शहरं
Join us  
Trending Stories
1
अपघातातील मृत ४२ भारतीयांचे मृतदेह भारतात आणू शकत नाही?; सौदीचा 'हा' नियम ठरतोय अडथळा
2
सौदी अरेबियातील बस अपघातात ४२ भारतीयांचा मृत्यू झाल्याची भीती, तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले दु:ख, माहिती गोळा करण्याचे दिले निर्देश
3
भावाचा हातात हात, तोंडावर मास्क, हात उंचावून अभिवादन; आजारपणातही संजय राऊत बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर
4
"बाळासाहेबांची प्रतिमा चोरून हिंदुत्वाचे वारस म्हणून मतं मागणाऱ्यांची..."; राज ठाकरेंचे 'फटकारे', कुणावर डागली तोफ?
5
Rohini Acharya : "कुटुंबात एक विषारी माणूस..."; लालू प्रसाद यादवांची लेक रोहिणी आचार्य यांची आणखी एक पोस्ट
6
"मी हे मान्यच करू शकत नाही..."; टीम इंडियाच्या पराभवानंतर चेतेश्वर पुजाराने चांगलंच सुनावलं
7
५ वर्षांत ५३०० टक्के रिटर्न; आता 'हा' शेअर पुन्हा सुस्साट! सातत्यानं लागतंय अपर सर्किट, कारण काय?
8
भारताचा अमेरिकेसोबत ऐतिहासिक LPG करार; घरगुती गॅस सिलिंडरची किंमत कमी होणार?
9
Protest: आधी ‘शेल्टर’ची व्यवस्था करा, नंतरच श्वानांना हात लावा; प्राणीमित्र संघटना रस्त्यावर!
10
गौतम अदानी आणताहेत देशातील सर्वात मोठा राइट्स इश्यू; ७१६ रुपये स्वस्त मिळतोय शेअर, पाहा डिटेल्स
11
खळबळजनक! थारसाठी पत्नीची हत्या, हुंड्यासाठी पती झाला हैवान; भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
12
SIR च्या कामाचा भार असह्य; वरिष्ठाच्या धमक्यांना कंटाळून शिक्षकाची रेल्वेखाली उडी, एकाच दिवशी दोन कर्मचाऱ्यांचे टोकाचे पाऊल
13
Ritual: पानाच्या टपरीवर का असते शंकराची पितळी मूर्ती? धार्मिक मान्यता की आणखी काही?
14
सौदी अरेबियात भीषण अपघात, ४२ भारतीयांचा मृत्यू; प्रवासी बस डिझेल टँकरला धडकली, आगीचा उडाला भडका
15
सुश्मिता सेनने पूर्ण शुद्धीत राहूनच केलेली अँजिओप्लास्टी, दोन वर्षांपूर्वी आलेला हार्टॲटॅक
16
काँगोमधील तांब्याच्या खाणीत मोठी दुर्घटना; पूल कोसळून ३२ जणांचा मृत्यू, अनेक जण अजूनही बेपत्ता
17
आई वडिलांची एक चूक नडली, मुलाला झाला गंभीर आजार; हाताचे बोट कापावे लागले, कारण काय?
18
टॅक्स भरणे झाले सोपे! बँक, नेट बँकिंगचा झंझट नाही; आता UPI ॲपद्वारे मिनिटांत भरा प्राप्तीकर
19
पालघर साधू हत्याकांडात आरोप केले, त्यालाच पक्षात घेतले? चौफेर टीका होताच भाजपानं दिलं असं स्पष्टीकरण
20
देवेंद्र फडणवीसांना भेटला, सत्कार करून घेतला; पंतप्रधान कार्यालयात सचिव म्हणणारा निघाला...
Daily Top 2Weekly Top 5

नगरविकासमंत्र्यांकडून गाळ्यांची चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2019 23:55 IST

शहरातील गांधी चौकात नगरपरिषदेचे १६० गाळे असून त्यांचा लिलाव करण्यासंदर्भात नगरसेवक पी.के.टोंगे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकरणाची चौकशी करून त्याचा अहवाल आठ आठवड्यांमध्ये सादर करावा, असे निर्देश उच्च न्यायालयाने नगरविकासमंत्र्यांना दिले आहे.

ठळक मुद्दे१६० गाळे लिलाव प्रकरण : वणीच्या व्यापाऱ्यांमध्ये खळबळ

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : शहरातील गांधी चौकात नगरपरिषदेचे १६० गाळे असून त्यांचा लिलाव करण्यासंदर्भात नगरसेवक पी.के.टोंगे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकरणाची चौकशी करून त्याचा अहवाल आठ आठवड्यांमध्ये सादर करावा, असे निर्देश उच्च न्यायालयाने नगरविकासमंत्र्यांना दिले आहे. त्यामुळे आता पुन्हा गाळेधारकांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.गांधी चौकातील २५ हजार चौरस फूट जागा ब्रिटीश सरकारने वणी नगरपरिषदेचे उत्पन्न वाढावे म्हणून नगरपरिषदेला दिली होती. त्यावरून या खुल्या जागेवर १६० गाळे निर्माण करून ते भाडे तत्वावर देण्यात आले. परंतु या कोट्यवधींच्या जागेवर गाळेधारकांनी अवैधपणे बांधकाम करणे, गाळ्याची परस्पर विक्री करणे, जुने गाळे तोडून नवीन गाळे तयार केले होते. तसेच भाजी मार्केटमधील बिलही अनेक दिवसांपासून देण्यात आले नाही. या सर्व प्रकाराबाबत नगरपरिषदेने विशेष सभा बोलावून सभेमध्ये गाळ्यांच्या लिलावाची मागणी केली होती. मात्र तत्कालिन मुख्याधिकाºयांनी याकडे कानाडोळा केला. त्यामुळे टोंगे यांनी सदर प्रकरण उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात दाखल केले होते. न्यायालयाने याबाबत जिल्हाधिकाºयांकडे अपिल करण्याचे सुचविले होते. जिल्हाधिकाºयांकडे अपिल केल्यावर त्यांनी या १६० गाळ्यांचा पुन्हा लिलाव करण्याचा आदेश दिला होता. या आदेशाविरूद्ध व्यापाºयांनी पुन्हा नगरविकासमंत्र्यांकडे धाव घेतल्याने या आदेशाला नगरविकासमंत्र्यांने स्थगिती दिली होती. तसेच हे गाळे ३० वर्षांसाठी त्याच व्यापाºयांना देण्याचे आदेशही नगरपरिषदेला दिले होते. त्यामुळे पुन्हा पी.के.टोंगे यांनी या आदेशाविरूद्ध मुंबई खंडपीठ नागपूर येथे २०१६ मध्ये याचिका दाखल केली होती. यावर उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एस.बी.शुक्रे यांनी राज्यमंत्र्यांच्या आदेशाला स्थगिती दिली. तसेच या प्रकरणाची चौकशी करून त्याचा अहवाल आठ आठवड्यांमध्ये न्यायालयात सादर करण्याचे आदेश नगरविकास मंत्र्यांना दिले. आता नगरविकास मंत्री या प्रकरणाची चौकशी करीत असून, यावर काय कार्यवाही होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.गाळेधारकांच्या शिष्टमंडळाची मुंबईत झाली बैठकनगरसेवक पी.के.टोंगे व बेरोजगार युवकांनी दाखल केलेल्या याचिकेवर १६ जानेवारी रोजी नगरविकासमंत्र्यांनी गाळेधारकांची तातडीची बैठक बोलाविली होती. तसेच याचिकाकर्ते पी.के.टोंगे यांनाही या बैठकीला बोलाविण्यात आले असून यावेळी नगरविकासमंत्री दोघांचीही बाजू ऐकूण घेतली.