शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

वाढत्या पातळीने रोखली तीव्रता

By admin | Updated: July 7, 2014 00:07 IST

जिल्ह्यात यावर्षी पावसाळा लांबला असला तरी, भूजल पातळी मात्र कायम आहे. परिणामी अतिरिक्त उपाययोजनांचा कृती आराखडा तयार करण्याची गरज प्रशासनाला भासणार नसल्याचे भूजल

भूजल दीड मीटरने वाढले : अतिरिक्त उपाययोजना टळल्या यवतमाळ : जिल्ह्यात यावर्षी पावसाळा लांबला असला तरी, भूजल पातळी मात्र कायम आहे. परिणामी अतिरिक्त उपाययोजनांचा कृती आराखडा तयार करण्याची गरज प्रशासनाला भासणार नसल्याचे भूजल सर्वेक्षण विभागाने स्पष्ट केले. मागील पाच वर्षांच्या तुलनेत भूजल पातळी तब्बल दीड मीटरने वाढल्याचे विभागाने सांगितले.गतवर्षी जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या ११० टक्के पाऊस झाला. यावर्षी जून महिना संपाला तरी, जिल्ह्यात पावसाचा पत्ता नाही. परिणामी जिल्ह्यातील पाणीटंचाई तीव्र होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. अशा स्थितीत भूजल सर्वेक्षण विभागाने सादर केलेला अहवाल महत्त्वपूर्ण मानला जात आहे. भूजल सर्वेक्षण विभागाच्या १८१ विहिरींच्या नोंदीवरून हा अहवाल सादर करण्यात आला आहे. यानुसार २००९ च्या तुलनेत २०१४ मध्ये उपलब्ध पाणीसाठी १.४६ मीटरने वाढला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश गावांमध्ये पाणीटंचाईची तीव्रता राहणार नाही. त्यामुळे जिल्हा परिषदेने पाणीटंचाईचा आराखडा अद्याप सादर केला नाही. परिणामी पाणीटंचाईचा सामना करणारी गावे संकटात सापडली आहे. भूजल सर्वेक्षण विभागाच्या अहवालानुसार जिल्ह्याची भूजल पातळी १.४६ मीटरने अधिक आहे. आर्णी १.४१, बाभूळगाव १.५६, दारव्हा २.२३, दिग्रस १.५४, घाटंजी १.०३, कळंब २.०१, महागाव १.७५, मारेगाव ०.६९, नेर २.५, पांढरकवडा १.७५, पुसद १.७५, राळेगाव १.१२, उमरखेड १.८१, वणी ०.०९, यवतमाळ १.५३ आणि झरी ०.६५ मीटरने भूजल पातळी वाढली आहे. एकंदरीत जिल्ह्यातील भूजल पातळी वाढली असली तरी, काही भागात जमिनीचा पोत पाणी टिकवून ठेवणारा नसल्याने पाणीटंचाई निर्माण झाल्याचे भूजल सर्वेक्षण विभागाचे वरिष्ठ भूवैज्ञानिक वालदे यांनी सांगितले. (शहर वार्ताहर)