शहरं
Join us  
Trending Stories
1
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
2
पवईतील आरोपी रोहित आर्यला दीपक केसरकरांनी इतकी मोठी रक्कम का दिली?; सामाजिक कार्यकर्त्यांचा सवाल
3
बाजारात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटी बुडाले; सर्वात जास्त कुठे?
4
Rain Alert: कमी दाबाचे क्षेत्र कायम, या राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; महाराष्ट्रात कुठे-कुठे पाऊस पडणार?
5
शेतकऱ्यांना न झुलवता तात्काळ कर्जमाफी करा; उद्धव ठाकरेंची राज्य सरकारकडे मागणी
6
धोनीची गुंतवणूक असलेली कंपनी बाजारात! ६ नोव्हेंबरला उघडणार IPO; प्राइस बँडसह तपशील जाणून घ्या
7
खात्यात ८ लाख जमा केले अन् प्राप्तिकर विभागाची 'टॅक्स' नोटीस; ६ वर्षांच्या लढ्यानंतर करदात्याचा विजय!
8
Viral Video: हत्तीला पाहून सिंह मंडळींची 'हवा टाइट'... झाडाखाली बसले असताना काय घडलं, पाहा
9
थेट मंत्र्यांच्या ताफ्यालाच पाठलाग करून अडवले, वादावादी, कारची तोडफोड करण्याचा प्रयत्न, कारण काय?
10
Powai Hostage: रोहित आर्या प्रकरणातील नवी माहिती, मुलांसोबत ऑडिशनसाठी गेलेले पालक म्हणाले...
11
Abhishek Sharma Record Breaking Fifty : जिथं सगळ्यांनी नांगी टाकली, तिथं अभिषेक शर्माची विक्रमी खेळी
12
Rohit Arya: रोहित आर्याला मी वेगळे पैसे दिलेले, सरकारी बिलाशी संबंध नाही; दीपक केसरकरांची सारवासारव
13
प्रेयसीचा शो पाहण्यासाठी ५०० कोटी रुपयांचे सरकारी विमान वापरलं; काश पटेल वादाच्या भोवऱ्यात
14
कंडोम बनवणाऱ्या कंपनीचा शेअर करतोय मालामाल, खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या; 2 महिन्यातच दिला बंपर परतावा!
15
तेलंगणामध्ये मोंथा वादळाचा कहर, १२ जणांचा मृत्यू; मुसळधार पावसामुळे रेल्वे ट्रॅकवर पाणी, रस्तेही बंद
16
कोणता झेंडा घेऊ हाती अशी मनसैनिकांची अवस्था, राज ठाकरे कन्फ्यूज नेते; शिंदेसेनेची बोचरी टीका
17
Lenskart IPO: महागडा आहे का लेन्सकार्टचा आयपीओ? व्हॅल्यूएशनवरुन उपस्थित होताहेत प्रश्न, एक्सपर्ट म्हणाले...
18
अँड्रॉइड की अ‍ॅपल, मोबाईल घोटाळे रोखण्यात कोणती सिस्टीम चांगली? गुगलने केला धक्कादायक खुलासा
19
टीम इंडिया फायनलमध्ये पोहोचताच आयसीसीने धमाका करून टाकला! ऑस्ट्रेलिया संघ बघतच राहिला...
20
सौदी अरेबिया फिफा विश्वचषकासाठी बांधणार 'स्काय स्टेडियम'; व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा?

वाढत्या पातळीने रोखली तीव्रता

By admin | Updated: July 7, 2014 00:07 IST

जिल्ह्यात यावर्षी पावसाळा लांबला असला तरी, भूजल पातळी मात्र कायम आहे. परिणामी अतिरिक्त उपाययोजनांचा कृती आराखडा तयार करण्याची गरज प्रशासनाला भासणार नसल्याचे भूजल

भूजल दीड मीटरने वाढले : अतिरिक्त उपाययोजना टळल्या यवतमाळ : जिल्ह्यात यावर्षी पावसाळा लांबला असला तरी, भूजल पातळी मात्र कायम आहे. परिणामी अतिरिक्त उपाययोजनांचा कृती आराखडा तयार करण्याची गरज प्रशासनाला भासणार नसल्याचे भूजल सर्वेक्षण विभागाने स्पष्ट केले. मागील पाच वर्षांच्या तुलनेत भूजल पातळी तब्बल दीड मीटरने वाढल्याचे विभागाने सांगितले.गतवर्षी जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या ११० टक्के पाऊस झाला. यावर्षी जून महिना संपाला तरी, जिल्ह्यात पावसाचा पत्ता नाही. परिणामी जिल्ह्यातील पाणीटंचाई तीव्र होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. अशा स्थितीत भूजल सर्वेक्षण विभागाने सादर केलेला अहवाल महत्त्वपूर्ण मानला जात आहे. भूजल सर्वेक्षण विभागाच्या १८१ विहिरींच्या नोंदीवरून हा अहवाल सादर करण्यात आला आहे. यानुसार २००९ च्या तुलनेत २०१४ मध्ये उपलब्ध पाणीसाठी १.४६ मीटरने वाढला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश गावांमध्ये पाणीटंचाईची तीव्रता राहणार नाही. त्यामुळे जिल्हा परिषदेने पाणीटंचाईचा आराखडा अद्याप सादर केला नाही. परिणामी पाणीटंचाईचा सामना करणारी गावे संकटात सापडली आहे. भूजल सर्वेक्षण विभागाच्या अहवालानुसार जिल्ह्याची भूजल पातळी १.४६ मीटरने अधिक आहे. आर्णी १.४१, बाभूळगाव १.५६, दारव्हा २.२३, दिग्रस १.५४, घाटंजी १.०३, कळंब २.०१, महागाव १.७५, मारेगाव ०.६९, नेर २.५, पांढरकवडा १.७५, पुसद १.७५, राळेगाव १.१२, उमरखेड १.८१, वणी ०.०९, यवतमाळ १.५३ आणि झरी ०.६५ मीटरने भूजल पातळी वाढली आहे. एकंदरीत जिल्ह्यातील भूजल पातळी वाढली असली तरी, काही भागात जमिनीचा पोत पाणी टिकवून ठेवणारा नसल्याने पाणीटंचाई निर्माण झाल्याचे भूजल सर्वेक्षण विभागाचे वरिष्ठ भूवैज्ञानिक वालदे यांनी सांगितले. (शहर वार्ताहर)