शहरं
Join us  
Trending Stories
1
"अन्याय कितीही मोठा असला तरी..." मुंबईत भाजपाच्या माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत
2
मनसेचा पहिला उमेदवार ठरला, राज ठाकरेंनी दिला AB फॉर्म; यशवंत किल्लेदार कुठून लढणार?
3
आता केवळ २ दिवस शिल्लक, PAN Aadhaar लवकर लिंक करा; अन्यथा होईल मोठी डोकेदुखी
4
४ ओव्हर्स, ७ रन्स आणि ८ विकेट्स! या गोलंदाजाने T20I मध्ये सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
5
Aadhaar Card : तुमचे 'आधार कार्ड' लॉक करा, नाही तर बँक खाते होईल रिकामे; जाणून घ्या प्रक्रिया
6
एकट्याच्या जीवावर सिनेमा करुन दाखव..., 'दृश्यम ३'च्या दिग्दर्शकाचं अक्षय खन्नाला खुलं आव्हान
7
सोन्या-चांदीच्या किंमतीबाबत बाबा वेंगानी काय म्हटलं; दरांबाबत काय केली भविष्यवाणी? जाणून घ्या
8
पुण्यात भाजपची अळीमिळी गुपचिळी! 'उमेदवारी मिळाली हो...!' उमेदवारांचे समर्थकांना सकाळीच गेले फोन, एबी फॉर्म उद्या मिळणार?
9
BMC Election 2026 Shiv Sena UBT List: उद्धवसेनेकडून मुंबई महापालिकेसाठी ५५ जणांना उमेदवारी, कोणाला मिळाले एबी फॉर्म?
10
सावधान! तुमच्या नावावर भलतेच कोणी सिम वापरत नाहीये ना? 'या' पोर्टलवर घरबसल्या करा तपासणी
11
मकर राशीसाठी नवीन वर्ष 2026: जुन्या आव्हानांचा होणार अंत; प्रगतीसाठी 'हे' सूत्र वापरा आणि यश मिळवा!
12
२०२५ची शेवटची पुत्रदा एकादशी: कसे कराल व्रतपूजन?; ‘या’ गोष्टी आवर्जून करा, पुण्य-लाभ मिळेल!
13
मुंबईत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का; मुंबई अध्यक्षा राखी जाधव यांचा भाजपात प्रवेश
14
Silver Price Crash: एका तासात चांदी २१ हजार रुपयांनी आपटली; विक्रमी उच्चांकानंतर किमतीत का आला भूकंप?
15
"माझी शिवसेनेतून हकालपट्टी करा, कारण..."; KDMC च्या माजी सभागृह नेत्याचं एकनाथ शिंदेंना पत्र
16
‘मोदी आणि ईव्हीएमच्या बळावर भाजपा माज करतोय, कोणत्याही परिस्थितीत मुंबईला वाचवायचंय’, राज ठाकरेंचं मोठं विधान 
17
मालेगावात महायुतीचे नेमके अडले कुठे? आता चर्चा वरिष्ठ स्तरावर; स्थानिक पातळीवर एकमत होईना
18
VHT 2025 : टीम इंडियातील 'ध्रुवतारा' चमकला! पांड्याच्या संघातील गोलंदाजांना धु धु धुतलं
19
पश्चिममध्ये तीन प्रभागांत भाजप विरुद्ध भाजप! शिंदेसेना- राष्ट्रवादी एकत्र, महाविकास आघाडीचा प्रभाव
20
५ वर्षांत १०००% चं रिटर्न, आज अचानक जोरदार आपटला हा शेअर; कोणता आहे स्टॉक, कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

वणीत सोयाबीन पिकावर हिरव्या अळीचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2017 01:23 IST

सध्या सोयाबीन पीक बहुतांश भागात वाढीच्या अवस्थेत असून दोन दिवसांपूर्वी झालेला पाऊस यासाठी पोषक ठरला आहे.

कृषी विभाग अनभिज्ञ : शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीची भीतीलोकमत न्यूज नेटवर्कवणी : सध्या सोयाबीन पीक बहुतांश भागात वाढीच्या अवस्थेत असून दोन दिवसांपूर्वी झालेला पाऊस यासाठी पोषक ठरला आहे. मात्र सोयाबीनवर हिरव्या उंट अळीचे आक्रमण वाढले आहे. त्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती आहे.वणी तालुक्यात कपाशीसह सोयाबीन हे पीक प्रमुख पीक आहे. जुन महिन्यात लागवड झालेले पीक यावर्षी अनियमीत पावसामुळे व अळीच्या प्रादूर्भावामुळे प्रभावित झाले आहे. काही भागात जुनच्या दुसऱ्या आठवड्यात झालेली पेरणी साधली. सध्या पीक वाढीच्या अवस्थेत, तर काही ठिकाणी फुलोऱ्यावर येत आहे. अशा महत्त्वाच्या काळात सोयाबीनवर अळीचा प्रदूर्भाव वाढू लागला आहे. ढगाळ वातावरण राहत असल्याने या अळीला पोषक वातावरण मिळत आहे. ही उंट अळी हिरव्या रंगाची असून ती पानाचा हिरवा भाग फस्त करते. अळ्यांचा प्रादूर्भाव वाढत असल्याने अनेक शेतांमध्ये सोयाबीनच्या झाडावरील पानांची चाळणी झालेली दिसून येते. पानांची चाळणी झालेल्या झाडांच्या प्रकाशसंश्लेषण क्रियेवर परिणाम होऊन पिकांची वाढ खुंटली आहे. पीक वाचविण्यासाठी शेतकरी स्वअनुभवावर किटकनाशकांचा वापर करीत आहे. मात्र कृषी विभागाकडून पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी कोणतेही प्रयत्न होताना दिसून येत नाही.दरवर्षी कृषी विभागामार्फत कोणती किटकनाशके फवारायची, याबाबत जनजागृती केली जायची. मात्र यावर्षी या अळींचा मोठ्या प्रमाणात प्रादूर्भाव झाला असतानाही कृषी विभागाकडून कोणतीही दखल घेण्यात आली नाही. तालुक्यातील गावागावात कृषी सहाय्यक भेटी देत असतात. मात्र त्यांनाही ही बाब लक्षात न येणे, हे न सजण्यासारखे कोडे आहे. काही शेतकऱ्यांनी कृषी सहाय्यकांशी संपर्क साधला, तर संपर्क होत नाही. त्यामुळे योग्य मार्गदर्शन व कोणते किटकनाशक फवारावे, याविषयी शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.