शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : टीम इंडियाच्या ५ शतकांवर फेरलं पाणी! हेडिंग्लेचं मैदान मारत इंग्लंडची मालिकेत आघाडी
2
अमेरिका-कतार भूमिकेचे स्वागत, संवादास पर्याय नाही; इराण-इस्रायल युद्धविरामावर भारताचे भाष्य
3
ENG vs IND : टीम इंडिया कुठं कमी पडली? जाणून घ्या हेडिंग्लेच्या मैदानातील पराभवामागची पाच कारणं
4
“शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, शक्तिपीठ महामार्ग आम्ही कदापि होऊ देणार नाही”; राजू शेट्टी ठाम
5
अहमदाबाद विमान अपघातात किती लोकांचा मृत्यू झाला? सरकारने जाहीर केली अधिकृत आकडेवारी
6
“मला शक्य तितक्या लवकर सर्वकाही शांत झालेले पाहायचे आहे”; ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
8
ENG vs IND : अंपायरसमोर जड्डूचं तेवर! विकेटमागून पंतनही घेतली फिरकी! मैदानात नेमकं काय घडलं?
9
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
10
ENG vs IND : शार्दुल ठाकूरची कमाल! २ चेंडूत २ विकेट्स घेत टेस्ट मॅचमध्ये आणलं ट्विस्ट
11
Viral Video : एक बाईक अन् १० लोक! दुचाकीस्वाराचा जुगाड बघून डोकं चक्रावेल
12
ENG vs IND : प्रसिद्ध कृष्णानं बॅक टू बॅक ओव्हरमध्ये २ विकेट्स मिळवत टीम इंडियाला दिला मोठा दिलासा
13
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
14
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
15
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
16
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
17
यशस्वी जैस्वाल पुन्हा चुकला! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला
18
EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
20
आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक

औद्योगिक वसाहतीतील सुरक्षा वाऱ्यावर

By admin | Updated: November 1, 2014 23:13 IST

उद्योगांमध्ये औद्योगिक सुरक्षा अतिशय महत्वाची आहे. यासाठी उद्योग खात्याने नियमावली ठरवून दिली आहे. परंतु या नियमावलीचे तंतोतंत पालन होताना दिसत नाही. कामगारांना जोखीम

चोरीच्या घटनांमध्ये वाढ : कामगारही करतात जोखीम स्वीकारून कामसुहास सुपासे - यवतमाळ उद्योगांमध्ये औद्योगिक सुरक्षा अतिशय महत्वाची आहे. यासाठी उद्योग खात्याने नियमावली ठरवून दिली आहे. परंतु या नियमावलीचे तंतोतंत पालन होताना दिसत नाही. कामगारांना जोखीम स्वीकारून आपले काम करावे लागते. यवतमाळ शहरात दोन औद्योगिक वसाहती आहेत. यातील अंतर्गत कर्मचाऱ्यांची सुरक्षा आणि मालाची सुरक्षा करण्याची जबाबदारी ही सबंधित उद्योजकांकडेच असते. त्यासाठी आवश्यक त्या सोयीसुविधा पुरविण्यासंदर्भात शासनाची नियमावली आहे. त्यानुसार कामगारांसाठी काम करण्यास पोषक वातावरण असणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने त्यांच्यासाठी जेवणाची जागा, स्वच्छ पाणी, शौचालय सोबतच जोखीमीच्या ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांसाठी आवश्यक तो विमा आणि प्रत्यक्ष उद्योगामध्ये सुविधा आवश्यक आहे. यातील बहुतांश सोयीसुविधांची पूर्तता यवतमाळसारख्या जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या एमआयडीसीमधील उद्योगांमध्ये होत असल्या तरी जिल्ह्यातील इतर औद्योगिक वसाहतींची मात्र खस्ता हालत आहे. वणीसारख्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उद्योग असताना त्या ठिकाणी मात्र कामगारांच्या सुरक्षितेतच्या दृष्टीने आवश्यक ते नियमांची अंमलबजावणी होताना दिसत नाही. याबाबत कर्मचाऱ्यांमध्येही एकजुटतेचा अभाव आणि स्वत:च्या सुरक्षिततेविषयी असलेली अनभिज्ञता कारणीभूत आहे. त्यामुळे इथे कामगारांच्या अपघातांची संख्यासुद्धा मोठी आहे. यवतमाळच्या औद्योगिक वसाहतीमध्ये चोरीच्या घटना मात्र नित्याच्याच झाल्या आहेत. तयार मालाची व इतर साहित्याच्या चोऱ्या या ठिकाणी नेहमीच होतात. उल्लेखनिय म्हणजे या संदर्भात वारंवार तक्रारी करण्यात आल्या आहेत. अनेकवेळा जिल्हा पोलीस अधिक्षकांना निवेदने देण्यात आली आहेत. परंतु त्याचा कोणताही फायदा झाला नाही. मोठ्या प्रमाणात चोऱ्या झाल्यानंतर पोलीस ठाण्यात तक्रारी केल्यानंतर आजपर्यंत एकाही चोरीचा छडा लावण्यात आला नसल्याची माहिती एमआयडीसीचे अध्यक्ष नंदकुमार सुराणा यांनी दिली. यावर विचार होणे आवश्यक आहे. याबाबत एमआयडीसी कार्यालयाशी संपर्क साधला असता, आम्ही उद्योगांना केवळ जागा, विद्युत व पाणी उपलब्ध करून देतो. इतर बाबींशी आमचा काहीएक सबंध नसल्याचे सांगण्यात आले. उद्योजकांनी आपल्या कर्मचाऱ्यांची तसेच मालाची सुरक्षितता स्वत:च करायची असल्याचे एमआयडीसी कार्यालयाचे म्हणणे आहे. तीन महिन्यांपूर्वी पोलीस चौकी औद्योगिक वसाहतीत उभारण्यात आली आहे. परंतु ही चौकी उभारण्यात आल्यानंतर चोरींच्या घटनांमध्ये अधिक वाढ झाल्याचा आरोप उद्योजकांमधून करण्यात येत आहे. या चौकीचा फारसा उपयोग चोऱ्या रोखण्यात होतच नसल्याचे दिसून येत आहे. या अनुषंगाने पोलीस खात्याने विचार करण्याची गरज आहे. एमआयडीसी परिसरातील मोठे उद्योजक स्वत:च्या मालाची व कर्मचाऱ्यांची सुरक्षा स्वत: करण्यास सक्षम असतात. परंतु छोट्या उद्योजकांची मात्र चांगलीच कसरत होते. त्यादृष्टीने विचार होणे गरजेचे आहे.