शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

वणीत सोयाबीन पिकावर हिरव्या अळीचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2017 01:23 IST

सध्या सोयाबीन पीक बहुतांश भागात वाढीच्या अवस्थेत असून दोन दिवसांपूर्वी झालेला पाऊस यासाठी पोषक ठरला आहे.

कृषी विभाग अनभिज्ञ : शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीची भीतीलोकमत न्यूज नेटवर्कवणी : सध्या सोयाबीन पीक बहुतांश भागात वाढीच्या अवस्थेत असून दोन दिवसांपूर्वी झालेला पाऊस यासाठी पोषक ठरला आहे. मात्र सोयाबीनवर हिरव्या उंट अळीचे आक्रमण वाढले आहे. त्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती आहे.वणी तालुक्यात कपाशीसह सोयाबीन हे पीक प्रमुख पीक आहे. जुन महिन्यात लागवड झालेले पीक यावर्षी अनियमीत पावसामुळे व अळीच्या प्रादूर्भावामुळे प्रभावित झाले आहे. काही भागात जुनच्या दुसऱ्या आठवड्यात झालेली पेरणी साधली. सध्या पीक वाढीच्या अवस्थेत, तर काही ठिकाणी फुलोऱ्यावर येत आहे. अशा महत्त्वाच्या काळात सोयाबीनवर अळीचा प्रदूर्भाव वाढू लागला आहे. ढगाळ वातावरण राहत असल्याने या अळीला पोषक वातावरण मिळत आहे. ही उंट अळी हिरव्या रंगाची असून ती पानाचा हिरवा भाग फस्त करते. अळ्यांचा प्रादूर्भाव वाढत असल्याने अनेक शेतांमध्ये सोयाबीनच्या झाडावरील पानांची चाळणी झालेली दिसून येते. पानांची चाळणी झालेल्या झाडांच्या प्रकाशसंश्लेषण क्रियेवर परिणाम होऊन पिकांची वाढ खुंटली आहे. पीक वाचविण्यासाठी शेतकरी स्वअनुभवावर किटकनाशकांचा वापर करीत आहे. मात्र कृषी विभागाकडून पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी कोणतेही प्रयत्न होताना दिसून येत नाही.दरवर्षी कृषी विभागामार्फत कोणती किटकनाशके फवारायची, याबाबत जनजागृती केली जायची. मात्र यावर्षी या अळींचा मोठ्या प्रमाणात प्रादूर्भाव झाला असतानाही कृषी विभागाकडून कोणतीही दखल घेण्यात आली नाही. तालुक्यातील गावागावात कृषी सहाय्यक भेटी देत असतात. मात्र त्यांनाही ही बाब लक्षात न येणे, हे न सजण्यासारखे कोडे आहे. काही शेतकऱ्यांनी कृषी सहाय्यकांशी संपर्क साधला, तर संपर्क होत नाही. त्यामुळे योग्य मार्गदर्शन व कोणते किटकनाशक फवारावे, याविषयी शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.