शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

इंदिराग्राम गट ग्रामपंचायत अस्तित्वात

By admin | Updated: August 14, 2014 23:56 IST

येथील पंचायत समितीअंतर्गत कुंभा ग्रामपंचायतीचे विभाजन करून इंदिराग्राम (श्रीरामपूर) या नवनिर्मित ५७ व्या ग्रामपंचायतीची निर्मिती करण्यात आली. या ग्रामपंचायतीच्या कार्यालयाचे

मारेगाव : येथील पंचायत समितीअंतर्गत कुंभा ग्रामपंचायतीचे विभाजन करून इंदिराग्राम (श्रीरामपूर) या नवनिर्मित ५७ व्या ग्रामपंचायतीची निर्मिती करण्यात आली. या ग्रामपंचायतीच्या कार्यालयाचे उद्घाटन तब्बल सहा महिन्यांच्या विलंबाने पार पडले.कोलाम बांधवांच्या प्रखर आंदोलनातून १९९४ मध्ये महसुली गावाचा दर्जा प्राप्त झालेली सदर दोनही गावे १९९८ पासून स्वतंत्र गट ग्रामपंचायत स्थापनेच्या प्रतीक्षेत होती़ या संदर्भात कुंभा ग्रामपंचायतीमार्फत चार वेळा प्रस्ताव प्रशासनाकडे दाखल करण्यात आले़ दैनिक ‘लोकमत’ने सातत्याने हा प्रश्न उचलून धरला़ गेल्या १४ वर्षांच्या कालावधीत तब्बत ४९ बातम्या ‘लोकमत’मधून प्रकाशित झाल्या़ अखेर जिल्हा परिषद प्रशासन व शासनाला जाग आली आणि कुंभा ग्रामपंचायतीचे विभाजन करून इंदिराग्राम येथे नवीन ग्रामपंचायत स्थापेनला हिरवी झेेंडी मिळाली़ ग्रामविकास मंत्रालयातून यवतमाळ जिल्हा परिषदेला १८ जानेवारी २०१४ रोजी सदर ग्रामपंचायत स्थापन झाल्याचे पत्र मिळाले. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी येथील गटविकास अधिकाऱ्यांना पत्र देऊन तत्काळ कारवाई करण्याचे निर्देश दिले़ ग्रामपंचायतीसाठी प्रशासकांची नियुक्तीसुध्दा झाली़ तथापि ग्रामपंचायतीचे दप्तर विभागणी व कार्यालय स्थापण्यास दिरंगाई होत होती. याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ़मल्लीनाथ कलशेट्टी यांच्या निदर्शनास तंटामुक्ती अध्यक्षांनी ही बाब आणून दिली. त्यांनी तत्काळ मुहूर्त शोधून स्थानिक अंगणवाडी केंद्रात ग्रामपंचायत कार्यालयाचा फलक लावून कार्यालयाचे उद्घाटन केले. मात्र कार्यालयाच्या उद्घाटनाला कुंभाचे माजी सरपंच किंवा ग्रामपंचायतीच्या स्थापनेसाठी अविरत धडपडणाऱ्यांना विश्वासात न घेतल्याची खंत कार्यक्रमास्थळी व्यक्त करण्यात आली.याप्रसंगी आयोजित कार्यक्रमाला आमदार वामनराव कासावार, जिल्हा परिषद सदस्य नरेंद्र ठाकरे, पंचायत समिती सदस्य गजानन खापने, नानाजी खंडाळकर, वेणूताई काटवले, अ‍ॅड.राजीव कासावार, राकेश खुराणा, विनोद गाणार, दुष्यंत जयस्वाल, रामदास घोटेकर, पोडातील ज्येष्ठ नागरिक सुरबाजी आत्राम, पंजाब रामपुरे मंचावर उपस्थित होते़ ठाकरे यांनी गावातील पाणीपुरवठा, राजीव गांधी भवनाची जागा, सर्व कोलाम पोडांना जोड रस्ते, तसेच ग्रामपंचायत पेसाअंतर्गत समाविष्ट करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. संचालन कुंभा तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष अण्णाजी कचाटे यांनी केले़ त्यानंतर झालेल्या पहिल्याच ग्रामसभेत ग्रामविकास, निवडणुकीसह विविध विषयांवर चर्चा होऊन आवाजी मताने ठराव पारित करण्यात आले. ग्रामसभेचे संचालन पंचायत विस्तार अधिकारी पी़एम़पंडित यांनी केले़ सभेला ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या सहाही पोडातील नाईक, महाजनसह ग्रामस्थ उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)