शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
2
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
3
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
4
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
5
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
6
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
7
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
8
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
9
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला
10
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
11
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...
12
डोनाल्ड ट्रम्प म्हणतात 'मी युद्ध थांबवलं'; इस्राइलनं गाझामध्ये ६० हजार सैनिकांना पाठवलं! काय आहे नवा प्लॅन?
13
6 एअरबॅग्ज, 35 Km मायलेज अन् ADAS सह लवकरच येतेय ही ढासू कॉम्पॅक्ट SUV; आणखी कोण कोणत्या कार होतायेत लॉन्च? बघा लिस्ट
14
३ वर्षांच्या एफडीत २ लाखांची गुंतवणूक केल्यास कोणत्या बँकेत मिळेल सर्वाधिक रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
15
१० दिवस लक्ष्मी नारायण योग: ८ राशींचे मंगल-कल्याण, दुपटीने चौफेर लाभ; हाती पैसा, चांगले होईल!
16
Realme: ७०००mAh बॅटरीसह रिअलमीचे दोन धमाकेदार फोन भारतात लॉन्च!
17
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
18
TCS ३०,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार? आयटी कर्मचारी संघटनेच्या दाव्याने खळबळ
19
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
20
आपण सगळेच Bisexual! हे काय बोलली स्वरा भास्कर? म्हणते- "मला डिंपल यादव आवडतात..."

वाढत्या पातळीने रोखली तीव्रता

By admin | Updated: July 7, 2014 00:07 IST

जिल्ह्यात यावर्षी पावसाळा लांबला असला तरी, भूजल पातळी मात्र कायम आहे. परिणामी अतिरिक्त उपाययोजनांचा कृती आराखडा तयार करण्याची गरज प्रशासनाला भासणार नसल्याचे भूजल

भूजल दीड मीटरने वाढले : अतिरिक्त उपाययोजना टळल्या यवतमाळ : जिल्ह्यात यावर्षी पावसाळा लांबला असला तरी, भूजल पातळी मात्र कायम आहे. परिणामी अतिरिक्त उपाययोजनांचा कृती आराखडा तयार करण्याची गरज प्रशासनाला भासणार नसल्याचे भूजल सर्वेक्षण विभागाने स्पष्ट केले. मागील पाच वर्षांच्या तुलनेत भूजल पातळी तब्बल दीड मीटरने वाढल्याचे विभागाने सांगितले.गतवर्षी जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या ११० टक्के पाऊस झाला. यावर्षी जून महिना संपाला तरी, जिल्ह्यात पावसाचा पत्ता नाही. परिणामी जिल्ह्यातील पाणीटंचाई तीव्र होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. अशा स्थितीत भूजल सर्वेक्षण विभागाने सादर केलेला अहवाल महत्त्वपूर्ण मानला जात आहे. भूजल सर्वेक्षण विभागाच्या १८१ विहिरींच्या नोंदीवरून हा अहवाल सादर करण्यात आला आहे. यानुसार २००९ च्या तुलनेत २०१४ मध्ये उपलब्ध पाणीसाठी १.४६ मीटरने वाढला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश गावांमध्ये पाणीटंचाईची तीव्रता राहणार नाही. त्यामुळे जिल्हा परिषदेने पाणीटंचाईचा आराखडा अद्याप सादर केला नाही. परिणामी पाणीटंचाईचा सामना करणारी गावे संकटात सापडली आहे. भूजल सर्वेक्षण विभागाच्या अहवालानुसार जिल्ह्याची भूजल पातळी १.४६ मीटरने अधिक आहे. आर्णी १.४१, बाभूळगाव १.५६, दारव्हा २.२३, दिग्रस १.५४, घाटंजी १.०३, कळंब २.०१, महागाव १.७५, मारेगाव ०.६९, नेर २.५, पांढरकवडा १.७५, पुसद १.७५, राळेगाव १.१२, उमरखेड १.८१, वणी ०.०९, यवतमाळ १.५३ आणि झरी ०.६५ मीटरने भूजल पातळी वाढली आहे. एकंदरीत जिल्ह्यातील भूजल पातळी वाढली असली तरी, काही भागात जमिनीचा पोत पाणी टिकवून ठेवणारा नसल्याने पाणीटंचाई निर्माण झाल्याचे भूजल सर्वेक्षण विभागाचे वरिष्ठ भूवैज्ञानिक वालदे यांनी सांगितले. (शहर वार्ताहर)