शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
8
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
9
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
10
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
11
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
12
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
13
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
14
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
15
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
16
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
17
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
18
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
19
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
20
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?

अवकाळी पाऊस बरसला

By admin | Updated: March 17, 2017 02:49 IST

ऐन गहू, हरभरा काढणीच्या वेळेस वातावरणात अचानक बदल होवून पुसद उपविभागात

शेतकरी चिंतेत : दिग्रस, पुसदला पाऊस तर उमरखेडमध्ये वारा पुसद : ऐन गहू, हरभरा काढणीच्या वेळेस वातावरणात अचानक बदल होवून पुसद उपविभागात अवकाळी पाऊस बरसला. यामुळे शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून गुरुवारी झालेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. महागाव तालुक्याला वादळी वाऱ्याने झोडपून काढले. पुसद तालुक्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून ढगाळ वातावरण असून यामुळे हरभरा, गहू, कांदा पीक, भाजीपाला पीक धोक्यात आले आहे. यातच हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तवल्याने शेतकऱ्यांची चिंता आणखीनच वाढली आहे. ऐन तोंडावर आलेला घास निसर्गाच्या लहरीपणामुळे हिरावून घेतला जातो की काय, या विवंचनेत शेतकरी आहे. गुरुवारी दुपारी पुसद परिसरात पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांची चांगलीच धांदल उडाली. अनेकांचा कापलेला गहू, हरभरा शेतात आहे. तो ओला होण्याची भीती आहे, तर पुसद बाजार समितीतही मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी विक्रीस आणलेले धान्य उघड्यावर आहे. पावसामुळे ओले होण्याची भीती निर्माण झाली आहे. दिग्रस तालुक्यात विजेच्या लखलखाटासह सायंकाळी पावसाच्या सरी बरसल्या. बुधवारी रात्रीपासूनच दिग्रस तालुक्यात काळे ढग दिसू लागले होते. गुरुवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास विजेच्या कडकडाटात पावसाच्या सरी कोसळल्या, तर सायंकाळी ५ वाजताच्या दरम्यान वादळी वाऱ्यासह पुन्हा पावसाला सुरुवात झाली. या पावसाने गहू, हरभरा पिकांसोबतच संत्रा पिकाचेही नुकसान झाले. महागाव तालुक्यात वादळी वारा सुरू असून पाऊस कोसळला नाही. परंतु केव्हाही पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. उमरखेड तालुक्यातही दिवसभर ढगाळी वातावरण होते. गेल्यावर्षी पावसाने चांगली साथ दिल्यामुळे शेतकऱ्यांनी रबी हंगामात हरभरा, गहू, कांदा, भाजीपाल्याची लागवड केली. परिसरातील विहिरींची पाणी पातळी चांगली होती. मात्र मार्च महिना सुरू होताच पाणी पातळी घटू लागली आहे. विहिरीनींही तळ गाठण्यास सुरुवात केली आहे. यावर उपाय म्हणून शेतकरी ठिबक सिंचनाचा वापर करून रबी पिकांचे जतन करत आहेत. हवामान खात्याने काही दिवसात पावसाचा अंदाज वर्तवल्याने शेतकऱ्यांची धाकधूक वाढली आहे. तसेच पाऊस आल्यास या परिसरात रबी हंगामातील गहू, हरभरा, कांदा, भाजीपाला पिकांचेही नुकसान होवू शकते. सध्या गहू, हरभरा काढणीचे काम सुरू आहे. हाती आलेल्या पिकांचे नुकसान होवू होवू नये म्हणून शेतकरी हार्वेस्टरचा वापर करत आहेत. सध्या ढगाळ वातावरण असून हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे गहू, हरभरा, कांदा उत्पादकांची चिंता वाढली आहे. पाऊस आल्यास शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होवू शकते, असे शेतकरीवर्गातून बोलल्या जात आहे. (लोकमत चमू) आंब्याला फटका पुसद उपविभागात यावर्षी आंब्याचे मोठे पीक आले आहे. झाडाला आंबे लदबदले आहे. परंतु गुरुवारी झालेल्या अवकाळी पावसाचा फटका आंब्याला बसला आहे. अनेक ठिकाणी वादळाने आंबे गळून पडले आहे. तर काही ठिकाणी गारपिटीने आंब्याच्या फळाला मार लागल्याचे दिसत आहेत.