शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बँकेची विभागीय सहनिबंधकांकडून चौकशी

By admin | Updated: April 11, 2017 00:02 IST

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची एका निनावी तक्रारीवरून अमरावती विभागीय सहनिबंधकांकडून (सहकारी संस्था) तीन सदस्यीय पथकाव्दारे चौकशी करण्यात आली.

निनावी तक्रार : संचालकावरच संशय, अहवालाची प्रतीक्षायवतमाळ : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची एका निनावी तक्रारीवरून अमरावती विभागीय सहनिबंधकांकडून (सहकारी संस्था) तीन सदस्यीय पथकाव्दारे चौकशी करण्यात आली. काही दिवसांपूर्वी विभागीय सहनिबंधकांच्या अमरावती कार्यालयात जिल्हा बँकेच्या कारभाराबाबत तीन पानी निनावी तक्रार प्राप्त झाली. या तक्रारीवर केवळ संचालक आणि स्वाक्षरी एवढाच शेवटी उल्लेख आहे. मात्र या तक्रारीची दखल घेऊन विभागीय सहनिबंधकांनी आपल्या अधिनस्त उपनिबंधक गायकवाड यांच्या नेतृत्वातील तीन सदस्यीय चमू यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत चौकशीसाठी पाठविली होती. या चमूने अनेक अभिलेख्यांची व व्यवहाराची दोन-तीन दिवस तपासणी केली. या चमूचा अहवाल सहनिबंधकांना अद्याप सादर झालेला नाही. त्यामुळे चौकशीत नेमके काय आढळले हे मात्र उघड होऊ शकले नाही. दरम्यान निनावी तक्रार करणारे ते संचालक कोण याचा शोध जिल्हा बँकेत सुरू झाला आहे. बैठकांमध्ये नेहमी आक्रमक राहणाऱ्या संचालकांकडे संशयाच्या नजरेने पाहिले जात आहे. सीईओंचा निर्णय १७ ला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सिंघम यांचा एक वर्ष प्रतिनियुक्तीचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. त्यांना राज्य सहकारी बँकेच्या नागपूर विभागीय कार्यालयात परत पाठवायचे की मुदतवाढ द्यायची असा मुद्दा संचालक मंडळाच्या बैठकीत नुकताच उपस्थित केला गेला. तेव्हा काही संचालकांनी परत पाठवा तर काहींनी मुदतवाढ द्या, अशी भूमिका घेतली. यावर पर्याय म्हणून सीईओ सिंघम यांचा वर्षभरातील परफॉर्मन्स काय, त्यांचा बँकेला नेमका उपयोग किती झाला हे तपासण्याचे ठरले. यासंबंधीचा अहवाल १७ एप्रिल रोजी होऊ घातलेल्या संचालक मंडळ बैठकीत ठेवला जाणार असून त्या दिवशी सिंघम यांना ठेवायचे की परत पाठवायचे याचा निर्णय घेतला जाणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी) अखेर रवींद्र देशमुखांनी तक्रारीची जबाबदारी स्वीकारली विभागीय सहनिबंधकांकडे केलेल्या निनावी तक्रारीची जबाबदारी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे एक संचालक रवींद्र देशमुख यांनी स्वीकारली आहे. आपणच ही तक्रार केल्याचे त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना मान्य केले. आपण ही तक्रार यापूर्वी नाबार्डकडे केली होती. तेथे दखल घेतली न गेल्याने सहनिबंधकांना पाठविली. या तक्रारीत बँकेतील अनेक गैरकारभारांचा उहापोह केला गेल्याचे व त्याबाबी चौकशीत आढळल्याचे देशमुख यांनी सांगितले. आपण आजारी असतानाच्या काळात बँकेत बराच घोळ झाला, असे सांगताना या प्रकाराबाबत कुणी संचालक बोलत नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. आम्ही गप्प राहिलो तर गैरकारभारात सहभागी आहोत, असा समज होतो. म्हणूनच आपण स्वत: ही तक्रार केली. त्यानंतरही कारभार न सुधारल्यास पुन्हा आपल्या स्पष्ट नावानिशी तक्रार करू, असा इशाराही रवींद्र देशमुख यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिला आहे. निनावी पत्राची दखल घेऊ नये, असा शासनाचा नियम आहे. नाबार्डने हा नियम पाळला, परंतु विभागीय सहनिबंधकांनी याच निनावी तक्रारीच्या आधारे जिल्हा बँकेची चौकशी लावली. चौकशीत काहीही निष्पन्न झाले नाही. मात्र अशा प्रकारामुळे बँकेच्या प्रतिमेला धक्का लागतो, शेतकऱ्यांमध्ये उगाच गैरसमज, संभ्रम निर्माण होतो. निबंधकांनी निनावी तक्रारीची दखल घेण्यामागील रहस्य उलगडलेले नाही.- मनीष पाटीलअध्यक्ष, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, यवतमाळ.