शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

३६ लाख हेक्टरवरील पिकांचे विमा कवच रामभरोसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2019 15:22 IST

पीक नुकसान भरून काढण्यासाठी शेतकरी पंतप्रधान विमा योजनेत सहभागी होतात. मात्र, यंदा पाऊस नसल्याने ३६ लाख हेक्टरवरील पेरण्या थांबलेल्या आहेत.

ठळक मुद्देपेरणीपूर्वीच योजनेची मुदत संपणार पाऊस न बरसलेल्या २४ जिल्ह्यातील नापेर क्षेत्राने नाव पेच

रूपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : पीक नुकसान भरून काढण्यासाठी शेतकरी पंतप्रधान विमा योजनेत सहभागी होतात. मात्र, यंदा पाऊस नसल्याने ३६ लाख हेक्टरवरील पेरण्या थांबलेल्या आहेत. तर दुसरीकडे पीक विमा काढण्याची वाढीव अंतिम मुदत केवळ चार दिवसांवर येऊन ठेपली आहे. पेरणी झालेल्या शेतकऱ्यांनाच हा विमा काढता येतो. त्यामुळे यंदा ३६ लाख हेक्टरवरील पीक विम्याच्या संरक्षणाबाहेर राहणार आहे.आपले सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबिरपणे उभे असल्याचा दावा पंतप्रधानांनी केला आहे. हा दावा किती पोकळ आहे, याचा प्रत्यय पीक विमा उतरविताना येत आहे. नैसर्गिक संकटामुळे संपूर्ण राज्य होरपळत आहे. पाऊस नसल्याने राज्यातील २४ टक्के पेरण्या अजूनही शेतकऱ्यांना करता आल्या नाही. यामुळे हे शेतकरी मोठ्या आशेने पंतप्रधान पीक विमा योजनेकडे पाहत आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी पिकांची पेरणी होणे बंधनकारक आहे.आता निसर्गच रूसला, तर पेरणी करायची कशी असा प्रश्न पूर्व विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांना पडला आहे. या स्थितीत शेतकऱ्यांना पंतप्रधान पीक विमा योजनेची गरज असताना मुदत संपत असल्याने त्यांना मदतीला मुकावे लागणार आहे.राज्यातील २४ जिल्ह्यामध्ये पीक विमा योजनेत सहभागी होण्याची मुदत पेरणीपूर्वीच संपत आहे. यामुळे ३६ लाख हेक्टरवरील शेतकऱ्यांना या योजनेत सहभागच नोंदविता येणार नाही. अशा शेतकऱ्यांच्या पिकांचे संरक्षण होणे आणि मदत मिळणे गरजेचे आहे. यासाठी धोरणात्मक निर्णयाची गरज आहे. राज्यातील एक कोटी ४९ लाख हेक्टर क्षेत्रापैकी एक कोटी १५ लाख हेक्टरवरच्या पेरण्या आटोपल्या आहेत. तर ३६ लाख हेक्टरवरच्या पेरण्या अजूनही थांबलेल्या आहेत.विमा कंपन्यांची चलाखीनिसर्ग कोपल्याने ज्या भागात पेरण्या झाल्या नाही, अशा ठिकाणी उंबरठा उत्पन्न शून्य येणार आहे. कारण पीक करपल्याने या क्षेत्रात शेतकऱ्यांच्या हातात काहीच पडणार नाही. यामुळे उत्पन्न निरंक राहण्याचा धोका आहे. हे उत्पन्न सरासरी उत्पन्नाच्या कमी असणार आहे. याचा फायदा शेतकऱ्यांना होईल. यामुळे कंपन्यानी तत्पूर्वीच विम्याची मुदत गुंडाळण्याची तयारी सुरू केली आहे.

टॅग्स :agricultureशेती