शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान यांच्यात पुन्हा युद्धाचे सावट?; पाक संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांची पोकळ धमकी
2
धक्कादायक! राजस्थानमध्ये प्राणघातक गोळ्या! नमुने फेल झाले होते तरीही हजारो गोळ्या विकल्या
3
टाटा कॅपिटल आणि एलजी इलेक्ट्रॉनिक्सच्या IPO मध्ये चढाओढ; कोणाची किती मागणी, तुम्ही गुंतवणूक केलीये का?
4
वस्ताद द्रविडचं नाव घेत रोहित शर्मानं ठोकला गंभीरविरोधात शड्डू! शेअर केली यशामागची खरी गोष्ट
5
भारतात येणासाठी फ्लाइटमध्ये प्रवेश करताच ब्रिटिश PM स्टार्मर म्हणाले, 'मी तुमचा पंतप्रधान बोलतोय...!'; जाणून घ्या नेमकं काय घडलं
6
VIRAL : ७ वर्षांपूर्वी झोमॅटोवर किती रुपयांना मिळायचा पनीर टिक्का? बील होतंय व्हायरल; आकडा पाहून विश्वासच बसणार नाही!
7
८४ वर्षांनी नवपंचम नीचभंग राजयोग: ८ राशींचे कल्याण, सरकारी लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा, शुभ-मंगल!
8
"नवरा मेल्याचा पश्चाताप नाही, ४ मुलांच्या मृत्यूचं दुःख"; काय म्हणाली बॉयफ्रेंडसोबत पळालेली महिला?
9
मुंबईत दाऊदच्या जवळच्या माणसाभोवती ईडीने फास आवळला, सलीम डोलाच्या ८ ठिकाणांवर धाडी
10
आधी भारताशी पंगा अन् आता पाकिस्तानचा उल्लेख करत 'या' देशानं केलं डोनाल्ड ट्रम्प यांचं कौतुक
11
आता चष्म्याद्वारेही UPI पेमेंट करता येणार; मोबाईल फोनची गरजच भासणार नाही, पाहा डिटेल्स
12
'खेलने का बहुत शॉक था उसे, फिर मैने भी सिखा दिया...!' निक्की तांबोळीचा धनश्री वर्मावर निशाणा
13
Cough Syrup : पालकांनो अलर्ट! लहान मुलांना कधी, कसं, किती द्यावं कफ सिरप? AIIMS च्या डॉक्टरांचा मोलाचा सल्ला
14
अमेरिकेची चाल ओळखली, ट्रम्प यांच्या निर्णयाला १० देशांचा विरोध; पहिल्यांदाच भारत-पाकिस्तान एकत्र
15
टाटा-पेप्सी सारख्या कंपनीतील नोकरी सोडून तरुणाने धरली शेतीची वाट! आता वर्षाला कमावतोय ५ कोटी
16
विश्वासघातकी ट्रम्प! 'ऑपरेशन सिंदूर'नंतर अमेरिकेची पाकिस्तानसोबत सीक्रेट डील; भारताची चिंता वाढली
17
टाटा अल्ट्रोजपासून हॅरियरपर्यंत, 'या' ६ कार्सवर मिळतोय बंपर डिस्काउंट! वाचू शकतात १.४० लाख रुपये
18
पुतिन यांच्या 73व्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींचा फोन, काय बोलणं झालं?
19
टाटा सन्समध्ये पदावरुन वाद वाढला; नोएल टाटा आणि एन. चंद्रशेखरन यांनी घेतली अमित शाहंची भेट, सरकारचं म्हणणं काय?
20
रशियासाठी लढत होता २२ वर्षांचा भारतीय तरुण; युक्रेनच्या सैन्यानं पकडलं! व्हिडीओतून समोर आलं धक्कादायक सत्य

‘मिशन चक्रवती’ची केंद्रीय पथकाकडून पाहणी

By admin | Updated: June 4, 2016 02:10 IST

लोकसहभागातून होत असलेल्या ‘मिशन चक्रवती’च्या कामाची पाहणी शुक्रवारी केंद्रीय पथकाने केली. प्रत्यक्ष पाहणी करून झालेल्या

लोकसहभागाचे कौतुक : चापर्डा गावातील प्रश्न जाणले, नागरिकांनी मांडल्या पथकाकडे विविध समस्याकळंब : लोकसहभागातून होत असलेल्या ‘मिशन चक्रवती’च्या कामाची पाहणी शुक्रवारी केंद्रीय पथकाने केली. प्रत्यक्ष पाहणी करून झालेल्या आणि होणाऱ्या कामाची माहिती घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन या कामाची माहिती देण्यात येईल, असा विश्वासही या पथकाने दिला.दिल्ली येथील नीती आयोगाचे सदस्य तथा पथक प्रमुख रामानंद, ग्रामीण विकास विभागाचे अव्वर सचिव राम वर्मा, केंद्रीय विद्युत प्राधिकरणचे सचिव जे.के. राठोड, जलसंधारण विभागाचे उपसंचालक मिलिंद पानपाटील, भारतीय खाद्य निगमचे सहायक प्रबंधक एम.एम. बोऱ्हाडे, मदत व पुनर्वसन उपसचिव आत्राम यांच्यासह वरिष्ठ मंडळी यावेळी उपस्थित होती. उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार ंयांनी लोकसहभागातून केलेल्या या कामाची माहिती पथकाला दिली. चक्रवती नदीचे पात्र अरुंद व उथळ असल्याने पाणी साचत नव्हते. भीषण पाणीटंचाईचा सामना नागरिकांना करावा लागायचा. आता नदी खोल करण्यात आली, पात्र रुंद करण्यात आले. ठिकठिकाणी भूमिगत बंधारे निर्माण करून पाणी साठवण क्षमता वाढविण्यात आली. येणाऱ्या काही वर्षात कळंब शहराला पाणीटंचाईचा सामना करावा लागणार नाही, अशी माहिती यावेळी देण्यात आली. पथक प्रमुख रामानंद यांनी हा विषय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कानावर टाकण्यात येणार असल्याचे सांगितले. पथकाची चापर्डा गावाला भेटकेंद्रीय पथकाने शुक्रवारी चापर्डा गावला भेट दिली. सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि गावकऱ्यांशी चर्चा करुन त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. कोणती पिके घेतली जातात, पीक होते की नाही, शेतीमध्ये लावलेला पैसा निघतो की नाही याची माहिती पथकाने घेतली. नागरिकांनी आपले प्रश्न मांडले. यावेळी उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रेय गायकवाड, तहसीलदार संजय होटे, गटविकास अधिकारी डॉ.मनोहर नाल्हे, सहायक गटविकास अधिकारी पद्माकर मडावी, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे उपअभियंता मनोहर शहारे, तालुका कृषी अधिकारी के.बी. आठवले, पशुधन विकास अधिकारी रवींद्र मांडेकर, कृषी अधिकारी किशोर अंबरकर, पंकज बरडे आदी उपस्थित होते. कामठवाडा गावलाही पथकाची भेट नियोजित होती. गावकरी सकाळपासूनच वाट पाहात होते. ऐनवेळी पथकाने उशीर झाल्याचे कारण देत कामठवाडा गावला जाण्याचे टाळले. त्यामुळे तेथील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. (तालुका प्रतिनिधी)