शहरं
Join us  
Trending Stories
1
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
2
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
3
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
4
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
5
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
6
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
7
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
8
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
9
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
10
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
11
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
12
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
13
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
14
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
15
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
16
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
17
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
18
Who Is Yash Rathod : विदर्भाची रन मशीन! पोट्याचं द्विशतक अवघ्या ६ धावांनी हुकलं
19
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
20
यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला...

कोळसा खाणींबाबत विदर्भावर अन्याय

By admin | Updated: July 11, 2015 00:09 IST

विदर्भात वीज निर्मितीसाठी स्थापित एक हजार मेगावॅट क्षमतेचे संच कोळशाअभावी बंद आहे.

विदर्भ राज्य : कोळसा खाण कर्नाटकला देण्यास विरोध, लोकप्रतिनिधींचा विदर्भ राज्य समितीने केला निषेधवणी : विदर्भात वीज निर्मितीसाठी स्थापित एक हजार मेगावॅट क्षमतेचे संच कोळशाअभावी बंद आहे. आता चंद्रपूर वीज निर्मिती केंद्राजवळील कोळसा खाण कर्नाटकला देण्याचा निर्णय घेतल्याचे केंद्रीय ऊर्जामंत्री पियूष गोयल यांनी लोकसभेत घोषित केले. या निर्णयाचा विदर्भ राज्य आंदोलन समितीने निषेध केला आहे. विदर्भातील दोन केंद्रीय मंत्री आणि त्यांच्या मदतीला भाजप व शिवसेनेचे प्रत्येकी चार खासदार असताना या सर्वांनी विदर्भातील जनतेवर अन्याय करणाऱ्या या निर्णयाला उपप्रश्न विचारून निर्णय बदलण्यास का भाग पाडले नाही, असा प्रश्न विदर्भ राज्य आंदोलन समितीने उपस्थित केला आहे. विदर्भासह महाराष्ट्रातील विधानसभा सदस्यांनी महाराष्ट्र विधानसभा मतदार संघातून गोयल यांना राज्यसभेवर निवडून दिले. ते ऊर्जा व कोळसा मंत्री आहेत. त्यांनी गेल्या २५ मार्चला चंद्रपूरातील ऊर्जा निर्मिती केंद्रापासून ३० किलोमीटर अंतरावरील बरांज कोळसा खाण कर्नाटक पॉवर कंपनीला देऊन विदर्भातील वीज निर्मिती केंद्रावर अन्याय केल्याचा आरोप समितीने केला आहे.विजेचे दर कमी व्हावे म्हणून वीज केंद्राजवळील कोळसा खाणी राज्य सरकारला वितरीत करण्याचे केंद्राचे धोरण आहे. मात्र त्याला हरताळ फासत केदं्रीय ऊर्जामंत्र्यांनी बरांज कोळसा खाण कर्नाटकला देऊन विदर्भातील वीज निर्मिती केंद्रावर मोठा अन्याय केला आहे. विदर्भाला कमी दरात वीज मिळण्याचा हा मार्गच बंद झाला आहे. राज्यातील खासदार व राज्य सरकारचे म्हणणे विचारात घेतले नाही, असेही पीयुष गोयल यांनी सांगितल्याने विदर्भ विकासाच्या गप्पा मारणाऱ्या या लोकप्रतिनिधींचे पितळ उघडे पडल्याचा दावा समितीने केला आहे.चंद्रपूरातील ऊर्जा निर्मिती केंद्रातील एक हजार मेगावॅटची स्थापित क्षमता असलेले संच क्रमांक आठ व नऊ हे मार्च २०१५ पासून कोळसा पुरवठा होत नसल्याने बंद आहे. उन्हाळ्यात कडक उन्हातही समन्यायी तत्वावर विजेच्या वाटपामुळे विदर्भातील जनतेला सहा ते १२ तासाचे भारनियमन सहन करावे लागते. आता तर चंद्रपूर वीज निर्मिती केंद्रातील चार संच विविध कारणांमुळे बंद आहेत. यामुळे दोन हजार ३४० मेगावॅट क्षमतेचे हे केंद्र केवळ ७०५ मेगावॅट वीज निर्मिती करीत आहे. (कार्यालय प्रतिनिधी)विदर्भातीलच कोळसा वीज निर्मिती केंद्रांना नाहीविदर्भात मोठ्या प्रमाणात कोळसा खाणी असताना वीज निर्मितीसाठी हा कोळसा विदर्भातील वीज केंद्रांना मिळत नसेल, तर तो विदर्भातील लोकप्रतिनिधींचा नाकर्तेपणा असल्याचे समितीने म्हटले आहे. विशेष म्हणजे विदर्भातील आमदारांनी आपल्या कोट्यातील मते देऊन आपले प्रतिनिधी म्हणून राज्यसभेवर निवडून दिलेले पियूष गोयल हे त्यांच्याच क्षेत्रातील विदर्भातील जनतेला न्याय देऊ शकले नाही. त्यामुळे या लोकप्रतिनिधींचा विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अ‍ॅड.वामनराव चटप, डॉ.श्रीनिवास खांदेवाले, प्रबिरकुमार चक्रवर्ती, राम नेवले, रमेश गजबे, मधुकर कुकडे, अ‍ॅड.नंदा पराते, सरोज काशिकर, मंगल चिंडालीया आदींनी निषेध केला आहे.