शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

शेतमालाच्या आधारभूत किमतीत अन्याय

By admin | Updated: June 19, 2016 02:16 IST

शेतमालाची आधारभूत किंमत घोषित करताना केंद्र ्रसरकारने याहीवर्षी शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहे.

शेतकरी संघटना : शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसलीयवतमाळ : शेतमालाची आधारभूत किंमत घोषित करताना केंद्र ्रसरकारने याहीवर्षी शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहे. सलग तिसऱ्या वर्षी शेतकऱ्यांवर घोर अन्याय केला आहे. शेतकऱ्यांना आधार देण्या ऐवजी नगण्य भाववाढ करून त्यांचा विश्वासघात केला, असा आरोप शेतकरी संघटनेने केला आहे. शेतमाल उत्पादन खर्चात दरवर्षी सतत वाढ होत आहे. मात्र उत्पादन खर्चावर आधारित रास्त भाव मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी दाभडी (ता. आर्णी) येथे नरेंद्र मोदी यांनी उत्पादन खर्च अधिक ५० टक्के नफा भरून शेतमालाचे दर ठरविले जाईल असे जाहीर केले होते. शिवाय इतर ठिकाणी झालेल्या सभांमध्येही त्यांनी हे आश्वासन दिले होते. मात्र २०१६-१७ या वर्षाकरिता जाहीर झालेल्या खरीप पिकांच्या किमान आधारभूत किमती पाहता नगण्य वाढ दिली आहे. कापूस व धानाला केवळ ६० रुपये प्रती क्विंटल वाढ दिली. देशात तेलबिया व खाद्यतेलाचा तुटवडा असताना सोयाबीनवर केवळ ६.७ टक्के म्हणजे १७५ रुपये वाढ केली आहे. धानाची आता आधारभूत किंमत एक हजार ४७० रुपये आखुड धाग्याच्या कापसाला तीन ८६० रुपये व लांब धाग्याच्या कापसाला चार हजार १६० रुपये घोषित करून शेतकऱ्यांची क्रुर चेष्टा केली आहे. निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांचा सरकारला विसर पडल्याचे शेतकरी संघटनेने म्हटले आहे. शासनाने शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी अ‍ॅड़ वामनराव चटप, सरोजताई काशीकर, गुणवंत पाटील हंगरगेकर, शैला देशपांडे, संजय कोले, मधु भरणे, अनिल घनवट, जगदीश नाना बोंडे, माया पुसदेकर, नाना खांदवे, दवेंद्र राऊत, विजय निवल, देवराव पाटील धांडे, प्रज्ञा चौधरी, जयंतराव बापट, मारोतराव काळे, बापू पाटील चौधरी, दशरथ बोबडे, रमेश मांगुळकर, दीपकअण्णा आनंदवार, बाळासाहेब देशमुख, नारायणराव बोरकर, इंदरचंद बैद, राजू कुंचटवार, वैकुंठराव मुंडे, शरद पडगीलवार, हसनराव देशमुख, बबनराव चौधरी, चंद्रशेखर देशमुख यांनी केली आहे. (वार्ताहर)