शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
2
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
3
चालत गेली अन् शाळेच्या चौथ्या मजल्यावरून मारली उडी; दहावीतील विद्यार्थिनीचा व्हिडीओ आला समोर
4
"नरेंद्र मोदी मोठी समस्या नाहीत, त्यांच्यात ..."; विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचा मोठा हल्ला!
5
मुंबई लोकलमध्ये ६२ कोटी रुपयांचे मोबाईल चोरीला; किती लोकांना परत मिळाले? 
6
‘५६ लाख घुसखोर आले कसे? तुम्ही राजीनामाच द्या’, महुआ मोईत्रांनी अमित शाहांना सुनावले  
7
Bank Job 2025: बँक ऑफ बडोदामध्ये मॅनेजर, सिनियर मॅनेजर पदांसाठी भरती; संधी सोडू नका!
8
'एक नंबर'! 'लोकमत डॉट कॉम'सोबत वाचकांची 'महायुती'; ६,२१,५३,००० 'लोकमतां'सह घेतली 'महाआघाडी'
9
फहाद फासिलनं सांगितले त्याचे आवडते '५' चित्रपट, तुम्ही पाहिलेत का?
10
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकरांचे सूचक विधान
11
एक दोन नाही तर २५००० कर्मचाऱ्यांची कपात होणार, एप्रिलनंतर आता पुन्हा एकदा Intel च्या कर्मचाऱ्यांवर संकट
12
"...हे विरोधी पक्ष ठरवू शकत नाही"; लोकसभेत प्रचंड गोंधळ, कोणत्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री भडकले?
13
'माझ्या मनावर ओझं पण...' ९००० कर्मचाऱ्यांना काढल्यानंतर सत्या नाडेला यांनी अखेर मौन सोडले; म्हणाले...
14
सरकार आता आमची गेलेली मुलं परत आणून देऊ शकतं का? शाळा दुर्घटनेनंतर पालकांचा आक्रोश
15
31 जुलैपासून सुरू होणार 'या' कंपनीचा कार प्लांट, दर वर्षी बाहेर पडणार 1.50 लाख इलेक्ट्रिक कार!
16
'ऑपरेशन सिंदूर' अजून संपले नाही; CDS जनरल अनिल चौहान यांचे मोठे विधान
17
Sex Racket: फाइव्ह स्टार हॉटेल आणि हाय- प्रोफाइल विदेशी महिला; मुंबईतील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश!
18
Shravan 2025: पौराणिक कथांच्या शेवटी 'साठा उत्तराची कहाणी... सुफळ संपूर्ण' असं का म्हणतात?
19
तुमच्या PF खात्यात पैसे नसले तरीही नॉमिनीला आता थेट ५०,००० मिळतील; EPFO ने 'हे' नियम बदलले
20
Walmik Karad : 'धनंजय मुंडेंना संपवून वाल्मिक कराडला पोटनिवडणूक घ्यायची होती'; बाळा बांगरांचा गंभीर आरोप

अवकाळी पाऊस बरसला

By admin | Updated: March 17, 2017 02:49 IST

ऐन गहू, हरभरा काढणीच्या वेळेस वातावरणात अचानक बदल होवून पुसद उपविभागात

शेतकरी चिंतेत : दिग्रस, पुसदला पाऊस तर उमरखेडमध्ये वारा पुसद : ऐन गहू, हरभरा काढणीच्या वेळेस वातावरणात अचानक बदल होवून पुसद उपविभागात अवकाळी पाऊस बरसला. यामुळे शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून गुरुवारी झालेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. महागाव तालुक्याला वादळी वाऱ्याने झोडपून काढले. पुसद तालुक्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून ढगाळ वातावरण असून यामुळे हरभरा, गहू, कांदा पीक, भाजीपाला पीक धोक्यात आले आहे. यातच हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तवल्याने शेतकऱ्यांची चिंता आणखीनच वाढली आहे. ऐन तोंडावर आलेला घास निसर्गाच्या लहरीपणामुळे हिरावून घेतला जातो की काय, या विवंचनेत शेतकरी आहे. गुरुवारी दुपारी पुसद परिसरात पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांची चांगलीच धांदल उडाली. अनेकांचा कापलेला गहू, हरभरा शेतात आहे. तो ओला होण्याची भीती आहे, तर पुसद बाजार समितीतही मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी विक्रीस आणलेले धान्य उघड्यावर आहे. पावसामुळे ओले होण्याची भीती निर्माण झाली आहे. दिग्रस तालुक्यात विजेच्या लखलखाटासह सायंकाळी पावसाच्या सरी बरसल्या. बुधवारी रात्रीपासूनच दिग्रस तालुक्यात काळे ढग दिसू लागले होते. गुरुवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास विजेच्या कडकडाटात पावसाच्या सरी कोसळल्या, तर सायंकाळी ५ वाजताच्या दरम्यान वादळी वाऱ्यासह पुन्हा पावसाला सुरुवात झाली. या पावसाने गहू, हरभरा पिकांसोबतच संत्रा पिकाचेही नुकसान झाले. महागाव तालुक्यात वादळी वारा सुरू असून पाऊस कोसळला नाही. परंतु केव्हाही पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. उमरखेड तालुक्यातही दिवसभर ढगाळी वातावरण होते. गेल्यावर्षी पावसाने चांगली साथ दिल्यामुळे शेतकऱ्यांनी रबी हंगामात हरभरा, गहू, कांदा, भाजीपाल्याची लागवड केली. परिसरातील विहिरींची पाणी पातळी चांगली होती. मात्र मार्च महिना सुरू होताच पाणी पातळी घटू लागली आहे. विहिरीनींही तळ गाठण्यास सुरुवात केली आहे. यावर उपाय म्हणून शेतकरी ठिबक सिंचनाचा वापर करून रबी पिकांचे जतन करत आहेत. हवामान खात्याने काही दिवसात पावसाचा अंदाज वर्तवल्याने शेतकऱ्यांची धाकधूक वाढली आहे. तसेच पाऊस आल्यास या परिसरात रबी हंगामातील गहू, हरभरा, कांदा, भाजीपाला पिकांचेही नुकसान होवू शकते. सध्या गहू, हरभरा काढणीचे काम सुरू आहे. हाती आलेल्या पिकांचे नुकसान होवू होवू नये म्हणून शेतकरी हार्वेस्टरचा वापर करत आहेत. सध्या ढगाळ वातावरण असून हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे गहू, हरभरा, कांदा उत्पादकांची चिंता वाढली आहे. पाऊस आल्यास शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होवू शकते, असे शेतकरीवर्गातून बोलल्या जात आहे. (लोकमत चमू) आंब्याला फटका पुसद उपविभागात यावर्षी आंब्याचे मोठे पीक आले आहे. झाडाला आंबे लदबदले आहे. परंतु गुरुवारी झालेल्या अवकाळी पावसाचा फटका आंब्याला बसला आहे. अनेक ठिकाणी वादळाने आंबे गळून पडले आहे. तर काही ठिकाणी गारपिटीने आंब्याच्या फळाला मार लागल्याचे दिसत आहेत.