शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

शेतमालाच्या आधारभूत किमतीत अन्याय

By admin | Updated: June 19, 2016 02:16 IST

शेतमालाची आधारभूत किंमत घोषित करताना केंद्र ्रसरकारने याहीवर्षी शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहे.

शेतकरी संघटना : शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसलीयवतमाळ : शेतमालाची आधारभूत किंमत घोषित करताना केंद्र ्रसरकारने याहीवर्षी शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहे. सलग तिसऱ्या वर्षी शेतकऱ्यांवर घोर अन्याय केला आहे. शेतकऱ्यांना आधार देण्या ऐवजी नगण्य भाववाढ करून त्यांचा विश्वासघात केला, असा आरोप शेतकरी संघटनेने केला आहे. शेतमाल उत्पादन खर्चात दरवर्षी सतत वाढ होत आहे. मात्र उत्पादन खर्चावर आधारित रास्त भाव मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी दाभडी (ता. आर्णी) येथे नरेंद्र मोदी यांनी उत्पादन खर्च अधिक ५० टक्के नफा भरून शेतमालाचे दर ठरविले जाईल असे जाहीर केले होते. शिवाय इतर ठिकाणी झालेल्या सभांमध्येही त्यांनी हे आश्वासन दिले होते. मात्र २०१६-१७ या वर्षाकरिता जाहीर झालेल्या खरीप पिकांच्या किमान आधारभूत किमती पाहता नगण्य वाढ दिली आहे. कापूस व धानाला केवळ ६० रुपये प्रती क्विंटल वाढ दिली. देशात तेलबिया व खाद्यतेलाचा तुटवडा असताना सोयाबीनवर केवळ ६.७ टक्के म्हणजे १७५ रुपये वाढ केली आहे. धानाची आता आधारभूत किंमत एक हजार ४७० रुपये आखुड धाग्याच्या कापसाला तीन ८६० रुपये व लांब धाग्याच्या कापसाला चार हजार १६० रुपये घोषित करून शेतकऱ्यांची क्रुर चेष्टा केली आहे. निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांचा सरकारला विसर पडल्याचे शेतकरी संघटनेने म्हटले आहे. शासनाने शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी अ‍ॅड़ वामनराव चटप, सरोजताई काशीकर, गुणवंत पाटील हंगरगेकर, शैला देशपांडे, संजय कोले, मधु भरणे, अनिल घनवट, जगदीश नाना बोंडे, माया पुसदेकर, नाना खांदवे, दवेंद्र राऊत, विजय निवल, देवराव पाटील धांडे, प्रज्ञा चौधरी, जयंतराव बापट, मारोतराव काळे, बापू पाटील चौधरी, दशरथ बोबडे, रमेश मांगुळकर, दीपकअण्णा आनंदवार, बाळासाहेब देशमुख, नारायणराव बोरकर, इंदरचंद बैद, राजू कुंचटवार, वैकुंठराव मुंडे, शरद पडगीलवार, हसनराव देशमुख, बबनराव चौधरी, चंद्रशेखर देशमुख यांनी केली आहे. (वार्ताहर)