शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
3
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
4
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
5
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
6
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
7
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
8
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
9
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
10
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
11
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
12
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
13
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
14
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
15
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
16
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
17
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
18
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
19
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
20
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...

भारतीय राज्यघटना आदर्श आहे

By admin | Updated: February 10, 2017 01:53 IST

विविधतेने नटलेल्या भारत देशात जाती, धर्म व पंथ यांचे विविध प्रकार आहे.

देवीदास घोडेस्वार : समता सैनिक दलाकडून व्याख्यानयवतमाळ : विविधतेने नटलेल्या भारत देशात जाती, धर्म व पंथ यांचे विविध प्रकार आहे. त्या सर्वांना समान न्यायाने बांधून भारताला एकात्म व अखंडित ठेवण्याचे कार्य संविधान करीत आहे. त्यामुळे भारतीय राज्यघटना आदर्श आहे, असे मत प्रा. देवीदास घोडेस्वार यांनी व्यक्त केले. समता सैनिक दलाच्यावतीने डॉ. आंबेडकर सांस्कृतिक सभागृह येथे माई रमाई जयंतीचा कार्यक्रम झाला. त्यावेळी ते प्रमुख वक्ता म्हणून बोलत होते. याप्रसंगी ‘माई रमाई प्रज्ञासूर्याची सावली’ या विषयावर प्रा. प्रमोद नारायणे यांनी भाष्य केले. माई रमाईचा त्याग, निष्ठा, कर्तव्य व जबाबदारी यांची उदाहरणे सांगितली. प्रा. देवीदास घोडेस्वार यांचे ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भारत राष्ट्र’ या विषयावर व्याख्यान झाले. ते म्हणाले, कुठलाही धर्मग्रंथ देशाचा कारभार चालवू शकत नाही. एक भारतीय म्हणून तुम्हाला भारतीय संविधानच समान हक्क, अधिकार व स्वातंत्र्य देवू शकते. प्रत्येक क्षेत्रातील कालबाह्य गोष्टी मागे टाकून आधुनिक कालसुसंगत व विज्ञानवादी विचारांची जोड देण्याची क्षमता भारतीय संविधानात आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अशोक ताकसांडे, संचालन देवीदास मुनेश्वर यांनी केले. अविनाश मनवर यांनी आभार मानले. (स्थानिक प्रतिनिधी)