शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

कपाशीवर पॅराविल्ट रोगाचा प्रादुर्भाव

By admin | Updated: September 3, 2014 00:05 IST

मागील चार दिवसात तालुक्यात झालेल्या जास्त पर्जन्यमानामुळे शेतामधील खोलगट भागात पाणी साचल्याने कपाशी पिकांची झाडे मलूल झालेली आहेत. या पिकावर पॅराविल्ट रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने

दारव्हा : मागील चार दिवसात तालुक्यात झालेल्या जास्त पर्जन्यमानामुळे शेतामधील खोलगट भागात पाणी साचल्याने कपाशी पिकांची झाडे मलूल झालेली आहेत. या पिकावर पॅराविल्ट रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण दिसून येत आहे.२८ आॅगस्टपासून तालुक्यात दमदार पावसाने हजेरी लावली. गत चार दिवसातच २०४ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. तालुक्याची पावसाची सरासरी ८४४ मि.मी. पावसाची आहे. सरासरीच्या ७५ टक्के पाऊस तालुक्यात झाला आहे. सतत चार दिवस कोसळलेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या शेतातील विशेषत: खोलगट भागामध्ये पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा न झाल्याने त्या ठिकाणचे कपाशीची झाडे मलूल होत आहेत. कपाशीच्या झाडाचे बारीक तंतूमय मुळांचे जमिनीशी संपर्क तुटल्यामुळे त्या झाडांची अन्नद्रव्य शोषण करण्याची क्रीया मंदावते. त्यामुळे झाडे मर सदृश रोगाने ग्रासल्या जात आहेत. यासंदर्भात दारव्हा तालुका कृषी अधिकारी अंगाईत यांच्याशी संपर्क साधला असता, मलूल झालेले अथवा होत असताना कॉपर आॅक्सीक्लोराईड या बुरशीनाशकाची २५ ते ३० ग्रॅम १० लिटर पाण्यात मिसळून सोबत १०० ग्रॅम युरिया टाकावा व हे द्रावण स्प्रे पंपाने नोझल काढून बाधित झाडांच्या मुळांच्या सभोवताल १०० मि.ली.पर्यंत प्रती झाड टाकावे. शक्य असल्यास फवारणी करावी तसेच मलूल झालेल्या झाडांच्या बुंध्याजवळ पायाने दाबावे त्यामुळे बारीक मुळांची पुन: जमिनीशी संपर्क होण्यास मदत होईल, अशी माहिती त्यांनी ‘लोकमत’ला दिली. पॅराविल्ट हा रोग भौतिक अवस्था व बुरशीमुळे होत असून शेतकऱ्यांनी लक्षणे दिसताच त्वरित सावधानता बाळगून योग्य उपाययोजना करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. (प्रतिनिधी)