शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
5
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
6
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
7
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
8
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
9
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
10
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
11
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
12
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
13
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
14
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
15
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
16
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
17
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
18
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
19
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
20
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  

अवकाळी पाऊस बरसला

By admin | Updated: March 17, 2017 02:49 IST

ऐन गहू, हरभरा काढणीच्या वेळेस वातावरणात अचानक बदल होवून पुसद उपविभागात

शेतकरी चिंतेत : दिग्रस, पुसदला पाऊस तर उमरखेडमध्ये वारा पुसद : ऐन गहू, हरभरा काढणीच्या वेळेस वातावरणात अचानक बदल होवून पुसद उपविभागात अवकाळी पाऊस बरसला. यामुळे शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून गुरुवारी झालेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. महागाव तालुक्याला वादळी वाऱ्याने झोडपून काढले. पुसद तालुक्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून ढगाळ वातावरण असून यामुळे हरभरा, गहू, कांदा पीक, भाजीपाला पीक धोक्यात आले आहे. यातच हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तवल्याने शेतकऱ्यांची चिंता आणखीनच वाढली आहे. ऐन तोंडावर आलेला घास निसर्गाच्या लहरीपणामुळे हिरावून घेतला जातो की काय, या विवंचनेत शेतकरी आहे. गुरुवारी दुपारी पुसद परिसरात पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांची चांगलीच धांदल उडाली. अनेकांचा कापलेला गहू, हरभरा शेतात आहे. तो ओला होण्याची भीती आहे, तर पुसद बाजार समितीतही मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी विक्रीस आणलेले धान्य उघड्यावर आहे. पावसामुळे ओले होण्याची भीती निर्माण झाली आहे. दिग्रस तालुक्यात विजेच्या लखलखाटासह सायंकाळी पावसाच्या सरी बरसल्या. बुधवारी रात्रीपासूनच दिग्रस तालुक्यात काळे ढग दिसू लागले होते. गुरुवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास विजेच्या कडकडाटात पावसाच्या सरी कोसळल्या, तर सायंकाळी ५ वाजताच्या दरम्यान वादळी वाऱ्यासह पुन्हा पावसाला सुरुवात झाली. या पावसाने गहू, हरभरा पिकांसोबतच संत्रा पिकाचेही नुकसान झाले. महागाव तालुक्यात वादळी वारा सुरू असून पाऊस कोसळला नाही. परंतु केव्हाही पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. उमरखेड तालुक्यातही दिवसभर ढगाळी वातावरण होते. गेल्यावर्षी पावसाने चांगली साथ दिल्यामुळे शेतकऱ्यांनी रबी हंगामात हरभरा, गहू, कांदा, भाजीपाल्याची लागवड केली. परिसरातील विहिरींची पाणी पातळी चांगली होती. मात्र मार्च महिना सुरू होताच पाणी पातळी घटू लागली आहे. विहिरीनींही तळ गाठण्यास सुरुवात केली आहे. यावर उपाय म्हणून शेतकरी ठिबक सिंचनाचा वापर करून रबी पिकांचे जतन करत आहेत. हवामान खात्याने काही दिवसात पावसाचा अंदाज वर्तवल्याने शेतकऱ्यांची धाकधूक वाढली आहे. तसेच पाऊस आल्यास या परिसरात रबी हंगामातील गहू, हरभरा, कांदा, भाजीपाला पिकांचेही नुकसान होवू शकते. सध्या गहू, हरभरा काढणीचे काम सुरू आहे. हाती आलेल्या पिकांचे नुकसान होवू होवू नये म्हणून शेतकरी हार्वेस्टरचा वापर करत आहेत. सध्या ढगाळ वातावरण असून हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे गहू, हरभरा, कांदा उत्पादकांची चिंता वाढली आहे. पाऊस आल्यास शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होवू शकते, असे शेतकरीवर्गातून बोलल्या जात आहे. (लोकमत चमू) आंब्याला फटका पुसद उपविभागात यावर्षी आंब्याचे मोठे पीक आले आहे. झाडाला आंबे लदबदले आहे. परंतु गुरुवारी झालेल्या अवकाळी पावसाचा फटका आंब्याला बसला आहे. अनेक ठिकाणी वादळाने आंबे गळून पडले आहे. तर काही ठिकाणी गारपिटीने आंब्याच्या फळाला मार लागल्याचे दिसत आहेत.