शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
4
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
5
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
6
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
7
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
8
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
9
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
10
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
11
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
12
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
13
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
14
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
15
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
16
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
17
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
18
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
19
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
20
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर

जिल्हा परिषदेत आंतरजातीय विवाह

By admin | Updated: March 9, 2017 00:12 IST

मोर्चेकऱ्यांचा आक्रोश, आंदोलकांच्या आरोळ्या, अधिकाऱ्यांचा आव, कर्मचारी संघटनांची अहमहमिका,

समुपदेशन केंद्र : वधूच्या आग्रहाखातर निवडला महिलादिनाचा मुहूर्त, भारतीय संविधानाची प्रत भेट यवतमाळ : मोर्चेकऱ्यांचा आक्रोश, आंदोलकांच्या आरोळ्या, अधिकाऱ्यांचा आव, कर्मचारी संघटनांची अहमहमिका, खास ‘शासकीय’ सुस्तीत सरकणाऱ्या फाईल... या सर्वांची साक्षीदार ठरलेली जिल्हा परिषदेची इमारत बुधवारी एका विवाह सोहळ्यासाठी मंगल कार्यालय बनली. जिल्ह्यातील नागरिकांचे प्रश्न सोडविणाऱ्या या ‘मिनी मंत्रालया’ने आज दोन हृदय जोडण्यासोबतच दोन जातीतील भिंतही तोडली. सावित्री आणि धनंजय हे दोन जातीतील प्रेमी जीव ‘महिलादिनी’ विवाहबद्ध झाले. जिल्हा परिषदेच्या इमारतीत असलेल्या सलोखा महिला समुपदेशन केंद्राने हा सोहळा अतिशय साध्या तरीही प्रागतिक पद्धतीने घडवून आणला. राष्ट्रसंतांचे विचार प्रसृत करणाऱ्या मानवता मंदिरात सकाळी विवाहाची औपचारिकता पार पाडून वधू-वरांना जिल्हा परिषद इमारतीत आणण्यात आले. समुपदेशन केंद्र आणि महिला व बालकल्याण विभागाच्या पुढील ‘कॉरिडॉर’मध्ये सोहळा घेण्यात आला. मॉ जिजाऊ आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांना हार अर्पण करून सोहळ्याची सुरुवात झाली. यावेळी आंतरजातीय विवाह करून सुखी जीवन जगणाऱ्या काही दाम्पत्यांनाही निमंत्रित करण्यात आले होते. सलोखा केंद्राचे संस्थापक देवानंद पवार यांनी उभयतांना लग्नाची भेट म्हणून भारतीय संविधानाची प्रत दिली. उपमुख्य कार्यकारी अधिकारी मरसाळे, माजी नगरसेविका माधुरी अराठे यांनी विचार मांडले. संचालन कवी हेमंत कांबळे यांनी केले. डॉ. विजय मून, अ‍ॅड. प्रदीप वानखडे, समुपदेशक शालिनी धारगावे, गजानन उल्हे, समाज कल्याण निरीक्षक अमित कापसे, महल्ले आदी उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी) आत्महत्येच्या विचाराकडून जगण्याच्या कृतीकडे... या लग्नातील वर धनंजय राजेंद्र वानखडे (२९) रा. शेंद्री बु. ता. दारव्हा हा शेती करतो. पण नापिकी आणि कर्जामुळे तो आत्महत्येच्या विचारापर्यंत पोहोचला होता. त्यामुळेच आपली प्रेयसी सावित्री लक्ष्मण ढोके (२८) रा. महागाव कसबा ता. दारव्हा हिच्यासोबत लग्न करण्यासाठी त्याचे मन मानत नव्हते. जगणेच कठीण असताना संसार कसा मांडवा हा त्याच्यापुढे प्रश्न होता. याच निराशेतून त्याने काही महिन्यांपूर्वी चक्क जिल्हाधिकारी कार्यालयापुढे विषही प्राषण केले होते. सुदैवाने त्यातून तो बचावला. सावित्रीने ही त्याची काहाणी सलोखा समुपदेशन केंद्रात सांगितल्यावर दोघांचेही समुपदेशन करून त्यांचे लग्न लावून देण्यात आले. धनंजय एमए असून सावित्री एमए, बीएडपर्यंत शिकली आहे. दोघेही सामाजिक कामात सक्रिय असतात. सावित्रीने ‘हागणदारीमुक्ती’वर निर्माण झालेल्या लघुपटात मुख्य भूमिका बजावली आहे.