शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
2
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
3
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
4
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
5
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
6
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
7
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
8
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
9
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
10
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
11
लातूर : पाठीमागून येणाऱ्या दुचाकीची भयंकर धडक; आई, मुलासह जावयाचा मृत्यू
12
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
13
निक्की आधी बॅटिंगला येऊन पंतचा पुन्हा फ्लॉप शो! Sanjiv Goenka यांनी असा काढला राग
14
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
15
IPL 2025 : विदर्भकराचं स्वप्न झालं साकार! पण विकेटमागे इशान किशननं घोळ घातला, नाहीतर...
16
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
17
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
18
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
19
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
20
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...

कोळसा खाणींबाबत विदर्भावर अन्याय

By admin | Updated: July 11, 2015 00:09 IST

विदर्भात वीज निर्मितीसाठी स्थापित एक हजार मेगावॅट क्षमतेचे संच कोळशाअभावी बंद आहे.

विदर्भ राज्य : कोळसा खाण कर्नाटकला देण्यास विरोध, लोकप्रतिनिधींचा विदर्भ राज्य समितीने केला निषेधवणी : विदर्भात वीज निर्मितीसाठी स्थापित एक हजार मेगावॅट क्षमतेचे संच कोळशाअभावी बंद आहे. आता चंद्रपूर वीज निर्मिती केंद्राजवळील कोळसा खाण कर्नाटकला देण्याचा निर्णय घेतल्याचे केंद्रीय ऊर्जामंत्री पियूष गोयल यांनी लोकसभेत घोषित केले. या निर्णयाचा विदर्भ राज्य आंदोलन समितीने निषेध केला आहे. विदर्भातील दोन केंद्रीय मंत्री आणि त्यांच्या मदतीला भाजप व शिवसेनेचे प्रत्येकी चार खासदार असताना या सर्वांनी विदर्भातील जनतेवर अन्याय करणाऱ्या या निर्णयाला उपप्रश्न विचारून निर्णय बदलण्यास का भाग पाडले नाही, असा प्रश्न विदर्भ राज्य आंदोलन समितीने उपस्थित केला आहे. विदर्भासह महाराष्ट्रातील विधानसभा सदस्यांनी महाराष्ट्र विधानसभा मतदार संघातून गोयल यांना राज्यसभेवर निवडून दिले. ते ऊर्जा व कोळसा मंत्री आहेत. त्यांनी गेल्या २५ मार्चला चंद्रपूरातील ऊर्जा निर्मिती केंद्रापासून ३० किलोमीटर अंतरावरील बरांज कोळसा खाण कर्नाटक पॉवर कंपनीला देऊन विदर्भातील वीज निर्मिती केंद्रावर अन्याय केल्याचा आरोप समितीने केला आहे.विजेचे दर कमी व्हावे म्हणून वीज केंद्राजवळील कोळसा खाणी राज्य सरकारला वितरीत करण्याचे केंद्राचे धोरण आहे. मात्र त्याला हरताळ फासत केदं्रीय ऊर्जामंत्र्यांनी बरांज कोळसा खाण कर्नाटकला देऊन विदर्भातील वीज निर्मिती केंद्रावर मोठा अन्याय केला आहे. विदर्भाला कमी दरात वीज मिळण्याचा हा मार्गच बंद झाला आहे. राज्यातील खासदार व राज्य सरकारचे म्हणणे विचारात घेतले नाही, असेही पीयुष गोयल यांनी सांगितल्याने विदर्भ विकासाच्या गप्पा मारणाऱ्या या लोकप्रतिनिधींचे पितळ उघडे पडल्याचा दावा समितीने केला आहे.चंद्रपूरातील ऊर्जा निर्मिती केंद्रातील एक हजार मेगावॅटची स्थापित क्षमता असलेले संच क्रमांक आठ व नऊ हे मार्च २०१५ पासून कोळसा पुरवठा होत नसल्याने बंद आहे. उन्हाळ्यात कडक उन्हातही समन्यायी तत्वावर विजेच्या वाटपामुळे विदर्भातील जनतेला सहा ते १२ तासाचे भारनियमन सहन करावे लागते. आता तर चंद्रपूर वीज निर्मिती केंद्रातील चार संच विविध कारणांमुळे बंद आहेत. यामुळे दोन हजार ३४० मेगावॅट क्षमतेचे हे केंद्र केवळ ७०५ मेगावॅट वीज निर्मिती करीत आहे. (कार्यालय प्रतिनिधी)विदर्भातीलच कोळसा वीज निर्मिती केंद्रांना नाहीविदर्भात मोठ्या प्रमाणात कोळसा खाणी असताना वीज निर्मितीसाठी हा कोळसा विदर्भातील वीज केंद्रांना मिळत नसेल, तर तो विदर्भातील लोकप्रतिनिधींचा नाकर्तेपणा असल्याचे समितीने म्हटले आहे. विशेष म्हणजे विदर्भातील आमदारांनी आपल्या कोट्यातील मते देऊन आपले प्रतिनिधी म्हणून राज्यसभेवर निवडून दिलेले पियूष गोयल हे त्यांच्याच क्षेत्रातील विदर्भातील जनतेला न्याय देऊ शकले नाही. त्यामुळे या लोकप्रतिनिधींचा विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अ‍ॅड.वामनराव चटप, डॉ.श्रीनिवास खांदेवाले, प्रबिरकुमार चक्रवर्ती, राम नेवले, रमेश गजबे, मधुकर कुकडे, अ‍ॅड.नंदा पराते, सरोज काशिकर, मंगल चिंडालीया आदींनी निषेध केला आहे.