शहरं
Join us  
Trending Stories
1
हनिमूनसाठी नाही तर कायमचे संपवायला घेऊन गेली होती सोनम; पतीच्या हत्येप्रकरणी अखेर अटक
2
"भ्रष्टाचार संपवायचा असेल, तर 500 रुपयांची नोट बंद केली पाहिजे"; मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे विधान चर्चेत
3
मान्सून एक्स्प्रेसला ‘बॅड पॅच’; १३ जूनपासून पुन्हा धो-धो..., शेतकरी सक्रिय मोसमी पावसाच्या प्रतीक्षेत
4
"मंदिरापासून ते स्मशानभूमीपर्यंत सगळ्यांना समान अधिकार हवा"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे विधान
5
"या प्रकरणानंतर मला काम मिळणं बंद होईल.."; 'पारु' मालिकेतील अभिनेत्याच्या व्हिडीओची चर्चा, काय म्हणाला?
6
"PM मोदी युद्ध थांबवण्यात यशस्वी, जर ते लांबले असतं तर नुकसान झालं असतं"; चंद्राबाबू नायडूंनी केलं कौतुक
7
आजचे राशीभविष्य : ०९ जून २०२५; आजचा दिवस व्यावसायिकांसाठी लाभदायी, नोकरीत बढती संभवते
8
...तर गुप्ता, सुपेकरांची चौकशी होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
अमेरिकेतील हॉलीवूडचे शहर पेटले; पोलिसांवर फेकले दगड अन् फटाके, अवैध प्रवाशांविरुद्धच्या मोहिमेला प्रचंड विरोध
10
मोबाइल, लॅपटॉपमधून येणाऱ्या प्रकाशामुळेही तुम्हाला होऊ शकतो कॅन्सर; डॉक्टर म्हणतात, मोबाइल पाहणे थांबवाच
11
लाचखोर उपजिल्हाधिकारी, डीवायएसपी, तहसीलदार यांना अभय कोणाचे?; ३६६ प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत
12
पारंपरिक पदवी अभ्यासक्रमांमध्ये ५० टक्के कौशल्याधारित शिक्षण, युजीसीकडून लवकरच मार्गदर्शक सूचना; विद्यार्थ्यांच्या रोजगार क्षमतेत होणार वाढ
13
यूपीपाठोपाठ दिल्लीत एन्काउंटरमध्ये वाढ, जूनच्या पहिल्या पाच दिवसांत पाच एन्काउंटर
14
नेपाळच्या ७ हजार लोकांना अमेरिका सोडावी लागणार, अमेरिकेने विशेष देशाचा दर्जा काढून घेतला
15
अंध वकिलाकडून सुप्रीम कोर्टात प्रथमच युक्तिवाद, भारतीय न्यायव्यवस्थेत ऐतिहासिक क्षण
16
जळक्या नोटा : न्या. वर्मांपुढे आता राजीनाम्याचाच पर्याय
17
मणिपूर पेटले, निदर्शकांनी अंगावर घेतले पेट्रोल ओतून
18
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
19
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
20
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  

‘मिशन चक्रवती’ची केंद्रीय पथकाकडून पाहणी

By admin | Updated: June 4, 2016 02:10 IST

लोकसहभागातून होत असलेल्या ‘मिशन चक्रवती’च्या कामाची पाहणी शुक्रवारी केंद्रीय पथकाने केली. प्रत्यक्ष पाहणी करून झालेल्या

लोकसहभागाचे कौतुक : चापर्डा गावातील प्रश्न जाणले, नागरिकांनी मांडल्या पथकाकडे विविध समस्याकळंब : लोकसहभागातून होत असलेल्या ‘मिशन चक्रवती’च्या कामाची पाहणी शुक्रवारी केंद्रीय पथकाने केली. प्रत्यक्ष पाहणी करून झालेल्या आणि होणाऱ्या कामाची माहिती घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन या कामाची माहिती देण्यात येईल, असा विश्वासही या पथकाने दिला.दिल्ली येथील नीती आयोगाचे सदस्य तथा पथक प्रमुख रामानंद, ग्रामीण विकास विभागाचे अव्वर सचिव राम वर्मा, केंद्रीय विद्युत प्राधिकरणचे सचिव जे.के. राठोड, जलसंधारण विभागाचे उपसंचालक मिलिंद पानपाटील, भारतीय खाद्य निगमचे सहायक प्रबंधक एम.एम. बोऱ्हाडे, मदत व पुनर्वसन उपसचिव आत्राम यांच्यासह वरिष्ठ मंडळी यावेळी उपस्थित होती. उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार ंयांनी लोकसहभागातून केलेल्या या कामाची माहिती पथकाला दिली. चक्रवती नदीचे पात्र अरुंद व उथळ असल्याने पाणी साचत नव्हते. भीषण पाणीटंचाईचा सामना नागरिकांना करावा लागायचा. आता नदी खोल करण्यात आली, पात्र रुंद करण्यात आले. ठिकठिकाणी भूमिगत बंधारे निर्माण करून पाणी साठवण क्षमता वाढविण्यात आली. येणाऱ्या काही वर्षात कळंब शहराला पाणीटंचाईचा सामना करावा लागणार नाही, अशी माहिती यावेळी देण्यात आली. पथक प्रमुख रामानंद यांनी हा विषय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कानावर टाकण्यात येणार असल्याचे सांगितले. पथकाची चापर्डा गावाला भेटकेंद्रीय पथकाने शुक्रवारी चापर्डा गावला भेट दिली. सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि गावकऱ्यांशी चर्चा करुन त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. कोणती पिके घेतली जातात, पीक होते की नाही, शेतीमध्ये लावलेला पैसा निघतो की नाही याची माहिती पथकाने घेतली. नागरिकांनी आपले प्रश्न मांडले. यावेळी उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रेय गायकवाड, तहसीलदार संजय होटे, गटविकास अधिकारी डॉ.मनोहर नाल्हे, सहायक गटविकास अधिकारी पद्माकर मडावी, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे उपअभियंता मनोहर शहारे, तालुका कृषी अधिकारी के.बी. आठवले, पशुधन विकास अधिकारी रवींद्र मांडेकर, कृषी अधिकारी किशोर अंबरकर, पंकज बरडे आदी उपस्थित होते. कामठवाडा गावलाही पथकाची भेट नियोजित होती. गावकरी सकाळपासूनच वाट पाहात होते. ऐनवेळी पथकाने उशीर झाल्याचे कारण देत कामठवाडा गावला जाण्याचे टाळले. त्यामुळे तेथील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. (तालुका प्रतिनिधी)