्यांना बळ देण्यासाठी नागरिकांनीही संकटात पोलिसांच्या पाठीशी उभे राहणे, त्यांना सतर्क करणे, सहकार्य करणे तेवढेच गरजेचे आहे. नागरिकांच्या सहकार्याशिवाय पोलीस यशस्वी होऊ शकणार नाही. लोकांनी पोलिसांवर विश्वास ठेवावा, पोलीस तुमच्या सुरक्षेसाठीच आहेत, त्यांची भीती बाळगण्याची गरज नाही. अलिकडे अत्याधुनिक साधनांमुळे क्राईम पॅटर्न बदलला आहे. पूर्वी रात्रीला आणि बंद घरातच चोऱ्या व्हायच्या. परंतु आता दिवसाही चोरटे घरांना निशाणा बनवू लागले आहेत. कारण त्यांच्याकडे दळणवळणाची आधुनिक साधने उपलब्ध आहे. त्याद्वारे ते गुन्हा करून पोलिसांना खबर लागण्यापूर्वी दुसऱ्या जिल्ह्यात सहज पळून जाऊ शकतात. म्हणूनच दुपारच्या वेळी घरी राहणाऱ्या गृहिणींनी विशेष सतर्कता बाळगणे गरजेचे आहे. कुणी आपल्या घरावर वॉच ठेवतो का, याबाबत दक्ष राहणे आवश्यक आहे. घरात दुपारी कुणी नसेल अशा वेळी एकट्या असलेल्या महिला-मुलांनी मुख्य दार बंद ठेवणे, शक्य असल्यास फाटकाला कुलूप लावणे, अशी खबरदारी घ्यावी, असे अखिलेशकुमार सिंह यांनी सूचविले. नागरिकांनी दहशतीत राहण्याची, घाबरण्याची काही एक गरज नाही. पण दक्षता बाळगणे हे जागरुक नागरिकाचे कर्तव्य आहे. कुठेही काहीही धोकादायक वाटत असेल, चुकीचे होत असेल तर निर्भिडपणे पोलिसांशी संपर्क करण्याचे आवाहन अखिलेशकुमार सिंह यांनी जिल्हाभरातील नागरिकांना ‘लोकमत’च्या माध्यमातून केले आहे.