शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
2
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
3
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
4
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
5
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
6
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
7
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
8
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
9
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
10
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
11
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
12
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
13
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
14
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
15
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
16
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
17
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
18
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
19
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
20
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी

उन्हामुळे भाज्यांना महागाईचा तडका

By admin | Updated: May 3, 2017 00:19 IST

वाढत्या तापमानामुळे जीवाची लाहीलाही होत असतानाच आता या तापमानाचा परिणाम भाजी बाजारातही दिसून येत आहे.

उत्पादन घटले : लग्नसराईमुळे मागणीत वाढ, दीड महिना दर कमी होण्याची शक्यता नाही पुसद : वाढत्या तापमानामुळे जीवाची लाहीलाही होत असतानाच आता या तापमानाचा परिणाम भाजी बाजारातही दिसून येत आहे. उत्पादन घटल्यामुळे भाव वाढले आहे. तसेच सध्या लग्नसराईमुळे भाज्यांची मागणी वाढली आहे. या सर्व बाबींचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या बजेटवर झाला आहे. पंधरवड्यापासून पुसद तालुक्यात उन्हाचा पारा ४० ते ४४ अंश सेल्सिअसवर पोहोचल्याने याचा फटका भाजीपाला उत्पादकांना बसला आहे. १५ एप्रिलपर्यंत भाज्यांचे दर सर्वसामान्यांना परवडणारे होते. परंतु उत्पादक शेतकऱ्यांच्या पदरी दोन पैसेही यातून उरले नाही. गेल्या अनेक वर्षाच्या उन्हाळ्यातील भाज्यांच्या दरावर नजर टाकली असता तुलनेने यावर्षी उन्हाळ्यात एप्रिल महिन्यात स्वस्त भाजीपाला होता. परंतु मागील दोन आठवड्यांपासून तापमानात झालेल्या प्रचंड वाढीमुळे भाजीपाल्याचे उत्पादन घटले. याचा परिणाम दरवाढीवर झाला. वांगी, गवार, हिरवी मिरची, फुलकोबी, शेवग्याच्या शेंगा, मेथी, पालक, कारले, दोडकी, भेंडे या सर्व भाज्या किमान ५० टक्के महागल्या आहे. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहक हतबल झाला आहे. सध्या बाजारात भेंडी ४० रुपये किलो, तसेच फुलकोबी, शेवग्याच्या शेंगा, वांगी, दोडके या भाज्या ४० रुपये किलो, मेथी, पालक, गवार ६० ते ७० रुपये किलो, कोशिंबीर ९० ते १०० रुपये, शिमला मिरची ६० ते ८० रुपये किलोने उपलब्ध आहे. घाऊक बाजाराच्या तुलनेत जवळपास ४० ते ५० टक्के जादा दराने किरकोळ व्यापारी भाजी विक्री करतात. या किरकोळ व्यापाऱ्यांवर कुणाचेही नियंत्रण नसल्याने सामान्य ग्राहकाला आणखीच भाजी अधिक दराने विकत घ्यावे लागते. गेल्या महिनाभरापासून उन्हाच्या पाऱ्याने चाळिशी गाठली आहे. त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. आता उन्हाच्या काहिलीने घटलेली आवकही निम्यावर आली आहे. त्यामुळे आधीच पाणीटंचाईने त्रस्त सामान्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाल्याने भाजीपाला ट्रान्सपोर्टींगचा खर्चही वाढला आहे. याचाही परिणाम बाजारावर दिसून येत आहे. यासंदर्भात काही तज्ज्ञांच्या प्रतिक्रिया घेतल्या असता कृषीभूषण दत्ता जाधव म्हणाले, सध्या पुसद तालुक्यातील तापमान ४४ अंशांपर्यंत पोहोचल्याने लागवड केलेल्या भाज्या जास्त तग धरू शकत नाही. पुरेसे पाणी न मिळाल्याने त्या वाळून जातात व उन्मळून पडतात. अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी आहे तर वीज नाही अशी परिस्थिती आहे. त्यामुळे बाजारात माल येणार कुठून. सध्या वाढलेले तापमान व पावसाळ्यात उद्भवणाऱ्या विविध समस्यांमुळे पुढील दीड ते दोन महिने भाज्यांच्या दरात तेजी राहील, असेही जाधव म्हणाले. तर तालुक्यातील वनवार्ला येथील शेतकरी वैभव फुके यांच्या मते आतापर्यंत पाण्यामुळे भाजीपाल्याचे उत्पादन बऱ्यापैकी होते. परंतु बाजारात शेती खर्चाच्या तुलनेत योग्य भाव मिळाला नाही. आता पाणी संपत आले. अनेकांच्या शेतात पाणीच नाही. तापमान वाढत असल्याने फुले लागत नाही. भाजीपाला टिकत नाही. त्यामुळे भाजी शेती सध्या बिकट झाली आहे. (तालुका प्रतिनिधी)