शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Best Bus Accident: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसनं प्रवाशांना चिरडलं; ४ जण ठार, ९ जखमी
2
Nashik: नाशिकमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र लढणार; भाजपचं काय?
3
TMC: ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल; शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार!
4
शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की...;  एबी फॉर्मवरून काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये राडा!
5
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
6
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
7
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
8
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
9
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
10
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
11
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
12
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
13
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
14
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
15
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
16
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
17
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
18
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
19
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
20
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

३६ लाख हेक्टरवरील पिकांचे विमा कवच रामभरोसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2019 15:22 IST

पीक नुकसान भरून काढण्यासाठी शेतकरी पंतप्रधान विमा योजनेत सहभागी होतात. मात्र, यंदा पाऊस नसल्याने ३६ लाख हेक्टरवरील पेरण्या थांबलेल्या आहेत.

ठळक मुद्देपेरणीपूर्वीच योजनेची मुदत संपणार पाऊस न बरसलेल्या २४ जिल्ह्यातील नापेर क्षेत्राने नाव पेच

रूपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : पीक नुकसान भरून काढण्यासाठी शेतकरी पंतप्रधान विमा योजनेत सहभागी होतात. मात्र, यंदा पाऊस नसल्याने ३६ लाख हेक्टरवरील पेरण्या थांबलेल्या आहेत. तर दुसरीकडे पीक विमा काढण्याची वाढीव अंतिम मुदत केवळ चार दिवसांवर येऊन ठेपली आहे. पेरणी झालेल्या शेतकऱ्यांनाच हा विमा काढता येतो. त्यामुळे यंदा ३६ लाख हेक्टरवरील पीक विम्याच्या संरक्षणाबाहेर राहणार आहे.आपले सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबिरपणे उभे असल्याचा दावा पंतप्रधानांनी केला आहे. हा दावा किती पोकळ आहे, याचा प्रत्यय पीक विमा उतरविताना येत आहे. नैसर्गिक संकटामुळे संपूर्ण राज्य होरपळत आहे. पाऊस नसल्याने राज्यातील २४ टक्के पेरण्या अजूनही शेतकऱ्यांना करता आल्या नाही. यामुळे हे शेतकरी मोठ्या आशेने पंतप्रधान पीक विमा योजनेकडे पाहत आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी पिकांची पेरणी होणे बंधनकारक आहे.आता निसर्गच रूसला, तर पेरणी करायची कशी असा प्रश्न पूर्व विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांना पडला आहे. या स्थितीत शेतकऱ्यांना पंतप्रधान पीक विमा योजनेची गरज असताना मुदत संपत असल्याने त्यांना मदतीला मुकावे लागणार आहे.राज्यातील २४ जिल्ह्यामध्ये पीक विमा योजनेत सहभागी होण्याची मुदत पेरणीपूर्वीच संपत आहे. यामुळे ३६ लाख हेक्टरवरील शेतकऱ्यांना या योजनेत सहभागच नोंदविता येणार नाही. अशा शेतकऱ्यांच्या पिकांचे संरक्षण होणे आणि मदत मिळणे गरजेचे आहे. यासाठी धोरणात्मक निर्णयाची गरज आहे. राज्यातील एक कोटी ४९ लाख हेक्टर क्षेत्रापैकी एक कोटी १५ लाख हेक्टरवरच्या पेरण्या आटोपल्या आहेत. तर ३६ लाख हेक्टरवरच्या पेरण्या अजूनही थांबलेल्या आहेत.विमा कंपन्यांची चलाखीनिसर्ग कोपल्याने ज्या भागात पेरण्या झाल्या नाही, अशा ठिकाणी उंबरठा उत्पन्न शून्य येणार आहे. कारण पीक करपल्याने या क्षेत्रात शेतकऱ्यांच्या हातात काहीच पडणार नाही. यामुळे उत्पन्न निरंक राहण्याचा धोका आहे. हे उत्पन्न सरासरी उत्पन्नाच्या कमी असणार आहे. याचा फायदा शेतकऱ्यांना होईल. यामुळे कंपन्यानी तत्पूर्वीच विम्याची मुदत गुंडाळण्याची तयारी सुरू केली आहे.

टॅग्स :agricultureशेती