शहरं
Join us  
Trending Stories
1
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
2
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
3
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
4
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
5
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
6
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
7
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
8
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिटकवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
9
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
10
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला
11
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास
12
फायद्याची गोष्ट! 'या' ३ गोष्टी फ्रिजमध्ये ठेवण्याची अजिबात करू नका चूक; कॅन्सरचा वाढेल धोका
13
सावधान! WhatsApp वर आला 'प्रोफाईल फोटो' स्‍कॅम; तुमच्या अकाऊंटमधून 'असे' जातील पैसे
14
शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्यांना त्याच भाषेत उत्तर, नारायण राणे यांचा इशारा
15
भारताशी पंगा घेणाऱ्या पाकिस्तानला मोठा झटका! 'या' मोठ्या एअरलाईन्स वापरणार नाहीत पाकचा एअरस्पेस
16
१ कोटी दे, नाहीतर ठार मारून टाकू; गोलंदाज मोहम्मद शमीला जीवे मारण्याच्या धमकीचा ई-मेल
17
Video - रीलचा नाद लय बेक्कार! सिंगरने गाण्यासाठी लावली पँटला आग; अवघ्या काही सेकंदात...
18
'तुझ्या बायकोला माझ्याजवळ पाठव, कर्ज माफ करतो'; पतीचा संयम सुटला अन् त्याने सावकाराचा जीवच घेतला
19
इन्स्टाग्राम मेसेजवरून भांडण पेटलं, पुण्यात शेजऱ्यानं तरुणाला दगडावर आपटून संपवलं! 
20
सईसोबत 'गुलकंद'मध्ये रोमान्स करणाऱ्या समीर चौघुले यांच्या बायको आणि मुलाला पाहिलंत का?

औद्योगिक वसाहतीतील सुरक्षा वाऱ्यावर

By admin | Updated: November 1, 2014 23:13 IST

उद्योगांमध्ये औद्योगिक सुरक्षा अतिशय महत्वाची आहे. यासाठी उद्योग खात्याने नियमावली ठरवून दिली आहे. परंतु या नियमावलीचे तंतोतंत पालन होताना दिसत नाही. कामगारांना जोखीम

चोरीच्या घटनांमध्ये वाढ : कामगारही करतात जोखीम स्वीकारून कामसुहास सुपासे - यवतमाळ उद्योगांमध्ये औद्योगिक सुरक्षा अतिशय महत्वाची आहे. यासाठी उद्योग खात्याने नियमावली ठरवून दिली आहे. परंतु या नियमावलीचे तंतोतंत पालन होताना दिसत नाही. कामगारांना जोखीम स्वीकारून आपले काम करावे लागते. यवतमाळ शहरात दोन औद्योगिक वसाहती आहेत. यातील अंतर्गत कर्मचाऱ्यांची सुरक्षा आणि मालाची सुरक्षा करण्याची जबाबदारी ही सबंधित उद्योजकांकडेच असते. त्यासाठी आवश्यक त्या सोयीसुविधा पुरविण्यासंदर्भात शासनाची नियमावली आहे. त्यानुसार कामगारांसाठी काम करण्यास पोषक वातावरण असणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने त्यांच्यासाठी जेवणाची जागा, स्वच्छ पाणी, शौचालय सोबतच जोखीमीच्या ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांसाठी आवश्यक तो विमा आणि प्रत्यक्ष उद्योगामध्ये सुविधा आवश्यक आहे. यातील बहुतांश सोयीसुविधांची पूर्तता यवतमाळसारख्या जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या एमआयडीसीमधील उद्योगांमध्ये होत असल्या तरी जिल्ह्यातील इतर औद्योगिक वसाहतींची मात्र खस्ता हालत आहे. वणीसारख्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उद्योग असताना त्या ठिकाणी मात्र कामगारांच्या सुरक्षितेतच्या दृष्टीने आवश्यक ते नियमांची अंमलबजावणी होताना दिसत नाही. याबाबत कर्मचाऱ्यांमध्येही एकजुटतेचा अभाव आणि स्वत:च्या सुरक्षिततेविषयी असलेली अनभिज्ञता कारणीभूत आहे. त्यामुळे इथे कामगारांच्या अपघातांची संख्यासुद्धा मोठी आहे. यवतमाळच्या औद्योगिक वसाहतीमध्ये चोरीच्या घटना मात्र नित्याच्याच झाल्या आहेत. तयार मालाची व इतर साहित्याच्या चोऱ्या या ठिकाणी नेहमीच होतात. उल्लेखनिय म्हणजे या संदर्भात वारंवार तक्रारी करण्यात आल्या आहेत. अनेकवेळा जिल्हा पोलीस अधिक्षकांना निवेदने देण्यात आली आहेत. परंतु त्याचा कोणताही फायदा झाला नाही. मोठ्या प्रमाणात चोऱ्या झाल्यानंतर पोलीस ठाण्यात तक्रारी केल्यानंतर आजपर्यंत एकाही चोरीचा छडा लावण्यात आला नसल्याची माहिती एमआयडीसीचे अध्यक्ष नंदकुमार सुराणा यांनी दिली. यावर विचार होणे आवश्यक आहे. याबाबत एमआयडीसी कार्यालयाशी संपर्क साधला असता, आम्ही उद्योगांना केवळ जागा, विद्युत व पाणी उपलब्ध करून देतो. इतर बाबींशी आमचा काहीएक सबंध नसल्याचे सांगण्यात आले. उद्योजकांनी आपल्या कर्मचाऱ्यांची तसेच मालाची सुरक्षितता स्वत:च करायची असल्याचे एमआयडीसी कार्यालयाचे म्हणणे आहे. तीन महिन्यांपूर्वी पोलीस चौकी औद्योगिक वसाहतीत उभारण्यात आली आहे. परंतु ही चौकी उभारण्यात आल्यानंतर चोरींच्या घटनांमध्ये अधिक वाढ झाल्याचा आरोप उद्योजकांमधून करण्यात येत आहे. या चौकीचा फारसा उपयोग चोऱ्या रोखण्यात होतच नसल्याचे दिसून येत आहे. या अनुषंगाने पोलीस खात्याने विचार करण्याची गरज आहे. एमआयडीसी परिसरातील मोठे उद्योजक स्वत:च्या मालाची व कर्मचाऱ्यांची सुरक्षा स्वत: करण्यास सक्षम असतात. परंतु छोट्या उद्योजकांची मात्र चांगलीच कसरत होते. त्यादृष्टीने विचार होणे गरजेचे आहे.