शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
3
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
4
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
5
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
6
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
7
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
8
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
9
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
10
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
11
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
12
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
13
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
14
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
15
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
16
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
17
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
18
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
19
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले

जिल्हा परिषदेत आंतरजातीय विवाह

By admin | Updated: March 9, 2017 00:12 IST

मोर्चेकऱ्यांचा आक्रोश, आंदोलकांच्या आरोळ्या, अधिकाऱ्यांचा आव, कर्मचारी संघटनांची अहमहमिका,

समुपदेशन केंद्र : वधूच्या आग्रहाखातर निवडला महिलादिनाचा मुहूर्त, भारतीय संविधानाची प्रत भेट यवतमाळ : मोर्चेकऱ्यांचा आक्रोश, आंदोलकांच्या आरोळ्या, अधिकाऱ्यांचा आव, कर्मचारी संघटनांची अहमहमिका, खास ‘शासकीय’ सुस्तीत सरकणाऱ्या फाईल... या सर्वांची साक्षीदार ठरलेली जिल्हा परिषदेची इमारत बुधवारी एका विवाह सोहळ्यासाठी मंगल कार्यालय बनली. जिल्ह्यातील नागरिकांचे प्रश्न सोडविणाऱ्या या ‘मिनी मंत्रालया’ने आज दोन हृदय जोडण्यासोबतच दोन जातीतील भिंतही तोडली. सावित्री आणि धनंजय हे दोन जातीतील प्रेमी जीव ‘महिलादिनी’ विवाहबद्ध झाले. जिल्हा परिषदेच्या इमारतीत असलेल्या सलोखा महिला समुपदेशन केंद्राने हा सोहळा अतिशय साध्या तरीही प्रागतिक पद्धतीने घडवून आणला. राष्ट्रसंतांचे विचार प्रसृत करणाऱ्या मानवता मंदिरात सकाळी विवाहाची औपचारिकता पार पाडून वधू-वरांना जिल्हा परिषद इमारतीत आणण्यात आले. समुपदेशन केंद्र आणि महिला व बालकल्याण विभागाच्या पुढील ‘कॉरिडॉर’मध्ये सोहळा घेण्यात आला. मॉ जिजाऊ आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांना हार अर्पण करून सोहळ्याची सुरुवात झाली. यावेळी आंतरजातीय विवाह करून सुखी जीवन जगणाऱ्या काही दाम्पत्यांनाही निमंत्रित करण्यात आले होते. सलोखा केंद्राचे संस्थापक देवानंद पवार यांनी उभयतांना लग्नाची भेट म्हणून भारतीय संविधानाची प्रत दिली. उपमुख्य कार्यकारी अधिकारी मरसाळे, माजी नगरसेविका माधुरी अराठे यांनी विचार मांडले. संचालन कवी हेमंत कांबळे यांनी केले. डॉ. विजय मून, अ‍ॅड. प्रदीप वानखडे, समुपदेशक शालिनी धारगावे, गजानन उल्हे, समाज कल्याण निरीक्षक अमित कापसे, महल्ले आदी उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी) आत्महत्येच्या विचाराकडून जगण्याच्या कृतीकडे... या लग्नातील वर धनंजय राजेंद्र वानखडे (२९) रा. शेंद्री बु. ता. दारव्हा हा शेती करतो. पण नापिकी आणि कर्जामुळे तो आत्महत्येच्या विचारापर्यंत पोहोचला होता. त्यामुळेच आपली प्रेयसी सावित्री लक्ष्मण ढोके (२८) रा. महागाव कसबा ता. दारव्हा हिच्यासोबत लग्न करण्यासाठी त्याचे मन मानत नव्हते. जगणेच कठीण असताना संसार कसा मांडवा हा त्याच्यापुढे प्रश्न होता. याच निराशेतून त्याने काही महिन्यांपूर्वी चक्क जिल्हाधिकारी कार्यालयापुढे विषही प्राषण केले होते. सुदैवाने त्यातून तो बचावला. सावित्रीने ही त्याची काहाणी सलोखा समुपदेशन केंद्रात सांगितल्यावर दोघांचेही समुपदेशन करून त्यांचे लग्न लावून देण्यात आले. धनंजय एमए असून सावित्री एमए, बीएडपर्यंत शिकली आहे. दोघेही सामाजिक कामात सक्रिय असतात. सावित्रीने ‘हागणदारीमुक्ती’वर निर्माण झालेल्या लघुपटात मुख्य भूमिका बजावली आहे.