शहरं
Join us  
Trending Stories
1
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
2
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
3
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
4
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
5
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
6
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
7
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
8
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
9
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
10
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
11
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
12
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
13
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
14
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
15
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
16
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
17
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
18
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
19
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
20
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
Daily Top 2Weekly Top 5

उन्हामुळे भाज्यांना महागाईचा तडका

By admin | Updated: May 3, 2017 00:19 IST

वाढत्या तापमानामुळे जीवाची लाहीलाही होत असतानाच आता या तापमानाचा परिणाम भाजी बाजारातही दिसून येत आहे.

उत्पादन घटले : लग्नसराईमुळे मागणीत वाढ, दीड महिना दर कमी होण्याची शक्यता नाही पुसद : वाढत्या तापमानामुळे जीवाची लाहीलाही होत असतानाच आता या तापमानाचा परिणाम भाजी बाजारातही दिसून येत आहे. उत्पादन घटल्यामुळे भाव वाढले आहे. तसेच सध्या लग्नसराईमुळे भाज्यांची मागणी वाढली आहे. या सर्व बाबींचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या बजेटवर झाला आहे. पंधरवड्यापासून पुसद तालुक्यात उन्हाचा पारा ४० ते ४४ अंश सेल्सिअसवर पोहोचल्याने याचा फटका भाजीपाला उत्पादकांना बसला आहे. १५ एप्रिलपर्यंत भाज्यांचे दर सर्वसामान्यांना परवडणारे होते. परंतु उत्पादक शेतकऱ्यांच्या पदरी दोन पैसेही यातून उरले नाही. गेल्या अनेक वर्षाच्या उन्हाळ्यातील भाज्यांच्या दरावर नजर टाकली असता तुलनेने यावर्षी उन्हाळ्यात एप्रिल महिन्यात स्वस्त भाजीपाला होता. परंतु मागील दोन आठवड्यांपासून तापमानात झालेल्या प्रचंड वाढीमुळे भाजीपाल्याचे उत्पादन घटले. याचा परिणाम दरवाढीवर झाला. वांगी, गवार, हिरवी मिरची, फुलकोबी, शेवग्याच्या शेंगा, मेथी, पालक, कारले, दोडकी, भेंडे या सर्व भाज्या किमान ५० टक्के महागल्या आहे. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहक हतबल झाला आहे. सध्या बाजारात भेंडी ४० रुपये किलो, तसेच फुलकोबी, शेवग्याच्या शेंगा, वांगी, दोडके या भाज्या ४० रुपये किलो, मेथी, पालक, गवार ६० ते ७० रुपये किलो, कोशिंबीर ९० ते १०० रुपये, शिमला मिरची ६० ते ८० रुपये किलोने उपलब्ध आहे. घाऊक बाजाराच्या तुलनेत जवळपास ४० ते ५० टक्के जादा दराने किरकोळ व्यापारी भाजी विक्री करतात. या किरकोळ व्यापाऱ्यांवर कुणाचेही नियंत्रण नसल्याने सामान्य ग्राहकाला आणखीच भाजी अधिक दराने विकत घ्यावे लागते. गेल्या महिनाभरापासून उन्हाच्या पाऱ्याने चाळिशी गाठली आहे. त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. आता उन्हाच्या काहिलीने घटलेली आवकही निम्यावर आली आहे. त्यामुळे आधीच पाणीटंचाईने त्रस्त सामान्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाल्याने भाजीपाला ट्रान्सपोर्टींगचा खर्चही वाढला आहे. याचाही परिणाम बाजारावर दिसून येत आहे. यासंदर्भात काही तज्ज्ञांच्या प्रतिक्रिया घेतल्या असता कृषीभूषण दत्ता जाधव म्हणाले, सध्या पुसद तालुक्यातील तापमान ४४ अंशांपर्यंत पोहोचल्याने लागवड केलेल्या भाज्या जास्त तग धरू शकत नाही. पुरेसे पाणी न मिळाल्याने त्या वाळून जातात व उन्मळून पडतात. अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी आहे तर वीज नाही अशी परिस्थिती आहे. त्यामुळे बाजारात माल येणार कुठून. सध्या वाढलेले तापमान व पावसाळ्यात उद्भवणाऱ्या विविध समस्यांमुळे पुढील दीड ते दोन महिने भाज्यांच्या दरात तेजी राहील, असेही जाधव म्हणाले. तर तालुक्यातील वनवार्ला येथील शेतकरी वैभव फुके यांच्या मते आतापर्यंत पाण्यामुळे भाजीपाल्याचे उत्पादन बऱ्यापैकी होते. परंतु बाजारात शेती खर्चाच्या तुलनेत योग्य भाव मिळाला नाही. आता पाणी संपत आले. अनेकांच्या शेतात पाणीच नाही. तापमान वाढत असल्याने फुले लागत नाही. भाजीपाला टिकत नाही. त्यामुळे भाजी शेती सध्या बिकट झाली आहे. (तालुका प्रतिनिधी)